पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरानी आपल्या देशातील सामाजिक राजकीय धार्मिक आर्थिक व भौगोलिक परिस्थितीचा बारकाईने आभ्यास केला : – अंहकारी

नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठया उत्सहात संपन्न
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
राजकरणातील बारकावे तत्व व्यवहारातील निती नियम व सुत्रे व आपल्या देशाची राजकीय सामाजिक धार्मिक आर्थिक व भौगोलिक परिस्थितीचा बारकाईने आभ्यास केला त्यामुळेच महाराजांच्या पक्षात ही सर्व राजकरणात व राज्यकारभार करण्यात त्या यशस्वी ठरल्या त्यांनी अनेक वस्तुशिल्प उभी केली तेथील कारागिराना काम मिळाले आपल्या संस्कतीचा वारसा जपण्यात ही त्या यशस्वी ठरल्या देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करुन हिंदु संकस्कृतीचे जतन करण्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे कार्य महान आहे असे नळदुर्ग शहर ब्राम्हण समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी नळदुर्ग येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना म्हटले.
नळदुर्ग येथे दि. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक बाबुराव पोतदार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यावेळी भाजपचे नळदुर्ग शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक बसवराज धरणे, शहर ब्राम्हण संघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विनायक अहंकारी, भाजयुमोचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार,भाजयुमोचे नळदुर्ग शहर अध्यक्ष गणेश मोरडे,उत्तम बनजगोळे, अक्षय भोई, विजय ठाकुर, शिवसेना शिंदे गटाचे बंडप्पा कसेकर, राजेंद्र ठाकुर, शिवसेनेचे नेताजी महाबोले,सन्नी भुमकर यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे ज्ञानेश्वर घोडके, दयानंद चौरे, प्रभाकर घोडके, पद्माकर घोडके, मारुती घोडके, सुहास येडगे, विलास येडगे, निखिल येडगे,अमर भाळे, अमित शेंडगे, दत्ता घोडके यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी बोलतांना विनायक अहंकारी यांनी म्हटले की अहिल्यादेवींचे कार्य जगात महान असुन मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पुरुषांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम राजे होते तर महिलांमध्ये सर्वोत्तम साम्राज्ञी म्हणुन अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. येणाऱ्या काळात वृक्षारोपण असेल किंवा अहिल्यादेवींचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम समिती करीत आहे असेही विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे. यावेळी ज्ञानेश्वर घोडके यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत