
नैर्ऋत्य झिम्बाब्वेमधील एका हिऱ्याच्या खाणीजवळ हे खासगी विमान कोसळून भारतीय उद्योजक आणि त्यांचा मुलगा ठार झाला आहे. या अपघातात एकूण सहाजणांना प्राण गमवावे लागले आहे. भारतीय उद्योजक हरपाल रंधावा, त्यांचा मुलगा आमेर कबीर सिंह रंधावा आणि चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मशावा येथील जवामहांडे भागात झालेल्या विमान अपघातात खाण कंपनी ‘रियोजिम’चे मालक हरपाल रंधावा, त्यांचा मुलगा आणि अन्य चार जणांचा मृत्यू झाला आहे. रियोजिम कंपनी ही सोने आणि कोळशा खाणीचे उत्खनन करते. त्याशिवाय निकेल आणि तांबे शुद्धीकरण करणारी प्रमुख खाण कंपनी आहे.
रियोजिमच्या मालकीच्या सेसना 206 हे विमान शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी हरारे ते मुरोवा हिरा खाणीच्या दिशेने जात होते. या खाणीची मालकी रियोजिम कंपनीकडे आहे. त्यावेळी हा अपघात घडला. सिंगल इंजिन असलेले विमान मुरोवा डायमंड खाणीजवळ अपघातग्रस्त झाले. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हवेतच स्फोट झाला. या अपघातात विमानाचे पायलट क्रू आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत