देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत उच्चवर्णीयांचा सुद्धा सहभाग होता.

अनिल वैद्य

युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर विशेषांक.134व्या जयंती निमित्ताने नाशिक येथे प्रकाशित करण्यात आला.
प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल वैद्य माजी न्यायाधीश होते, प्रमुख अतिथी जेष्ठ पत्रकार सुरेश निकुंभ, ज्येष्ठ कार्यकर्ते शशीभाई उन्हवने आणि नाशिक शहर पोलिस उपयुक्त किरणकुमार चव्हाण आणि पोलिस उपायुक्त मोनिका राऊत होत्या.कार्यक्रमाचे आयोजन जेष्ठ कार्यकर्ते अविनाश अहेर आणि विशेषांकाचे संपादक सतीश रूपवते यांनी केले.
या प्रसंगी पत्रकारनरेंद्र जोशी आणि इतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. तो धागा पकडून अनिल वैद्य यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महाड प्रकरणाचा
संदर्भ दिला.या प्रकरणात उच्चवर्णीय लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरां विरुद्ध खटला दाखल केला होता.मनाई हुकूम मागितला होता.त्यांचे म्हणणे असे होते की अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श करू नये असे आमच्या धर्मात आहे म्हणून मनाई हुकूम द्यावा.न्यायालयनेत्यांचे ऐकून मनाई हुकूम दिला होता याला उत्तर देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बाजूने ब्राम्हण पंडित पालेय शास्त्री,शंकराचार्य कुर्तकोटी, रामभाऊ सावरकर (वि दा सावरकर यांचे भाऊ) यांच्या साक्ष दिल्या त्यांनी सांगितले की,अस्पृश्यांनी सार्वजनिक पाण्याला स्पर्श करू नये असा हिंदू धर्म शास्त्रात उल्लेख नाही.त्या मुळे न्यायालयाने दिलेला मनाई हुकूम रद्द झाला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर ती केस जिंकले. अनिल वैद्य यांनी दुसरे उदाहरण दिले की, बाळ गंगाधर टिळक यांचा मुलगा श्रीधरपंत टिळक हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समता संघाचे पुण्याचे उपाध्यक्ष होते. त्यांनी आत्महत्या केली तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी पत्र लिहिले होते व डॉ बाबासाहेब आंबेडकरां प्रति आदर व्यक्त केला होता. श्रीधरपंत यांच्या मृत्यूचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना फार दुःख झाले होते.
मनुस्मृती जळणारे सहस्त्रबुद्धे हे ब्राम्हण होते. सीकेपी चित्रे,चिटणीस हे सर्व उच्चवर्णीय लोक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते.
सिद्धार्थ महाविद्यालयात
चांगले शिक्षक असावेत असा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा कटाक्ष असायचा म्हणून ब्राम्हण प्राध्यापक अधिक होते.अलीकडच्या काळात सचिन तेंडुलकर यांचे वडील प्रा रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक होते.
इत्यादी अनेक इतर समाजाचे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते.कामराण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनिल वैद्य म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त भाषण लेखन स्वातंत्र्य नाही तर विडंबन करणे, विनोद, गायन, नृत्य, संगीत वाजविणे हे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधान कलम 19 ने दिलेले आहे.सविधानिक मूल्यांची जोपासना केली पाहिजे .त्या साठी
सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रकाशन समारंभाचा निरोप समारंभ अविनाश अहेर यांनी केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!