आदिवासी विद्यार्थिनीनी जेवणात भाजी मागितल्याने शिक्षिकेची मारहाण.
रिसोड तालुक्यातील देगाव येथे असलेल्या भावना पब्लिक स्कूलमध्ये कार्यालयामार्फत मेळघातील आदिवासी विद्यार्थीना प्रवेश देण्यात आला होता. या आदिवासी विद्यार्थिनीना सकाळचे शिळे जेवण देत असल्याने सदर विद्यार्थिंनीनी जेवणामध्ये भाजी मागितली व पोटभरण जेवण देण्याची मागणी केल्याने तेथील शिक्षिकेने त्यांना मारहाण करून त्यांना एका गाडीमध्ये गुरा- ढोरांसारखे कोंबून त्यांच्या गावी बाब गंभीर असून हा प्रकार रिसोड तालुक्यातील भावना पब्लिक स्कुलमध्ये घडला असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिने प्रसारित केले आहे. यामध्ये पिडीत विद्यार्थिनीनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकार मेळघाटचे ह्या आमदार राजकुमार पटेल यांना कथन करून त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. सदर प्रकार हा खा. भावना गवळी यांच्या शाळेत घडला असल्याने या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते याकडे वाशीमकरांचे लक्ष लागले आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत