आर्थिकमुख्यपानशेतीविषयक

तूरडाळ आणि तांदूळ महागला.

जगभरातील अनेक देशांना भारतातून तांदळाची निर्यात होते. जिल्ह्यातील अनेक भागांत तांदळाचे उत्पादन होते. मात्र, दोन वर्षांपासून तांदळाचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे गतवर्षापासून तांदळाच्या दरांत सातत्याने वाढ बघायला मिळत आहे. त्यातही प्रामुख्याने बासमती तांदळाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. कर्नाटक, गोंदिया, छत्तीसगड, गडचिरोली, पंजाब, दिल्ली यांसारख्या राज्यांतून नाशिकमध्ये तांदूळ मागवला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथील शेतकरी पांरपरिक बासमती तांदळाऐवजी ११२१ बासमती तांदळाच्या लागवडीकडे वळाले आहेत. तीन ते चार वर्षांपासून पारंपरिक बासमतीची लागवड कमी होत आहे. याचा परिणाम आवकेवर झाला असून, दर वाढले आहेत.
बाजारात नवीन तुरडाळ दाखल होण्यासाठी अजून तीन ते चार महिन्यांचा अवधी आहे. त्यामुळे बाजारात तूरडाळीचा तुटवडा असल्याने महिन्याभरात तूरडाळही किलोमागे ३० ते ५० रुपयांनी महागली आहे. बाजारात तूरडाळ १६५ ते १७० रुपयांनी विक्री होत आहे. तर मूगडाळ ११० ते ११५ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे.

तांदूळ (दर प्रतिकिलो)डाळ दर
  
११२१ बासमती : १२० ते १३०तूरडाळ – १६५ ते १७०
  
साधा बासमती : १३० ते १४०मूगडाळ – ११० ते ११५
  
इंद्रायणी : ६० ते ७०उडीदडाळ – ११५
  
कोलम : ७० ते ७५चणाडाळ – ८८ ते ९०
  
कृष्णकमोद : ७० ते ७५मसूरडाळ – ८८
  
रायभोग : ५५ ते ३० 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!