स्वातंत्र्याचे आत्मयज्ञ !

प्रा.मुकुंद दखणे,
यवतमाळ 9373011954
जयभीम जयभारत
संरक्षण, स्वतःचे रक्षण. कोणापासून संरक्षण?अनैसर्गिक मृतू पासून, स्वतःच्या होणार्या घातका पासून संरक्षण.कोण कोणाचा कसा आणि कोठे घात करेल?याची श्वासवती नसलेले हे विश्व आहे.म्हणूनच स्वतःवर विश्वास हा ठाम असायला पाहिजे.समाज व राष्ट्र निर्मितीचे एक कारण सुद्धा संरक्षण असते. पण, स्वातंत्र्या शिवाय चे संरक्षण हे कुचकामी असते. उलट, स्वातंत्र्यासाठी आत्मयज्ञ करायला हवे असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात.ते त्याठी ऐतिहासिक उदाहरण देतात. एकदा आयर्लंडच्या राष्ट्रीय पक्षाचे नेते श्री रेडमंड, अल्स्टर परगणाचे पुढारी कार्सन यांना म्हणाले, ‘वाटेल ते संरक्षण मागा, त्याला माझी ना नाही, परंतु तुम्ही आयर्लंड ला संमती द्या.’असे रेडमंड म्हणताच, कार्सन ते ऐकून चटदिशी वळला व आवेशयुक्त वाणीने वदला की, “मसणात जावू द्या
तुमचे संरक्षण, तुमची सत्ता आम्हास बिलकूल मान्य नाही.”राजा राजवाडे,हिंदु ब्राह्मणसत्ता,मुस्लिम सत्ता धुर्तपणे इंग्रजांनी संपविली,कारण स्वातंत्र्य म्हणजे काय? याचा अर्थच, बहुसंख्य हिंदुु,मुस्लिम यांना नसल्यानेच ते गुलामगिरीत सहज गुरफटून गेले. आजही स्वातंत्र्याच्या 77व्या वर्षात सुद्धा स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय?हे बहुतांश भारतीयांना,उच्च शिक्षित हिंदुु,मुस्लिम धार्मिक वेड असलेल्यांना न कळत असल्यानेच, हिंदुराष्ट्र,अर्थात ब्राह्मणराष्ट्र ,अर्थात मनुराष्ट, अर्थात रामराज्य अर्थातच
अभारतीय राष्ट्राची गोष्ट वारंवार होत आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मतानुसार, जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य अबाधित राहत नाही, तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य अबाधित राहत नाही. भारतीय संविधानाने, कायद्याने असामाजिक गुलामगिरी,जातीव्यवस्था, जातीभेद, धर्मभेद, स्त्री पुरुष भेद, अर्थभेद,भेदाभेद संपुष्टात आणली असली, तरी जमीनीवरील प्रत्यक्षात त्या अव्हाहतपणे असल्यानेच, भारतीय स्वातंत्र्य धोक्यात आहे.
भारतातील बहुमत हे राजकारणावर आधारलेले बहुमत नाही, तर भारतात ते जन्माला येते, ते
तयार केले जात नाही.हिंदु धर्म च हा तत्वा पेक्षा जातीवर, उचनीच जातीवर अवलंबून असल्यानेच आणि
हिंदुु बहुसंख्य असल्यानेच आपणाकडे जातीवाचक बहुमत आहे
आणि ते चिरकाल टिकणारे आहे आणि म्हणूनच, राजकीय बहुमत हे भारतात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, चिरकाल टिकणारे बहुमत नव्हे. राजकीय बहुमत हे अळवावरील पाण्याप्रमाणे आज आहे तर उद्या नाही. पण, जातीय बहुमत हे कायमचेच असल्यानेच, भारतात सर्वोच्च स्थान हे जातीय राजकारणाला आहे. याच कारणांस्तव भारतीयांचे सर्वोच्च, सर्वसामान्य प्रश्न, समस्या या पेक्षा धार्मिक कर्मकांड, धार्मिक वेड निर्माण करणारे राजकारण म्हणजे च
शाळा दवाखाना ह्या आवश्यक भारतीयांच्या गरजा असतांना, मंदीर निर्माण करण्याचे राजकारण केले जाते. मंदीराच्या अत्यांतीक राजकारणामुळे, संविधानाचे स्वातंत्र्य
धोक्यात येऊ पाहत आहे.
