नळदुर्ग येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय शहराच्या चावडी मध्यवर्ती ठिकाणी चालु करण्याची मागणी .

नळदुर्ग
दादासाहेब बनसोड
नळदुर्ग येथील श्री खंडोबा रस्त्या लगत असलेले तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय हे शहरातील मुख्य चावडी हे मध्यवर्ती ठिकाण आसल्यामुळे या चावडी च्या इमारती मध्ये चालू करावे अशी मागणी शहर व्यापारी संघटनेकडून आमदार राणा जगजितिंह पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,
व्यापारी मंडळ यांच्या कडून आमदार राणा जगजिसिंह पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याचे तलाठी कार्यालय हे शहराच्या बाहेर आहे, त्यामुळे शेतकऱ्यां बरोबर नागरीकांना हे ठिकाण गैरसोयीचे होत आहे, त्याच बरोबर मंडळ अधिकारी कार्यालय हे ही त्याच ठिकाणी आसल्या कारणाने ते ही शेतकऱ्यासाठी व नागरिकांसाठी गैरसोयीचे होत आहे, येण्या जाण्यासाठी मोठा त्रास होत आहे, या पूर्वी ही तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय चावडीच्या इमारती मध्ये होते, मात्र नगर पलिके कडून चावडीत चावडीची इमारत बांधत असल्यामुळे सदरील तलाठी कार्यालय हे बाहेर हलविण्यात आले होते, मात्र आता सध्या चावडीची इमारत बांधून तयार आहे,त्यामुळे सर्वांच्या सोयीच्या ठिकाणी हे कार्यालय होईल, त्यामुळे आमदार राणा जगजिसिंह पाटील यांनी यासाठी प्रयत्न करून सध्या चावडीच्या नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये हे कार्यालय चालू करावे अशी मागणी व्यापारी संघाकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर व्यापारी संघाचे सुधीर सूर्यकांत पाटील , सुभाष कोरे, मुकुंद नाईक, सुहास पाटील, संदीप,सुरवसे,वैजिनात कोरे, संतोष जाधव, राजेंद्र महबोले, सुधीर पुराणिक, जनार्दन हांचाटे, पत्रकार विलास येडगे, शंतनु डुकरे, संतोष मुळे, खंडप्पा कोरे, मल्लिनाथ शिरगुरे, सुजित बिराजदार, गोविंद जाधव, युवराज जगताप, शिवाजी सरवसे, धनाजी जाधव, यांच्या सह बहुसंख्य नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत