देश-विदेशमुख्यपान

रोहित शर्माने टॉस जिंकला, आधी गोलंदाजी

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.  टीम इंडिया-पाकिस्तान हे दोन्ही संघ आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हा सामना आयोजित करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.

सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये महागड्या ठरलेल्या मोहम्मद सिराजनं भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं अब्दुल्ला शफीकला 20 धावांवर बाद केलं.

पाकिस्तानच्या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागिदारी केली.

आठव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अब्दुल्ला शफिक सिराजचा इन्स्विंग होणारा चेंडू रोखू शकला नाही आणि तो पायचीत झाला. पाकिस्तानच्या शेवटच्या सामन्यात अब्दुल्ला शफीकने शतक झळकावलं होतं त्यामुळे त्याची विकेट महत्वपूर्ण होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!