पण, ते तेवढेच सोपे सुद्धा नाही. कारण, जातीय राजकारणाला,भारतीयत्व शिक्षितपणामुळे व अल्प सुशिक्षितपणामुळे,तसेच आत्यंतिक स्वरूपाचा स्वातंत्र्याचे सुवर्ण आत्मज्ञान प्राप्त होत आहे, भारतीयांमध्ये.
स्वातंत्र्याची लागलेली चटक सुद्धा, स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यास मदत करीत असते तर गुलामगिरीत राहण्याची, जगण्याची सवय ही व्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात आणत असते. व्यक्ती स्वातंत्र्य हेच सामाजिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य असते. जेथे बहुसंख्य व्यक्ती स्वातंत्र्य संपुष्टात येते राष्ट्र स्वातंत्र्य गहाण होते. म्हणूनच, व्यक्ती स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवूनच आपले वर्तन करण्याचे कमीत कमी शिक्षणातून शिकले पाहिजे.
बाबासाहेब आंबेडकर यांचे मते, जगात चिरकाल शांतता,व स्वातंत्र्य नांदण्याच्या वाटेत, 1]साम्राज्य लोभ 2]वर्ण भेद, वर्ण द्वेष आणि 3]दारिद्र्य हे तीन प्रचंड अडथळे आहे. भारतात सर्वोच्च स्थानी मनुधर्म, ज्याचे गोंडस नावं आहे रामराज्य, उर्फ जातीब्राह्मण राज्य हा मोठा अडथडा, किंवा सामाजिक,राष्ट्र स्वातंत्र्याचा दुष्मन होय. तो बहुसंख्य ओबीसीं,एससी, एसटी,हिंदुसमाजाला लक्षात येऊ नये म्हणून, मंदिराचे, दैववादाचे धर्मकारण आघाडीवर केले जाते. ओबीसींचे अज्ञान हा फार मोठा स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा अडथळा होय. तर गरिबी, हा तिसरा स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा अडथळा होय, म्हणूनच, स्वातंत्र्याच्या
100 वर्षात,1] ब्राह्मणवाद उर्फ मनुवाद
उर्फ रामराज्याच्या वल्गना,2] बहुसंख्य,एससी, एसटी ओबीसी, हिंदु समाजातील अज्ञान दूर होणे व 3] दारिद्र्य, गरिबी भारतातून हद्दपार होणे काळाची गरज होय.तरच भारतीयांचे चालु स्वातंत्र्य अबाधित राहू शकते. शैक्षणिक क्षेत्रात आणि औद्योगिक क्षेत्रात तसेच आर्थिक सामर्थ्याचा संपूर्ण विकास, आमुलाग्र क्रांती घडवून आणणे हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मते सर्वोच्च उपाय होय. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की, धनसंचय करण्याच्या हक्का पेक्षाही व्यक्तीच्या सुसंस्कृत व सुखी जीवन मिळण्याच्या मुलभूत हक्कामुळे, स्वातंत्र्य हे अधिक प्रभावशाली अबाधित राहायला मदत मिळत राहते. आणि म्हणूनच,भारतीयांच्या सुसंस्कृत व सुखी जीवनाच्या विरूद्ध
धार्मिक वेड्या आणि जातीच्या बेड्या राजकारणाला कडाडून विरोध होत राहीला पाहिजे.तरच, हुकुमशाही बळकावण्याची शक्यता धुसर होईल.
स्वातंत्र्य संग्रमातून काँग्रेस चा जन्म झाला. टिळक,आगरकर,आणि गांधी आंबेडकर यांचेत वाद पेटला, प्रथम राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक स्वातंत्र्य?आज 77 वर्षा नंतर स्पष्ट आहे की,सामाजिक स्वातंत्र्य प्रथम निश्चित होऊन, समतेत परावर्तित होऊन, नंतर राजकीय स्वातंत्र्य प्राप्ती करून घेतली असती, तर आज जी वैदिक संघ मनुवादी पिलावळ, देशाला पुन्हा, आर्थिक सामाजिक परतंत्रात ढकलून, रामराज्याच्या गप्पा करीत सुटले आहे, ते कदापिही शक्य झाले नसते.निव्वळ राजकीय सत्तेच्या हेक्या पोटी राष्ट्रीय संपत्ती विकणारे, मुर्दाड राजकीय लोक, भ्रष्टाचारी मानसिकता पुनर्जन्मा आली नसती. शिवाजी महाराज, महात्मा फुले,गो.ग.आगरकर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज पर्यंत सर्वच राष्ट्रीय महामानवांना,सामाजिक समतेच्या पुरस्कारीत स्वातंत्र्य विरांना अपेक्षित राजकीय स्वातंत्र्य अबाधित व भरभक्कम झाले असते आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ,न्याय पुरस्कारीत, भारतीय संविधानावर शिंतोडे उडवु इच्छिणार्यांना सर्वोच्च न्यायालयाने फासावर चढविण्याची परंपरा रूढ केली असती, तर मनुसंघ
प्रवृती, सामाजिक स्वातंत्र्याचे दुष्मन, ब्राह्मणवाद समुळ कधीच नष्ट होऊन, सुसंस्कारित जीवन पद्धती,आरूढ होऊन सर्वसामान्य भारतीय जनतेला, स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद लुटता आला असता. दरोरोज, प्रकाशाची रात्रंदिन दीपावली ,सुख आनंद उपभोगता आले असते. संरक्षण हे आपोआप च स्वयंसिद्ध झाले असते.
