दिन विशेषदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

“आपण बुद्ध जयंती का साजरी करतो? बुद्धजयंती म्हणजे कापूर, नारळ आणि खाण्याच्या वस्तूंनी बुद्धाच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करणे असा नाही. बुद्ध जयंती साजरी करणे म्हणजे बुद्धाच्या जीवनातून आणि शिकवणीतून काहीतरी शिकून आपल्या जीवनात त्यांचे पालन करणे होय.”

-पेरियार ई. व्ही. रामासामी

जो बुध्दाच्या विचारांवर बोलतो असा व्यक्ती कधीही धार्मिक विधीशी जोडला नाही गेला पाहिजे. असं पेरियार यांचं स्पष्ट मत होतं. जी लोकं हिंदु धर्माचे सर्व धार्मिक विधी करतात आणि गौतम बुध्दाच्या विचारांवर आपले विचार झाडतात तो व्यक्ती ढोंगी असल्याचे पेरियार म्हणायचे. पेरियार म्हणतात:
“मला वाटते केवळ नास्तिक व्यक्तीनेच बुद्धावर बोलणे योग्य आहे. वेद, शास्त्र, पुराण यांवर विश्वास ठेवणारा माणूस जर बुद्ध या विषयावर बोलत असेल तर तो आपली बुद्धी लोकांना फसविण्यातच वापरत आहे. त्याला मी ढोंगीच म्हणेन. अशा माणसाने ज्यांचा तो आदर करतो अशा प्राचीन ऋषी किंवा महात्मा लोकांचा आधार घेत बुद्धाबद्दल काही तरी बोलणे ही असामान्य गोष्ट नाही.”

पेरियार बुध्दाच्या विचारांनी प्रेरित झाले होते आणि ते बुध्दाच्या विचारांचे सार नेहमीच आपल्या लिखाणातून आणि भाषणातून लोकांसमोर मांडतही होते.

पेरियार बुध्दाच्या ज्या विचारांनी प्रेरित झाले होते त्यातील मुख्य विचार खालील प्रमाणे आहेत:

1.मनुष्याने स्वतःला देवाशी सलग्न ठेवणे आवश्यक नाही.

