मुख्य पान

नार्वेकरांकडून चोरांना सुरक्षा संजय राऊत यांचे टीकास्त्र

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही राहुल नार्वेकर या आमदार अपात्रता प्रकरणी टाईमपास करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर थेट निशाणा साधला आहे. विधिमंडळाचं सार्वभौमत्व राहुल नार्वेकर सांगत आहेत. चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून संरक्षण दिलं जातंय. चोरांना ,दरोडेखोरांना सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील. तर त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात नोंदवलं जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालय निर्देश दिले आहेत. नार्वेकर मात्र टाईमपास टाईमपास सिरिअल बनवत आहेत. हे लोक लंफगे आहेत. हे लोकं चोरी करुन दुसऱ्याच्या घरात घुसले आहेत. विधानसभा अध्यक्ष मात्र या चोरांना संरक्षण देत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार हे म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. जसे चौकीदार चोर आहेत तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत, असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. आधीच्या राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केला आहे की त्यांना रोज न्यायालयाने फासावर लटकवलं पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!