मानवी समाजाच्या शासन पद्धतीत, असा एक काळ होता की, ज्यावेळी जूलमी राज्यांची अनियंत्रित सत्ता हेच एक शासनसंस्थेचे स्वरूप होते. कित्येक वर्षाच्या रक्तरंजीत लढ्या नंतर ती परिस्थिती बदलून,संसदीय लोकशाही आली. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ती लोकशाही निवडतांना, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची बुद्ध प्रेरणा आपल्या भारतीय संविधानात घेऊन, प्रतेक भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, संपत्ती व सुख, आनंद प्राप्त करण्याचा मौलिक अधिकार देणारे सहस्रक, अव्यक्त इच्छितांचे मुर्त स्वरूप देणारे आणि प्रत्येक नागरिकांचे स्वातंत्र्य, संरक्षण अबाधित राखणारे कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ व ह्या दोघांवर लक्ष ठेवून,नियंत्रण ठेवून अधिकार क्षेत्रात ठेवणारे सर्वोच्च न्यायमंडळ असतांना, संसदीय लोकशाही फक्त स्वातंत्र्याच्या 77 वर्षात खिळखिळी होऊ पाहत असण्याचे एकमेक कारण धार्मिक अज्ञान होय. आणि म्हणूनच दुसर्या कोणत्या देशापेक्षा भारतात वैज्ञानिक दृष्टिकोनी सज्ञान, वेगात पेरणे आवश्यक असतांना,तसा न्याय देतांना सुप्रीम कोर्टाने झोल खालल्यांनेच, ईव्हीएम मतदानातून भ्रष्ट मानसिकता राज्य करून, फोडतोडीचे राजकारण करून, संविधानात्म स्वातंत्र्य धोक्यात आणल्या जात आहे. पण समजदार भारतीय संविधानाला सर्वोच्च मानने सुरू केल्याने, आपले धार्मिक कर्मकांडीय अज्ञान दूर करु इच्छितांचे
प्रमाण जस जसे वाढत राहील, तसं तसे सामाजिक स्वातंत्र्य भरभक्कम होत राहुन, संविधानात्म सुसंस्कृत स्वातंत्र्य अबाधित राहण्यात मदत होणार च आहे. चाॅहे जाॅन जाये, हम हमारा स्वातंत्र्य,समता, बंधुभावाचे भारतीय संविधान कायम व तंदुरुस्त ठेवण्यात, निश्चित होंगे कामयाब!
भारतीय संविधानाने ठरविलेल्या कलंकित बाबी,स्वातंत्र्याचे दुष्मन मनुस्मृती,जातीव्यवस्था,वैदिक परंपरा, भ्रष्टाचार,अस्पृश्यतता, जातीब्राह्मणी शुद्र मानसिकता,गरीबी,दारिद्र्य, अज्ञान पुरस्कार, बेकारी, महागाई,अत्याचार प्रवृत्ती, लिंचीन, असहिष्णुत वर्तने पुन्हा पुन्हा डोके वर करणार नाही,याची काळजी घेऊनच भारतीयाने समजदारीने मतदानाचा हक्क बजवत असतांना घोटाळाबाज ईव्हीएम मशीन हद्दपार होण्यासाठी, क्रांतिकारक चळवळ उभारून,धोक्यात येऊ पाहणारे भारतीय स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची व तशी प्रत्येक भारतीयांनी शपथ घेऊन, या प्रजासत्ताक दिनी,26जानेवारी ला झेंडा वंदन घरोघरी करणे, स्वातंत्र्याचे आत्मयज्ञ ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत