महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

कामचोर मंत्री आणि लाचखोर नोकर!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे शासकीय प्रशासकीय कामाकडे लक्ष नाही.त्यांनी पदावर राहून फक्त राजकीय नाटक तमाशा जलसा केला.गरीब महिलांना लाडकी बहिण संबोधले.१५०० रूपये दिले ते महिलांच्या कल्याणासाठी नसून फक्त मतांचे प्रलोभन म्हणून दिले होते.

या महिलांनी सरळ तिजोरीत हात घालून पैसा काढला नाही.आधी तर यांनी अर्ज केला.सोबत आवश्यक कागदपत्रे जोडली .ती शिंदेंच्या नोकरांनी तपासली.ते नोकर दारूच्या नशेत होते का?कि शिंदेंनी दारूच्या नशेतच त्यांना सुचना दिल्या होत्या?जो अर्ज येईल तो मंजूर करा.पैशांची खिरापत वाटा.
आता त्या महिलांचे मत मिळून हे निवडून आले.आता त्या अर्जांची छाननी करीत आहे.यात २७०० महिला नोकरी करणाऱ्या आणि पगार घेणाऱ्या होत्या.काही महिलांनी तर दोन अनुदान उपटले.हे अनुदान सरकारी नोकरांच्या माध्यमातून दिले गेले.मला संशय येतो कि मुख्यमंत्री सोबत हे दारु तर प्याले नसतील?
ठाकरे, शिंदे आणि फडणवीस हे मुख्यमंत्री असताना संपुर्ण प्रशासन कामचोर आणि लांचखोर झालेले आहे.
आता जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र सरकार मधील अनेक मंत्री येऊन गेले.यांनी कधीही प्रशासकीय अधिकाऱ्यांना तत्पर कामाचे आदेश दिले नाहीत.
गिरीश महाजन नेहमीच नाटक, तमाशा,जलसा करीत असतात.कधी समर्थन रॅली,कधी तिरंगा रॅली .कधी ही रॅली तर कधी ती रॅली.जातात, नाचतात .फालतू वेळ घालवतात.यांनी इतका वेळ जामनेर तालुक्यातील शेतकरी समस्या सोडविण्यासाठी कधीच दिला नाही.कारण,यांचे कामचोर आणि लांचखोर नोकरांशी साटेलोटे आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा पुर्णपणे ढेपाळलेली आहे.यावल तालुक्यातील महिलेला बाळंतपणासाठी दवाखाना, डॉक्टर,नर्स किंवा आरोग्य सेविका उपलब्ध झाली नाही.अम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही.बिचारी रस्त्यावर बाळंत झाली.ती यांची बहिण नव्हती का?ज्या बहिणीला मदतीची गरज आहे, आवश्यक आरोग्य सेवेची गरज आहे तिच्याकडे यांनी का लक्ष दिले नाही? महाजन तर स्वताला आरोग्य दूत म्हणवून घेतात.चक्क महाजन यांच्या जिल्ह्यातील महिलेवर ही परिस्थिती ओढवली.काय कामाचे महाजन?काय कामाचे गुलाबराव?फक्त नौटंकी करण्यासाठी!
जळगाव जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे.जळगांव जिल्ह्यातील मंत्री तमाशगीर बनून जनतेची करमणूक करतात.जबाबदारी कडे लक्ष नाहीत.तर प्रशासकिय नोकर तरी का जबाबदारी ने कामे करतील? आमदार खासदार मंत्री फुकटचे मानधन उपटतात.तर नोकर सुद्धा फुकटचा पगार उपटतात.
या सरकारी नोकरांचा निषेध दिवस आम्ही १ जूनला सुरू करीत आहोत.१ जून २०२५ पासून दरवर्षी हा निषेध दिवस पाळण्यात येईल.जेणेकरून हरामाचा पगार घेणाऱ्या नोकरांना जाणिव व्हावी.आपण चुकत आहोत.फुकटचा पगार घेत आहोत.आतापर्यंत नागरिक नमस्कार करीत होते.तर यापुढे तिरस्कार करतील.नागरिकांना लुटून लुटून सात रांझण भरले आहेत.यांच्या लुटमारीचा लाभ बायको मुले घेतील पण यांच्या पापात बायको मुले सहभागी होणार नाहीत.हे पापक्षालन करण्यासाठी आता मरा मरा करीत तपश्चर्या करावी लागेल.

खूप लाड झाले काम चोरांचे,
खूप घबाड भरले ,लांचखोरांचे!
पापाचे रांझण भरले लुटारूंचे.
निषेध करा लबाड नोकरांचे!

…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!