
दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006
सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून जोरदार वादंग सुरू आहे. गेल्या काही वर्षात राज्याची पुरती वाट लागली आहे. राज्यभर गुन्हेगारीचे थैमान सुरू आहे. राज्याचा गायपट्टा झाला आहे. कायदा-व्यवस्था गुन्हेगारांनी फाट्यावर मारली आहे. गुन्हेगार आणि सभागृहात कायदा करणारे मांडीला मांडी लावून फिरतायत. राज्याची अवस्था दयनीय आहे. राज्य आर्थिक आघाडीवर कंगाल होत चालले आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. बेरोजगारीचा टक्का वाढतो आहे. महिलांच्यावरील अत्याचाराने टोक गाठले आहे. सरकार नावाची संस्था लुळी-पांगळी झाली आहे. सत्तेतल्या बोक्यांना याच्याशी काही देणेघेणे नाही. सत्ताधारी पक्ष प्रबळ आहे. तो कमालीचा धुर्त, कपटी, कावेबाज व कांगावेखोर आहे. त्याच्यासमोर विरोधकांनी आपल्या शेपट्या घातल्या आहेत. त्यांच्यात लढण्याचे अवसान राहिले नाही. त्यामुळेच सत्ताधारी आपले अपयश, नाकर्तेपणा लपवण्यासाठी महत्व नसलेल्या मुद्द्यांना समोर आणत आहेत. प्रशांत कोरटकर, राहूल सोलापुरकर यांनी छत्रपती शिवरायांचा भयंकर अवमान केला. या नालायकांची हरामखोरी आणि सरकार म्हणून असलेला आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठीच औरंगजेबाला ढाल म्हणून वापरले जात आहे. खरेतर सरकारच स्वत: दंगली भडकावताना दिसत आहे. सत्तेतला पक्षच राज्यात दंगली घडाव्यात, जाळपोळ व्हावी याचे नियोजन करतो आहे. सरकारात मंत्री असलेला राणे ज्या पध्दतीने बोलतो ते पाहता सरकारच्या डोक्यात काय आहे ? याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. औरंग्याला कुणीही इथे मानत नाही. त्याचे कुणीही समर्थन करत नाही. या राज्यातला मुसलमान शिवरायांच्या काळातही छत्रपतींशी इमान राखून होता आणि आजही या मातीशी त्याचे इमान आहे. त्याचे इमान कधीच विकले गेले नव्हते. तसे असते तर शिवरायांच्या सैन्यात मुसलमान कधीच नसते. इथला मुसलमान तेव्हाही छत्रपतींचा निष्ठावंत होता आणि आताही आहे. अनाजीपंत आणि त्याच्या औलादींनीच शिवरायांशी आणि स्वराज्याशी गद्दारी केली आहे. राज्यातला एकही माणूस औरंगजेबाचे समर्थन करणार नाही. औरंग्याची कबर कुणी नुकतीच बांधलेली नाही. असे असताना त्याच्या कबरीचा मुद्दा करत राज्यातले वातावरण का बिघडवले जात आहे ? या मागे नक्की काय कारस्थान आहे ? बहूजन समाजाला याचा गांभिर्याने विचार करावा लागेल.
सरकारवाल्यांच्या डोळ्यात औरंगजेबाची कबर खुपतेय की छत्रपती शिवरायांचा अलौकीक पराक्रम ? याचा शोध घ्यावा लागेल. पेशवाई मानसिकतेच्या लोकांनी आजवर कधीच शिवरायांचे महत्व मान्य केलेेले नाही. नेहमीच त्यांचा मोठेपणा नाकारला आहे. एकतर त्यांच्या कर्तृत्वाला दैवी झालर देण्याचा प्रयत्न केला आहे किंवा त्यांना नसलेला गुरू जोडून ते कर्तृत्व तथाकथित गुरूकडे देण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी राजे मोठे नव्हतेच ते केवळ आमच्या जातीचे दादोजी कोंडदेव, रामदास त्यांचे गुरू होते म्हणून ते घडले, म्हणून ते पराक्रमी, म्हणून ते शुर, जात म्हणून आमची चाणाक्ष, हुशार पंतमंडळी त्यांच्या सोबत होती म्हणून ते मोठे असेच नेहमी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुरंदरेंनी तर बाजीप्रभू देशपांडेना मोठेपण देताना त्यांनी जे लिहीलय ते भयंकर आहे. शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली अशी भाकडकथा रचून त्यांच्या मनगटातले तलवारीचे सामर्थ्यसुध्दा नाकारण्याचा पध्दतशीरपणे प्रयत्न केला. त्यानंतर शिवरायांना अवतार ठरवत त्यांचे माणूस म्हणून असलेले उत्तुंग व्यक्तीमत्व नाकारण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी शिवरायांची मंदिरे, आरत्या वगैरे कारस्थानं रचली गेली. ऐनकेन प्रकारे शिवरायांचे मोठेपण नाकारले आहे किंवा ते इतर कुणामुळे तरी होते असे भासवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यासाठी नाना खटपटी केल्या, नाना कारस्थानं केली. शिवरायांच्या हयातीत या भडव्यांनी त्यांना विष देवून मारलच. पण गुडघीच्या रोगाने शिवरायांचा मृत्यू झाला अशी ऐतिहासिक थाप ठोकली. या जगात आजवर कुणीच गुडघी नावाच्या रोगाने मेले नाही. शिवरायांच्या आधीही आणि नंतरही कुणी गुडघीच्या रोगाने मेलेले नाही. जसे संत तुकोबारायांच्या आधीही कुणाला विमानाने वैकुंठाला नेले नाही आणि त्यानंतरही कुणाला नेले नाही. त्याप्रमाणेच छत्रपती शिवराय सोडून कुणीच सदर रोगाने मृत्यू पावले नाही. केवळ महाराष्ट्राच्या, भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात असा रोग कुणालाच झाला नाही, कुणीच त्या रोगाने मेल्याची कुठेही नोंद नाही. असे असताना या पाजी हलकटांनी ती थाप इतिहासात घुसडली आणि लोकांच्या डोक्यात उतरवली. त्यानंतर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी राजे यांचीही घातपाताने हत्या करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. शेवटी त्यात त्यांना यश आलेच. औरंगजेबाला हाताशी धरत याच कारस्थानी भडव्यांनी शंभूराजांची हत्या घडवून आणली आणि ते खापर शंभूराजांच्या मेहूण्यांच्यावर फोडले. यांच्या हातात लेखण्या होत्या त्याचा पुरेपुर वापर करत हे कारस्थानी भामटे इतिहासाला डसले. त्यांच्या लेखणीरूपी नागिनीच्या दंशाने बहूजनांच्या अनेक पिढ्या बरबाद केल्या. शिवशाही नष्ठ झाल्यानंतर शिवरायांची समाधी उपेक्षित होती. महात्मा फुलेंनी रायगडावर जाऊन ती शोधली व स्वच्छ केली. शिवरायांची समाधी शोधून काढल्यावर महात्मा फुलेंना पुण्यातल्या जातीयवादी भटांनी शिव्यांची लाखोली वाहिली. ‘कुणबंटाचा राजा’ म्हणून हे कारस्थानी बावळे शिवाजीराजांना हिनवत होते. त्यानंतर जेव्हा या रयतेच्या राजाचा पुतळा पुण्यात उभा करायचा होता तेव्हा पुण्यातले जातीयवादी सदाशिवपेठी ब्रम्हवृंद चवताळून उठले. शिवरायांचा पुतळा पुण्यात होवूच नये यासाठी कडाडून विरोध केला. पुतळा तयार करणा-या शिल्पकाराला धमकावले. पेशवाई किड्यांच्या डोक्यातला शिवरायांच्याबद्दलचा द्वेष आणि आकस जगजाहिर आहे. तो आजचा नाही. यात नवीन काय नाही. गेल्या चारशे वर्षापासून हा द्वेष या मंडळींच्या पोटात वाढतो आहे. हा द्वेष कोरटकर सारख्या हरामखोरांच्या पोटातून ओठावर अधूनमधून येतो. शिवरायांच्या हयातीत त्यांचे महत्व नाकारलेच. त्यांचा राज्याभिषेक नाकारला. “कोण राजा ? तु कसा आमचा राजा ? तु तर शुद्र ! असे म्हणत त्याना हिनवले. त्यानंतर आजतागायत शिवरायांचे मोठेपण नाकारले. इतर गोष्टीना महत्व देत, त्यांच्या कर्तृत्वावला दैवी झालर देत, चमत्काराची बेगड लावत शिवरायांच्या मोठेपणाला जाणिवपुर्वक बगल देण्याचा प्रयत्न केला गेला.
गेल्या चारशे वर्षात या बांडगुळांच्या कारस्थानांना यश आले नाही. राजे या बांडगुळाना पुरून उरले आहेत. अखेर कपटी कावळ्यानी शिवरायांना स्विकारल्याचे नाटक करत त्यांचा जयजयकार करत त्याना संपवण्याचे कारस्थान रचले आहे. त्यांच्या नावाने दंगली घडवत राजकीय सत्ता मिळवण्याचे त्यांना साधन केले. त्यांना मुस्लिम द्वेषाचा ब्रँड करत संकुचित करण्याचे कारस्थान रचले गेले आहे. त्यांचे अफाट कर्तृत्व आणि रयतेसाठीची ऐतिहासिक धोरणं दुर्लक्षित करत त्यांचा पराक्रम केवळ कोथळा काढला, बोटं तोडली इतकाच मर्यादीत ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवरायांना संपवण्यासाठी जेवढे औरंग्याने जंग जंग पछाडले नाही त्यापेक्षा जास्त या जातीयवादी पेशवाई किड्यानी जंगजंग पछाडले आहे. छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाने भर दरबारात शिवरायांच्यासाठी नमाज पढल्याचे पुरावे आहेत. पण या पेशवाई नालायकांनी आजवर आपले मनसुबे सोडलेले नाहीत. ते आणि त्यांच्या कंपूतले लोक सतत शिवरायांचा अवमान करत आलेत. "बंच ऑफ थॉट" मध्ये आपल्या वैचारिक हागणदारीची साक्ष देत माधवराव गोळवळकराने जी घाण केली आहे, सावरकर जे बोलले आहेत ते सगळं सगळं यांच्या मनातली द्वेषभावना दाखवणारे आहे. गोळवळकर, सावरकर यांच्यापासून जेम्स लेन, श्रीपाद छिंदम, कपाळावर जखम असलेला पुतळा तयार करणारा नमकहरामी, राहूल सोलपुरकर ते कोरटकर अशी यांच्या नमकहरामीची मोठी यादीच आहे. शिवरायांना संपवणे हेच या हरामखोरांचे ध्येय आहे.
या जातीयवादी पेशवाई किड्यांचे ते ध्येय अजून संपलेले नाही. आताही त्यांना औरंग्याची कबर उखाडून काढायची नाही. औरंग्याची कबर उखाडणे हा त्यांचा दावा आहे पण शिवरायांचा पराक्रम, अफाट कर्तृत्व आणि मोठेपण उखाडून काढणे हा त्यांचा खरा कावा आहे. औरंग्याची कबर, अफझुल्ल्याचा दर्गा या शिवरायांच्या कर्तृत्वाच्या खुणा आहेत. त्यांच्या शौर्याची ही प्रतिकं आहेत. असं नसतं तर छत्रपती शिवरायांनी अफझलखानाची समाधी बांधली नसती. जिजाऊ मातेने शिवरायांना तसे सांगितले नसते. याचा तरी भटांच्या कच्छपी लागलेल्या बहूजन बावळ्यांनी विचार करावा. आपला बाप कोण ? त्याने काय केले ? आपल्या उक्तीतून आणि कृतीतून त्याने काय सांगितले याचा विचार हे बावळे करतील का ? औरंग्याची कबर, अफझुल्ल्याची समाधी काढली तर शिवरायांच्या पराक्रमाचे पुरावे म्हणून काय दाखवणार ? शिवरायांचे वशंज म्हणवणारे लोकही इतके कसे सत्तेच्या धुंदीत बेफाम झाले आहेत ? त्यांचा सदसदविवेक ठार मेला आहे की काय ? बहूजन समाज या पेशवाई किड्यांचा इतका गुलाम कसा काय झाला आहे ? पेशवाई किड्यांनी यांच्या हातावर विष्ठा ठेवली तरी हे प्रसाद म्हणून हजम करत आहेत. यांच्या अकलेला नारू झालाय की कँन्सर ? नेमकं काय झालय ? जन्माला आलेलं बाळ न शिकवता आपल्या आईचं स्तन्य पितं. त्याला तेवढी अक्कल असतेच पण हे गायीला माता म्हणत बैलाला बाप म्हणून स्विकारणारे बावळे कधी सुधारणार ? अजून किती काळ बैलाच्या कासेत ढोसण्या मारणार आहेत ? काल-परवापर्यंत संघाला व फडणवीसांना शिव्या देणारे नितेश राणे आज त्याच फडणवीसांच्या मांड्या चोळत आम्हाला शिवचरित्र आणि हिंदुत्व शिकवणार काय ? फंद-फितुरीचा शाप लाभलेला, सत्तेसाठी मोघलांपासून पेशव्यांचे तळवे चाटणारा बहूजन समाज शिवचरित्रातून नेमकं काय शिकला ? हा न सुटणारा प्रश्न आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत