मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

“मानवी जीवनात माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ”


भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो
वैशाली बुद्ध विहारात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी भंदत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या निवडीबद्दल सत्कार व धम्मदेसना कार्यक्रम.
लातूर दि. २३.१०.२०२३

मानवी जीवनामध्ये जातीधर्मापेक्षा माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. कुणाचाही द्वेष न करता प्रेम आणि करुनेने माणसे जोडली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध होईल असे प्रतिपादन भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी नुकतेच केले.
वैशाली बुद्ध विहारात अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी भंदत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या निवडीबद्दल सत्कार व धम्मदेसना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी विचारमंचावर अध्यक्षस्थानी महाविहार, काळेगाव येथील भिक्खू महाविरो थेरो हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून भिक्खू पय्यानंद थेरो (लातूर), भिक्खू नागसेन बोधी (उदगीर), भिक्खू सुमेधजी नागसेन (खरोसा), भिक्खू धम्मासार (किल्लारी) यांच्यासह माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, हृदयरोग तज्ञ डॉ. सदानंद कांबळे आणि माजी नगरसेवक तथा प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्धाच्या प्रतिमेस भिक्खू संघाच्या हस्ते बुद्ध पूजा करण्यात आली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि भिक्खू महाविरो थेरो यांनी उपस्थिताना त्रिशरण पंचशील प्रदान केले. पुढे बोलताना डॉ. उपगुप्त महाथेरो म्हणाले की, आज मैत्री भाव महत्त्वाचा आहे. मनुष्य हा सत्काराने मोठा होत नाही तर शील आणि चारित्र्याने तो मोठा होत असतो त्यामुळे आपण सातत्याने इतरांविषयी सकारात्मक भावना मनामध्ये ठेवली पाहिजे. आपण प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे तसेच सर्वांनी एकमेकांना जोडले पाहिजे. आजचा सत्कार हा व्यक्तीचा सत्कार नसून तथागताच्या चिवराचा तो सन्मान आहे. सत्कारामुळे आपल्याला आधार मिळून एक नवी ऊर्जा प्राप्त होते असेही ते म्हणाले.
यावेळी माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड म्हणाले की, प्रत्येक बुद्ध विहारात पाली भाषेचे विद्यालय असले पाहिजे. बुद्ध विहारात नेहमी पाली भाषा संवर्धनाचे काम व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमात डॉ. सदानंद कांबळे आणि सचिन मस्के यांची समायोजित भाषणे झाली. तसेच कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव येथे प्राचार्य म्हणून डॉ. दुष्यंत कटारे आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे डॉ. संजय गवई यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. उपगुप्त महाथेरो यांची अखिल भारतीय भिक्खू संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वैशाली सार्वजनिक बुद्ध विहाराच्यावतीने केशव कांबळे, सूर्यभान लातूरकर, जगन्नाथ सुरवसे, दामू कोरडे, गौतम चिकाटे, हरिश्चंद्र सुरवसे, लता चिकटे, लता कांबळे, निळूबाई कांबळे, लता गायकवाड, मीना सुरवसे आदींनी चिवर, मानचिन्ह व पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी विनोद खटके यांनी वैशाली बुद्ध विहाराला दहा हजार रुपयांचे दान दिले त्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी भिक्खू महाविरो थेरो यांची धम्मदेसना झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल सुरवसे, धनराम कांबळे, गोपाळ चिकटे, अशीत कांबळे, कुणाल कांबळे, वसंत वाघमारे, सूर्यकांत दांडे, आनंद सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले तर आभार सूर्यभान लातूरकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला लातूर शहरातील विविध भागातील बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!