  1. माणसाचे चारित्र्य आणि योग्य आचरण याच अधिक महत्व देण्याच्या गोष्टी आहेत.
  2. तर्कसंगत विचारांसह शहाणपण हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे.
  3. एखादी गोष्ट एखाद्या ऋषींनी सांगितली किंवा महात्माजींनी लिहिली म्हणून त्यावर विश्वास ठेवता येत नाही.
  4. प्रत्येक बुद्धिमान मानवाने स्वतःच्या बुद्धीने एखाद्या प्रस्तावाचे परीक्षण करणे आणि स्वतः सत्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. बुध्दाच्या शिकवणीत असलेल्या या लवचिकतेमुळेच पेरियार यांना बौद्ध धर्म हा ‘धर्म’ वाटत नव्हता आणि त्यात सहभागी होण्यात त्यांना आनंदही वाटत होता. पेरियार यांनी बुद्धाच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला होता. ते आपल्या लिखाणातून बुध्दाच्या चरित्राचे असंख्य दाखले देत. पेरियार म्हणतात: "जेव्हा २५०० वर्षांपूर्वी भारतात रानटी धार्मिक प्रथा होत्या, तेव्हा बुद्धाने आपल्या बुद्धिवादाने त्याविरोधात तीव्र प्रतिगामी विरोध पुकारला. तत्कालीन धर्माविरुद्ध तो निर्भीडपणे उभा राहिला होता; त्यांच्या शिकवणीला त्याकाळात झालेला मोठा विरोध हाच बुद्धाच्या महानतेचा आणि त्यांच्या शब्दाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. ज्या लोकांनी त्यांचा तर्कवादी व्यासपीठ नष्ट करण्यासाठी त्यांच्या नंतर लिहिले आणि बोलले, त्यांनी हादरलेल्या रानटी हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांची कहाणीच सांगितली आहे." बौद्ध धर्मातील मान्यता या इतर धर्मांहून कशा वेगळ्या आहेत आणि तो बुद्धीवादी लोकांसाठी कसा योग्य आहे हे सांगताना पेरियार म्हणतात: "हिंदु मान्यतेनुसार भगवान विष्णू हे वैष्णवांचे केंद्र आहे; पण बौद्ध धर्मासाठी बुद्धी हेच त्यांचे केंद्र असते. जो कोणी आपल्या बुद्धीचा वापर करतो तो बुद्धच असतो. सर्व लोक बुद्धिमत्तेने संपन्न आहेत परंतु जे बुद्धिमत्तेने त्याचा वापर करतात तेच बुद्ध असू शकतात. द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकानेसुद्धा खरे बौद्ध धर्मीय कसे असतात याचे वर्णन करताना जे बुद्धीचा वापर करतात आणि अंधश्रद्धेचा निषेध करतात ते बौद्ध असे म्हटले आहे." हिंदु धर्मात स्वतःला देव समजण्यात अडचण असते. आपण सर्व देव आहोत असं कधीही उच्चारले जात नाही. हिंदु धार्मियांकडून देवाला एवढं महत्व दिलं जातं कि त्याच्यासारखा तोच आणि आपण त्याच्याशी बरोबरी करूच शकत नाही, अशी हिंदु लोकांची मान्यता झालेली असते. अशी मान्यता एकप्रकारे त्यांना देवाच्या गुणांना स्वतःमध्ये उतरवून त्याप्रमाणे वागण्याच्या निर्बंधातून मुक्त करते आणि मनाप्रमाणे वागण्याची मोकळीकच देते. पण बौद्ध धर्मात आपणच बुद्ध आहोत आणि आपल्या बुद्धीतच बुध्दाचे केंद्र आहे अशी वाच्यता केल्याने त्यांच्याकडून बुद्धीनियंत्रित आचरण होऊ शकते. लोकांनी आपण सांगितलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नये असं स्वतः बुद्धानेही सांगितले होते. त्याने लोकांना आपले शब्द तपासून पाहण्याचे आणि आपल्या बुद्धिमत्तेनुसार ते चाळून मग स्वीकारण्याचे आवाहन केले होते. काय योग्य आणि काय अयोग्य हे तपासण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेला तत्त्वत्त्यांचे तत्त्वज्ञान या काळात उपयोगाला येईलच असे नाही. त्यांचे बरेचसे तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी कालबाह्य ठरलेले असू शकते. त्यामुळे त्या विचारांशी चिटकून राहणे गरजेचे नाही. हे विचार गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानालाही लागू होतो असं पेरियार यांचे मत होतं. आपला हा विचार पटवून देण्यासाठी पेरियार म्हणतात: "गौतम बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी लोकांतील निरक्षरता दूर करण्यासाठी ज्या तत्त्वांचा उपदेश केला त्यासाठी त्यांच्याकडून जे काही शब्द बोलले गेले ते सर्व आजच्या काळात शंभर टक्के खरे असू शकत नाही. आजच्या काळात बुद्धाचे शब्द शब्दशः घेणे, हे माझ्या मते नास्तिकतेचे दुसरे रूप आहे. लोक तेव्हा स्वर्गाकडे उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि फक्त व्यापक वैशिष्ट्ये जाणून घेऊ शकत होते. आज आपण शक्तिशाली दुर्बिणींद्वारे पाहतो आणि सूर्यावरील काळे डाग तपासतो. केवळ प्राचीन लोकांना जे माहीत होते त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मानवी सर्जनशील बुद्धिमत्ता आणि हेतुपूर्ण प्रगती मर्यादित करणे होय. प्रगतीच्या काळात ज्ञानात सुधारणा होते आणि प्रगतीच्या संदर्भात आपण आपल्या कल्पना समायोजित केल्या पाहिजेत असे प्रतिपादन बौद्ध धर्मासाठी खरे ठरेल. अंतिम शब्द म्हणून जुन्या कल्पनांना चिकटून राहणे म्हणजे बौद्धिक मागासलेपणाचा विश्वासघात करणे आणि बुद्धिवादातील सर्व प्रगती थांबवणे होय. बुद्धाचा उदय अशा वेळी झाला जेव्हा आर्यवादाने देशाला आदिम रानटी अतार्किक भूमी बनवले होते. ज्या पुरुषांनी शास्त्रे आणि पुराणे लिहिली ते त्यांच्या साम्राज्यवादी वसाहतवादी प्रवृत्तींना अनुरूप त्यांच्या पद्धतीने बुद्धिमान होते पण जनसामान्यांबाबत त्यांनी कधीच चिंता केली नव्हती हे नक्की. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी जे काही विचार मांडले त्याला काही मर्यादा होत्या. त्याकाळातले समजले गेलेले सर्वात मोठे कार्य देखील त्यावेळच्या उपलब्ध बुद्धिमत्तेपेक्षा किंवा मानवजातीने साधलेल्या प्रगतीपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे त्यावेळच्या ऋषीमुनींनी किंवा बुद्धांनी किंवा तिरुवल्लुवरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट हा शेवटचा शब्द आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. तरीही आपण बुद्ध आणि थिरुवल्लुवर यांना सन्मानित केले पाहिजे कारण ज्या काळात लोक रानटी होते आणि बहुसंख्य लोक फायद्यासाठी गुलाम म्हणून काम करत होते अशा वेळी हिंदू धर्म आणि समाजाबद्दल तर्कवादी दृष्टीकोन स्पष्ट करण्याचे धैर्य त्यांच्यात होते. त्यांच्यामुळे नागरिकांच्या असीम लहान वर्गाला दिलासाच मिळाला."

१९५४ मध्येच गौतम बुद्धांच्या २५०० व्या जयंतीनिमित्त बर्मा येथे भरलेल्या विश्व बौद्ध संमेलनातही ते आंबेडकरांसोबत सहभागी झाले होते. मात्र असं असतानाही त्यांनी आंबेडकरांप्रमाणे बौद्ध धर्माची दिक्षा घेण्याचा कधी प्रयत्नही केला नव्हता. धर्म ही बुद्धिवंतांची गरज नसते या युक्तीवर असलेला त्यांचा विश्वास त्यांना ही कृती करण्यास रोखत असावा.
पेरियारच्या मनात बौद्ध धर्माबाबत आदर होता आणि त्यांना बुद्धाची शिकवण आवडतही होती ही गोष्ट खरी असली तरी त्यासाठी विधिपूर्वक त्याच्या विचारांशी बांधले जाण्याची आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याची शपथ घेणे म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारे कर्मकांडच होतं.

सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

(पेरियार- मिथक आणि वास्तव या पुस्तकातील प्रकरणाचा सारांश)

~दिपक गायकवाड

” बुद्धजयंती म्हणजे कापूर, नारळ आणि खाण्याच्या वस्तूंनी बुद्धाच्या चित्राची किंवा मूर्तीची पूजा करणे असा नाही. बुद्ध जयंती साजरी करणे म्हणजे बुद्धाच्या जीवनातून आणि शिकवणीतून काहीतरी शिकून आपल्या जीवनात त्यांचे पालन करणे होय.”

-पेरियार ई. व्ही. रामासामी

जो बुध्दाच्या विचारांवर बोलतो असा व्यक्ती कधीही धार्मिक विधीशी जोडला नाही गेला पाहिजे. असं पेरियार यांचं स्पष्ट मत होतं. जी लोकं हिंदु धर्माचे सर्व धार्मिक विधी करतात आणि गौतम बुध्दाच्या विचारांवर आपले विचार झाडतात तो व्यक्ती ढोंगी असल्याचे पेरियार म्हणायचे. पेरियार म्हणतात:
“मला वाटते केवळ नास्तिक व्यक्तीनेच बुद्धावर बोलणे योग्य आहे. वेद, शास्त्र, पुराण यांवर विश्वास ठेवणारा माणूस जर बुद्ध या विषयावर बोलत असेल तर तो आपली बुद्धी लोकांना फसविण्यातच वापरत आहे. त्याला मी ढोंगीच म्हणेन. अशा माणसाने ज्यांचा तो आदर करतो अशा प्राचीन ऋषी किंवा महात्मा लोकांचा आधार घेत बुद्धाबद्दल काही तरी बोलणे ही असामान्य गोष्ट नाही.”

पेरियार बुध्दाच्या विचारांनी प्रेरित झाले होते आणि ते बुध्दाच्या विचारांचे सार नेहमीच आपल्या लिखाणातून आणि भाषणातून लोकांसमोर मांडतही होते.

पेरियार बुध्दाच्या ज्या विचारांनी प्रेरित झाले होते त्यातील मुख्य विचार खालील प्रमाणे आहेत:

1.मनुष्याने स्वतःला देवाशी सलग्न ठेवणे आवश्यक नाही.

  1. माणसाचे चारित्र्य आणि योग्य आचरण याच अधिक महत्व देण्याच्या गोष्टी आहेत.
  2. तर्कसंगत विचारांसह शहाणपण हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे.
  3. एखादी गोष्ट एखाद्या ऋषींनी सांगितली किंवा महात्माजींनी लिहिली म्हणून त्यावर विश्वास ठेवता येत नाही.
  4. प्रत्येक बुद्धिमान मानवाने स्वतःच्या बुद्धीने एखाद्या प्रस्तावाचे परीक्षण करणे आणि स्वतः सत्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. बुध्दाच्या शिकवणीत असलेल्या या लवचिकतेमुळेच पेरियार यांना बौद्ध धर्म हा ‘धर्म’ वाटत नव्हता आणि त्यात सहभागी होण्यात त्यांना आनंदही वाटत होता. पेरियार यांनी बुद्धाच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला होता. ते आपल्या लिखाणातून बुध्दाच्या चरित्राचे असंख्य दाखले देत. पेरियार म्हणतात: "जेव्हा २५०० वर्षांपूर्वी भारतात रानटी धार्मिक प्रथा होत्या, तेव्हा बुद्धाने आपल्या बुद्धिवादाने त्याविरोधात तीव्र प्रतिगामी विरोध पुकारला. तत्कालीन धर्माविरुद्ध तो निर्भीडपणे उभा राहिला होता; त्यांच्या शिकवणीला त्याकाळात झालेला मोठा विरोध हाच बुद्धाच्या महानतेचा आणि त्यांच्या शब्दाच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. ज्या लोकांनी त्यांचा तर्कवादी व्यासपीठ नष्ट करण्यासाठी त्यांच्या नंतर लिहिले आणि बोलले, त्यांनी हादरलेल्या रानटी हिंदू धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांची कहाणीच सांगितली आहे." बौद्ध धर्मातील मान्यता या इतर धर्मांहून कशा वेगळ्या आहेत आणि तो बुद्धीवादी लोकांसाठी कसा योग्य आहे हे सांगताना पेरियार म्हणतात: "हिंदु मान्यतेनुसार भगवान विष्णू हे वैष्णवांचे केंद्र आहे; पण बौद्ध धर्मासाठी बुद्धी हेच त्यांचे केंद्र असते. जो कोणी आपल्या बुद्धीचा वापर करतो तो बुद्धच असतो. सर्व लोक बुद्धिमत्तेने संपन्न आहेत परंतु जे बुद्धिमत्तेने त्याचा वापर करतात तेच बुद्ध असू शकतात. द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकानेसुद्धा खरे बौद्ध धर्मीय कसे असतात याचे वर्णन करताना जे बुद्धीचा वापर करतात आणि अंधश्रद्धेचा निषेध करतात ते बौद्ध असे म्हटले आहे." हिंदु धर्मात स्वतःला देव समजण्यात अडचण असते. आपण सर्व देव आहोत असं कधीही उच्चारले जात नाही. हिंदु धार्मियांकडून देवाला एवढं महत्व दिलं जातं कि त्याच्यासारखा तोच आणि आपण त्याच्याशी बरोबरी करूच शकत नाही, अशी हिंदु लोकांची मान्यता झालेली असते. अशी मान्यता एकप्रकारे त्यांना देवाच्या गुणांना स्वतःमध्ये उतरवून त्याप्रमाणे वागण्याच्या निर्बंधातून मुक्त करते आणि मनाप्रमाणे वागण्याची मोकळीकच देते. पण बौद्ध धर्मात आपणच बुद्ध आहोत आणि आपल्या बुद्धीतच बुध्दाचे केंद्र आहे अशी वाच्यता केल्याने त्यांच्याकडून बुद्धीनियंत्रित आचरण होऊ शकते. लोकांनी आपण सांगितलेल्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नये असं स्वतः बुद्धानेही सांगितले होते. त्याने लोकांना आपले शब्द तपासून पाहण्याचे आणि आपल्या बुद्धिमत्तेनुसार ते चाळून मग स्वीकारण्याचे आवाहन केले होते. काय योग्य आणि काय अयोग्य हे तपासण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेला तत्त्वत्त्यांचे तत्त्वज्ञान या काळात उपयोगाला येईलच असे नाही. त्यांचे बरेचसे तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी कालबाह्य ठरलेले असू शकते. त्यामुळे त्या विचारांशी