२० व्या शतकातील ५ महान सर्वश्रेष्ठ बौद्ध

बौद्ध धम्मासाठी सर्वोत्कृष्ट योगदान देणाऱ्या विसाव्या शतकातील पहिल्या पाच सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींची नावे येथे देण्यात आलेली आहे. महान ब्रिटिश विद्वान व लेखक संघरक्षित यांनी “Great Buddhists of the Twentieth Century” नावाचे पुस्तक लिहिले होते, त्यामध्ये त्यांनी या २० व्या शतकातील टॉप ५ महान बौद्धांची प्राथमिक माहिती आहे.
जगाच्या इतिहासात असंख्य महान बौद्ध विभूती झाल्या आहेत ज्यांनी बौद्ध धम्माला वेळोवेळी समृद्ध आणि सशक्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, ज्यांना आपण “धम्मकार्य” असे म्हणू शकतो. बुद्धांच्या काळापासून ते आजच्या एकविसाव्या शतकापर्यंतच्या थोर बौद्ध व्यक्तींमध्ये विद्वान, राज्यकर्ते, धर्मगुरू, लेखक, धर्मवेत्ते यासारखे अनेक प्रकारचे बौद्धजन आहेत. या लेखामध्ये आपण विसाव्या शतकातील टॉप ५ महान बौद्ध व्यक्तींनी बौद्ध धम्मासाठी सर्वोत्कृष्ट योगदान, व्यापक असे कार्य केले आहे.
” ग्रेट बुद्धिस्ट ऑफ द ट्वेंटीथ सेंचुरी ” हे पुस्तक अवघे ३६ पानांचे असून १९९६ मध्ये ते इंग्लिश भाषेत प्रकाशित झाले. या पुस्तकात २० व्या शतकात बौद्ध धम्माच्या भवितव्यात अतुलनीय योगदान देणाऱ्या पाच व्यक्तींच्या लघु चरित्रांचा हा क्रम आहे. त्यापैकी दोन – अनगरिका धर्मपाल आणि डॉ. बी.आर. आंबेडकर – बौद्ध धम्म भारतात परत आणण्यासाठी मुख्यतः जबाबदार होते. इतर – अलेक्झांड्रा डेव्हिड-नील, लामा गोविंदा आणि एडवर्ड कॉनझे – हे पाश्चात्य होते ज्यांची बौद्ध धम्माशी बांधिलकी होती, त्या वेळी नविन होती, त्यांना महत्त्वपूर्ण ट्रेल-ब्लॅझर म्हणून परिभाषित केले गेले होते.
भारतातील लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जाणतात परंतु इतर चार सर्वश्रेष्ठ बौद्ध लोकांबद्दल खूप कमी लोकांना माहिती असेल. किमान भारतातील बौद्धांना या विसाव्या शतकातील ५ सर्वश्रेष्ठ बौद्ध व्यक्तींबद्दल जरूर माहिती असायला हवी.
विसाव्या शतकातील ५ महान बौद्ध –
१) अनागरिक धर्मपाल
देश : श्रीलंका
जन्म : १७ सप्टेंबर १८६४
मृत्यू : २९ एप्रिल १९९३
अनागरिक धर्मपाल एक श्रीलंकन बौद्ध पुनरुज्जीवनवादी आणि लेखक होते.
पहिले जागतिक बौद्ध धम्मप्रचारक
अहिंसक सिंहली बौद्ध राष्ट्रवादाच्या योगदानांपैकी एक
ब्रिटीश राजवटीविरुद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख व्यक्ती अनेक शतकांपासून अक्षरशः नामशेष झालेल्या बौद्ध धम्माला भारतात पुनरुज्जीवन देणारे एक अग्रणी आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप या तीन खंडांमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार करणारे आधुनिक काळातील पहिले बौद्ध थिऑसॉफिकल सोसायटीचे निर्माते हेन्री स्टील ऑल्कोट आणि हेलेना ब्लाव्हत्स्की यांच्यासोबत, ते सिंहली बौद्ध धम्माचे प्रमुख सुधारक आणि पुनरुज्जीवनवादी होते आणि त्याच्या पाश्चात्य प्रसारातील एक महत्त्वाची व्यक्ती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धशतकापूर्वी त्यांनी तमिळांसह दक्षिण भारतीय दलितांच्या जनआंदोलनाला बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या नंतरच्या आयुष्यात, ते पूज्य श्री देवमित्त धर्मपाल या नावाने बौद्ध भिक्खू बनले. अनागरिक धम्मपाल यांनी आजीवन बौद्धधम्म प्रसाराचे कार्य केले जे अतिशय व्यापक होते त्यामुळे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये त्यांना प्रथम क्रमांकावर ठेवण्यात आले.
