महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच नागपुरात गुन्हेगारी वाढते; सुप्रिया सुळेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हणाल्या कि, देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते. हे मी म्हणत नाही, तर डाटा सांगतो. नागपूर ही क्राईम सिटी झाली आहे, यावेळी शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख , रोहिणी खडसे उपस्थित होते.

पुढचे १२ महिने आपण इलेक्शन मोडमध्ये आहोत. आजच्या बैठकीत त्याबाबत दिशा ठरेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत आले की, काय भूकंप होणार अशी बातमी व्हायची. पण आता पालकमंत्री ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत येतात, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

समुद्धी महामार्गाने खऱ्याअर्थाने नुकसान झालं आहे. त्याच ॲाडीट करणार आहोत. पुण्यात मेट्रो आली. त्यासाठी हजारो कोटी रुपये उधळले. त्या ऐवजी बसेसची सुधारल्या करता आल्या असता. नागपूरमध्ये मेट्रोत वाढदिवस साजरे होतात. ती मेट्रो लॅासमध्ये आहे. या सरकारच्या काळात शाळा कमी आणि दारुची दुकानं वाढली आहेत, असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.
बॅनरवरील फोटोंबाबतही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. मी बॅनरच्या विरोधात आहे. अनधिकृत बॅनर लावू नये, असा निर्णय घ्यायला हवा, असं त्या म्हणाल्या. आता या सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा फोटो मोठा होत आहे. हेडगेवार यांना बाजूला ठेवून यशवंतराव चव्हाण यांचा विचार मांडला जातोय. पण अजून मोठी मजल मारायची आहे, असं त्या म्हणाल्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!