
शनिवारी पहाटे पुरामध्ये सुरक्षारक्षक बाबूजी पंढरीनाथ उमरेडकर वाहून गेले. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या पंचवीस वर्षीय मुलीशी फोनवर बोलून ‘पावसात अडकलोय बेटा, लवकरच घरी येतो’ असे सांगितले. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य असल्याने मुलीला वडिलांचा मृतदेहच बघायला मिळाला.
पावसाच्या तडाख्याने शहरातील अनेक कुटुंबांची वाताहात झाली. तब्बल पाच जणांना जीव गमवावा लागला. यातील सुरक्षारक्षक बाबूजी उमरेडकर (वय ६५, रा. अष्टविनायकनगर) यांचा मृत्यू मनाला चटका लावून गेला. उमरेडकर हे डॉ. संचेती यांच्या रुग्णालयात सुरक्षारक्षक होते.
शुक्रवारी रात्री उशिरा पाऊस कोसळत असताना ड्युटी संपवून घरी निघालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. शनिवारी पंचशील चौकाजवळील पुलाच्या कोसळलेल्या भागात त्यांचा मृतदेह सापडला.
विशेष म्हणजे, पुरात अडकले असताना त्यांनी मुलगी राधिका हिला फोन केला. यावेळी तिला पावसात अडकलो असून, कमी होताच घरी येतो असे सांगितले. मात्र, बराच उशीर झाल्यावरही बाबा घरी न परतल्याने कुटुंबियांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ते सायकलसह पाण्यात वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह वाहून पंचशील पुलाच्या कोसळलेल्या भागात अडकला. शनिवारी त्यांचा मृतदेह अडकल्याचे दुपारी उघडकीस आले. सुमारे चार तासांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटली. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत