हिंगोली वनपरिक्षेत्र यांच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा – बाळासाहेब धबाले यांचे मंत्रालयासमोर धरणे आंदोलन .

मुंबई ,हिंगोली जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र कार्यालयात वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून ह्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी दलित पॅंथरचे परभणीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब धबाले यांनी मंत्रालयासमोर आझाद मैदानात गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. या आंदोलनाची राज्य सरकारकडून अदयापही दखल देण्यात आलेली नाही, त्यामुळे संपूर्ण पॅंथरच्या कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हिंगोली वनपरिक्षेत्रात वर्षभरात जिल्हा नियोजन समिती आणि राज्य सरकारकडून आलेल्या दोन ते तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालेला असून या सर्व प्रकरणात हिंगोली वनपरिक्षेत्र संबंधित अधिकारी जबाबदार असल्याची माहिती आंदोलनकर्ते बाळासाहेब धबाले यांनी दिली आहे. मजूर सहकारी सोसायटी या संबंधित अधिकारी यांच्या नातेवाईकांच्या नावावर या पैशांचा गैरव्यवहार झालेला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी. संबंधित अधिकारी आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश राज्य सरकार देणार नाही, तोपर्यंत हे धरणे आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा इशाराच आंदोलनकतेॅ दलित पॅंथरचे परभणी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब धबाले यांनी राज्य सरकारला दिला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत