दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

अहिंसात्मक सत्याग्रह (20 मार्च – चवदार तळे)

शोधू नको भिमाला
मूर्तीत दगडांच्या
सापडू दे भीम माझा
कृतीत माणसांच्या…!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा गुण गौरव गाणाऱ्या चारच ओळी पण अर्थपूर्ण अशा – सापडू दे भीम, माझा कृतीत माणसाच्या…!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा आजचा दिन *समतेच्या हक्कासाठी चवदार तळ्यावरील अहिंसात्मक सत्याग्रह* यशस्वी करून अज्ञानी समाजाला साथसंगत घेऊन खुलेआम पानवठे खुले करून दिले तसेच सामाजिक समतेच्या संपूर्ण अंगाला स्पर्श करून संघर्ष आणि चळवळ राबविली. म्हणूनच ते म्हणतात –
*हिंदुस्थानच्या त्रिकोणात, कानाकोपऱ्यात माझे नाव गाजलेले असून जो कोणी माझा इतिहास लिहिला तो अपुरा पडेल* यावरून त्यांच्या कार्याची आपणा सर्वांना महती कळेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा *बहुजन हिताय बहुजन सुखाय* या स्वरूपाचा असून तो अतिशय प्रखर आहे. त्यांचे भारताविषयी व भारतीयांविषयी प्रेम, ज्वलंत व ओतप्रत होते. त्यांच्यासमोर जेव्हा अस्पृश्य (आताचे बौद्ध) समाजाचे मूलभूत हक्क आणि एकसंध भारत असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला तेव्हा त्यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आपल्या दोन हजार वर्षापासून गुलामगिरीत दडपून ठेवलेल्या अस्पृश्य समाजाचाही बळी देण्यास मागे पुढे पाहिले नाही. *आपणास गुलामगिरीतून मुक्तता करून मानवी स्वातंत्र्यच बहाल केले. इतकेच नव्हेतर मूलभूत अधिकार मिळवून देऊन सर्वांगीण उन्नतीच्या वाटा मोकळ्या करून दिल्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय व उद्दिष्टे उच्च नैतिक कोटीचे होते असे म्हटल्यास वावगे ठरू नये*.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगात क्रांतीचे प्रणेते ठरून सामाजिक , धार्मिक, सांस्कृतिक , आर्थिक, शैक्षणिक राजकीय इत्यादी जीवनाच्या सर्व क्षेत्रात अमुलाग्र क्रांती घडवून आणण्यात केवळ पोषकच नव्हे तर पायाभूत ठरले तसेच जातीयवाद्यांच्या नजरेत असलेला बहुजन समाजातील मानवी समाज हा त्यांनी भारताच्या नकाशावरून पार पुसून टाकला होता. अशा समाजाला त्यांनी पहिल्यांदा त्यांचे मूलभूत हक्क प्राप्त करून दिले आणि त्यांनी भारताच्या राजकीय नकाशावर अढळ स्थान प्रस्थापित करून देऊन समतेची मजबूत पायाभरणी करून ठेवली. परिणामतः या बौद्ध आणि बहुजन समाजाला दोन हजार वर्षानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात विलीन होण्याची संधी प्राप्त करून देण्याचे महान कार्य केले. हे कार्य केवळ पृथ्वी मोलाचेच नव्हे तर जगाच्या इतिहासात प्रथम घडवून आलेली एकमेव द्वितीय घटना आहे*.

आजच्या दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या कार्यास स्मरून त्रिवार वंदन ! ????????????

दि.20 मार्च 24.

हंसराज कांबळे
8626021520
नागपूर.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!