राज्य सरकार आणि कृषी मंत्री असंवेदनशील आणि शेतकरी विरोधी, कोकाटेना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा – राजेंद्र पातोडे.

एकीकडे राज्य सरकारने नुकसान भरपाई मर्यादा तीन हेक्टर वरून दोन हेक्टर केली असून अवकाळी पावसाने देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्याचे नुकसानी बाबत
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं असंवेदनशील वक्तव्य करणारे कृषीमंत्री व राज्य सरकार दोघेही शेतकरी विरोधी असल्याची टीका वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,
पुराने झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत राज्य सरकारने कपात करण्याचा संतापजनक निर्णय घेतला आहे.तसेच, नुकसान भरपाई मर्यादा कमाल तीन हेक्टरऐवजी दोन हेक्टरपर्यंत करून मदत देण्याचा निर्ण घेवून शेतकरी विरोधी पवित्रा घेतला आहे.शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यावी, याचे निकष राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत राज्य सरकारने पूर्वीच निश्चित केले होते आणि त्यानुसारच डिसेंबर २०२३ पर्यंत मदत दिली जात होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने १ जानेवारी २०२४ रोजी एक शासन निर्णय काढला आणि मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादा यात वाढ केली होती.त्यानुसारच आतापर्यंत मदत दिली जात होती.मात्र सरकारने जुन्या शासन निर्णय आणि जुन्या दर आणि शेत मर्यादा नुसार नुकसान भरपाई देण्याचा शेतकरी विरोधी निर्णय घेतला आहे.
त्यातच बिनडोक आणि बोल घेवडा कृषी मंत्री म्हणून राज्यात अपलौकिक असलेल्या कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी पुन्हा शेतकऱ्याची थट्टा करणारे वक्तव्य केले आहे.मागील आठवडाभरात महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.शेतात उभ्या असलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली मात्र शेतकऱ्याचे नुकसानी बाबत
हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?असे वक्तव्य करून कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असून कोकाटे यांना मानसोपचार तज्ञ ह्यांचे देखरेखीत उपचारासाठी दाखल करा तसेच पीक नुकसान भरपाईचा १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णय नुसार शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी देखील वंचित बहुजन युवा आघाडीने केली आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत