मुख्यपानमुंबई/कोंकण

रत्नागिरी-चिपळूण उड्डाणपूल दुर्घटना, कंपनीला नोटीस

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण बहादूरशेख ते प्रांत कार्यालय असा सुमारे १.८३ किलोमीटर चा उड्डाणपूल उभारला जात आहे.पुलाच्या पिलरवर गर्डर चढवण्याचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यामुळे साहजिकच कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित होऊ लागल्या. लोकांनी देखील यासंदर्भात जोरदार आवाज उठवल्याने राजकीय व प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यकर्ते तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील याबाबत दखल घेतली.

मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूरशेखनाका येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाचे काम करणारी मूळ ठेकेदार कंपनी तसेच पोट ठेकेदार कंपनी व संबंधित सल्लागार कंपनीला देखील शासनाने करणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात केंद्रीय समिती देखील चिपळूण मध्ये येणार असून पाहणी करणार आहे. त्यामुळे उड्डाणपूल दुर्घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेतल्याचे आता समोर येऊ लागले आहे.

या उड्डाणपुलाचा मूळ ठेका एका ठेकेदाराकडे तर पोट ठेका दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आला आहे. आता शासनाने दोघांनाही कोंडीत पकडले आहे. मूळ ठेकेदार तसेच पोट ठेकेदाराला देखील पूल कोसळल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिसमध्ये अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले असल्याची देखील माहिती मिळत आहे. कारणे दाखवा नोटीस मिळताच ठेकेदार कंपनीचे धाबेच दणाणले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!