२) अलेक्झांड्रा डेव्हिड-नील
देश : बेल्जियन-फ्रेंच
जन्म : २४ ऑक्टोबर १८६८
मृत्यू : ८ सप्टेंबर १९६९
अलेक्झांड्रा डेव्हिड-नील एक बेल्जियन-फ्रेंच शोधकर्ती, अध्यात्मवादी, बौद्ध, अराजकतावादी, ऑपेरा गायिका आणि लेखिका होती. त्या १९२४ च्या ल्हासा, तिबेटला दिलेल्या त्यांच्या भेटीसाठी सर्वात जास्त ओळखल्या जातात, जेव्हा तिबेटला भेटी देणे परदेशी लोकांना निषिद्ध होती. त्यांनी पौर्वात्य धर्म, तत्त्वज्ञान यासह त्यांच्या प्रवासाविषयी ३० हून अधिक पुस्तके लिहिली. अलेक्झांड्रा डेव्हिड-नीलने बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात प्रवास केला होता. त्यांच्या शिकवणींचा प्रभाव लेखक जॅक केरोआक आणि ॲलन गिन्सबर्ग, पूर्वेकडील तत्त्वज्ञानाचे लोकप्रिय लेखक ॲलन वॉट्स आणि बाबा रामदास आणि गूढवादी बेंजामिन क्रेम. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये अलेक्झांड्रा डेव्हिड-नील यांना द्वितीय स्थानावर ठेवले आहे.
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
देश : भारत
जन्म : १४ एप्रिल १८९१
मृत्यू : ६ डिसेंबर १९५६
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य ( दलित ) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. लक्षावधी अनुयायांसह आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यावर बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन झाले. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना बौद्ध धम्माचे प्रवर्तक तसेच बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवक म्हणले जाऊ लागले. महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धम्मात आणण्याचे कार्य केले.
सम्राट अशोकानंतर बौद्ध धम्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तृतीय स्थानावर ठेवले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात बौद्ध धम्माकडे वळले. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी त्यांनी बौद्ध धम्म प्रचारासाठी घालवला, त्यांनी प्रत्यक्ष धर्मांतर १९५६ मध्ये केले असले तरी त्यापूर्वीही ते विविध बौद्ध परिषदांमध्ये सहभागी झाले होते. एकंदरीत एका दशकापेक्षा कमी एवढ्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी अतिशय व्यापक असे धम्मकार्य केले, तरीही ते या लेखामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आले. भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १% सांगितलेली असली तरी प्रत्यक्षात ही संख्या ५ ते ७ टक्क्यापर्यंत आहे, असे देशातील अनेक बौद्ध कार्यकर्ते दावा करतात.
४) अनागरिका गोविंदा
देश : जर्मन, ब्रिटिश, भारतीय
जन्म : १७ मे १८९८
मृत्यू : १४ जानेवारी १९८५
अनागरिक गोविंदा ( जन्म: अर्न्स्ट लोथर हॉफमन ) आर्य मैत्रेय मंडलाचे संस्थापक आणि तिबेटी बौद्ध धम्म, अभिधर्म आणि बौद्ध ध्यान तसेच बौद्ध धर्माच्या इतर पैलूंचे प्रतिपादक होते. ते चित्रकार आणि कवी देखील होते. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये अनागरिका गोविंदा यांना चौथ्या स्थानावर ठेवले आहे.
५) एडवर्ड कॉन्झ
देश : इंग्लंड
जन्म : १९०४
मृत्यू : १९७९
एडवर्ड कॉन्झ हे मार्क्सवाद आणि बौद्ध धम्माचे विद्वान होते, जे प्रामुख्याने प्रज्ञापारमिता साहित्याच्या भाष्य आणि अनुवादासाठी ओळखले जातात. प्रज्ञापारमिता म्हणजे महायान बौद्ध धम्मातील ज्ञानाची परिपूर्णता”. विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ बौद्धांमध्ये एडवर्ड कॉन्झ यांना पाचव्या स्थानावर ठेवले आहे.
नमो बुद्धाय ! जय भिम !!
आपला धम्मबंधू
आयु. राज जाधव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत