राज ठाकरे- दादा भुसेंच्या बैठकीत टोल नाक्यावर सकारात्मक चर्चा.

आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात दोन तास बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली याची माहिती दिली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले काल(गुरूवारी) मुख्यमंत्र्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर आजही टोल संबधी चर्चा झाली. तब्बल ९ वर्षांनंतर मी या विषयासाठी अतिथीगृहावर गेलो होतो. त्यावेळी तिथे पृथ्वीराज चव्हाण होते असं राज ठाकरे म्हणाले.
काल सह्याद्रीवर मुख्यमंत्री- मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. काही गोष्टी ठरल्या. मात्र, त्या लेखी स्वरुपात आल्या नव्हत्या. तिथे असं ठरलं की, आज एक बैठक घेऊन त्या लेखी स्वरुपात तुमच्यासमोर गोष्टी आणाव्यात. झालेल्या ॲग्रीमेंटमध्ये काही चुकीच्या गोष्टी होत्या. त्यात काही गोष्टींची सुधारणा व्हायला हव्यात. आता पुन्हा तो विषय ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपुर्वी अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी मी म्हणालो होतो, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन त्यानंतर काल मी त्यांच्याशी चर्चा केली. काही गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या, असं राज ठाकरे म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानामुळे सर्वत्र चलबिचल सुरू झाली, लोकांना वाटलं की आम्हला फसवलं जाताय की काय? टोल घेणार असाल तर तुम्ही कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, पुढचे 15 दिवस या सर्व एन्ट्री पॉईंट्स वर सरकार आणि आमच्या पक्षाचे कॅमेरे लावले जातील आणि किती गाड्या या टोल वरून जातात हे कळेल ही व्हिडिओग्राफी उद्या पासून सुरू होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.
तर टोल नाक्यावर कोणकोणत्या सुधारणा व्हाव्यात यावर आमच्यात चर्चा झाली. टोल घेणार असाल तर तुम्ही काही सुविधा देणार हे ॲग्रीमेंटमध्ये काही गोष्टी असतात त्यांची अंमलबजावणी झाली नाही असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत