महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वात मोठे समतावादी संविधान दिले

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
समता स्वतंत्र बंधुता आणि न्याय या विज्ञानवादी विचारांचा आधार घेत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली या निर्मितीमुळे संपूर्ण देश आज खूप चांगल्या पद्धतीने महासत्तेच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे , प्रस्थापित लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह समाजातील जाति व्यवस्थेचा त्रास सहन करत अनेक वर्षे मनुवादानी छळले आणी पिळले लागला ,चवदार तळ्याचा सत्याग्रह आसो दलितांचे हक्क आणि मंदिर प्रवेशासाठी खूप मोठी चळवळ उभा केली महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर एक मोठी सामाजिक क्रांती केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रयत्नामुळे वंचित घटकातील लोकांना न्याय मिळाला हा न्याय फक्त संविधानाच्या चौकटीत राहूनच मिळाला आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान आणि त्या संविधानातील मूलभूत तत्वे अनमोल आहेत त्या तत्वानी देशाला समता समानता आणि अखंडता दिली त्यामुळे भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन नळदुर्ग येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ॲड अरविंद बेडगे यांनी केले
नळदुर्ग येथे नुकतेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ व्या जयंती निमित्त पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या वेळेस ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते
प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्प दीप आणि धूप पूजन करण्यात आले
यावेळी ॲड अरविंद बेडगे , सुशांत भूमकर , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइं धाराशिव जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले यावेळी नळदुर्ग येथील आय पी एस अधिकारी मेघना मॅडम
एवढे नळदुर्ग नगरीचे बांधकाम सभापती शशिकांत पुदाले , पाणीपुरवठा सभापती तानाजी जाधव , आरोग्य व दिवाबत्ती सभापती सुमनताई ठाकूर , ॲड अरविंद बेडगे , नगरसेविका राणीताई सुरवसे , नगरसेविका साक्षी नळदुर्गकर , नगरसेवक तथा गटनेते दत्तात्रय दासकर , भाजपाचे नेते सुशांत भूमकर , श्रमिक पोद्दार , नगरसेवक तथा गटनेते मारुती खारवे , नगरसेविका कमलताई गायकवाड , पत्रकार आयुब शेख भगवंत सुरवसे , अजित चव्हाण , सामाजिक कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड , नगरसेवक प्रवीण गायकवाड , अभियंता स्वप्नील काळे ,भाजप लहुजी शक्ती सेनेचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी गायकवाड , उमेश नाईक जिल्हा परिषद स्पेशल शाळेचे मुख्याध्यापक शेख , सहशिक्षिका टिळक , अंगणवाडी शिक्षिका पिस्के ,आदिजन उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बौद्धाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरदीप लेझीम संघ यांच्या सर्व सदस्यांनी व तरुण भीमसैनिकाने परिश्रम घेतले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