चिटकून राहणे गरजेचे नाही. हे विचार गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानालाही लागू होतो असं पेरियार यांचे मत होतं. आपला हा विचार पटवून देण्यासाठी पेरियार म्हणतात: "गौतम बुद्धांनी २५०० वर्षांपूर्वी लोकांतील निरक्षरता दूर करण्यासाठी ज्या तत्त्वांचा उपदेश केला त्यासाठी त्यांच्याकडून जे काही शब्द बोलले गेले ते सर्व आजच्या काळात शंभर टक्के खरे असू शकत नाही. आजच्या काळात बुद्धाचे शब्द शब्दशः घेणे, हे माझ्या मते नास्तिकतेचे दुसरे रूप आहे. लोक तेव्हा स्वर्गाकडे उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि फक्त व्यापक वैशिष्ट्ये जाणून घेऊ शकत होते. आज आपण शक्तिशाली दुर्बिणींद्वारे पाहतो आणि सूर्यावरील काळे डाग तपासतो. केवळ प्राचीन लोकांना जे माहीत होते त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मानवी सर्जनशील बुद्धिमत्ता आणि हेतुपूर्ण प्रगती मर्यादित करणे होय. प्रगतीच्या काळात ज्ञानात सुधारणा होते आणि प्रगतीच्या संदर्भात आपण आपल्या कल्पना समायोजित केल्या पाहिजेत असे प्रतिपादन बौद्ध धर्मासाठी खरे ठरेल. अंतिम शब्द म्हणून जुन्या कल्पनांना चिकटून राहणे म्हणजे बौद्धिक मागासलेपणाचा विश्वासघात करणे आणि बुद्धिवादातील सर्व प्रगती थांबवणे होय. बुद्धाचा उदय अशा वेळी झाला जेव्हा आर्यवादाने देशाला आदिम रानटी अतार्किक भूमी बनवले होते. ज्या पुरुषांनी शास्त्रे आणि पुराणे लिहिली ते त्यांच्या साम्राज्यवादी वसाहतवादी प्रवृत्तींना अनुरूप त्यांच्या पद्धतीने बुद्धिमान होते पण जनसामान्यांबाबत त्यांनी कधीच चिंता केली नव्हती हे नक्की. प्राचीन काळातील ऋषीमुनींनी जे काही विचार मांडले त्याला काही मर्यादा होत्या. त्याकाळातले समजले गेलेले सर्वात मोठे कार्य देखील त्यावेळच्या उपलब्ध बुद्धिमत्तेपेक्षा किंवा मानवजातीने साधलेल्या प्रगतीपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळे त्यावेळच्या ऋषीमुनींनी किंवा बुद्धांनी किंवा तिरुवल्लुवरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट हा शेवटचा शब्द आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. तरीही आपण बुद्ध आणि थिरुवल्लुवर यांना सन्मानित केले पाहिजे कारण ज्या काळात लोक रानटी होते आणि बहुसंख्य लोक फायद्यासाठी गुलाम म्हणून काम करत होते अशा वेळी हिंदू धर्म आणि समाजाबद्दल तर्कवादी दृष्टीकोन स्पष्ट करण्याचे धैर्य त्यांच्यात होते. त्यांच्यामुळे नागरिकांच्या असीम लहान वर्गाला दिलासाच मिळाला."

१९५४ मध्येच गौतम बुद्धांच्या २५०० व्या जयंतीनिमित्त बर्मा येथे भरलेल्या विश्व बौद्ध संमेलनातही ते आंबेडकरांसोबत सहभागी झाले होते. मात्र असं असतानाही त्यांनी आंबेडकरांप्रमाणे बौद्ध धर्माची दिक्षा घेण्याचा कधी प्रयत्नही केला नव्हता. धर्म ही बुद्धिवंतांची गरज नसते या युक्तीवर असलेला त्यांचा विश्वास त्यांना ही कृती करण्यास रोखत असावा.
पेरियारच्या मनात बौद्ध धर्माबाबत आदर होता आणि त्यांना बुद्धाची शिकवण आवडतही होती ही गोष्ट खरी असली तरी त्यासाठी विधिपूर्वक त्याच्या विचारांशी बांधले जाण्याची आणि बौद्ध धर्म स्वीकारण्याची शपथ घेणे म्हणजे त्यांच्यासाठी एकप्रकारे कर्मकांडच होतं.

सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…

(पेरियार- मिथक आणि वास्तव या पुस्तकातील प्रकरणाचा सारांश)

~दिपक गायकवाड

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!