देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

संभाजी महाराजांवर आमच्या मराठी लेखकांनी किमान पन्नास तरी नाटकं लिहिली. ही सर्व नाटकं केवळ कपोलकल्पित कथानकावर होती.

संजय कामनगावकर

संभाजी महाराजांवर आमच्या मराठी लेखकांनी किमान पन्नास तरी नाटकं लिहिली. ही सर्व नाटकं केवळ कपोलकल्पित कथानकावर होती. कथानक खोटं असलं तरी कथानायक मात्र ऐतिहासिक, खराच होता. हे सर्व लिखाण एकांगी, निंदानालस्ती करणारं, वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं होतं. पण याची लाज ना नाटक लिहिणाऱ्यांना होती, ना नाटकांचा आस्वाद घेणाऱ्या व स्वतःला अभिरुचीसंपन्न म्हणवून घेणाऱ्या मराठी रसिकांना! ‘
औरंगजेबानं संभाजीराजांचं केवळ शरीर ठार केलं. पण आमच्या मराठी लेखकांनी दोनशे वर्षे संभाजी महाराजांसारख्या एका चारित्र्यसंपन्न, महान पराक्रमी, प्रजाहीतदक्ष, ज्ञानी, सुसंस्कृत चारित्र्याचा खून केला. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारावं या न्यायानं आमचे साहित्यिक बेलगाम होऊन वागले. संभाजी महाराजांवर आजतागायत लिहिल्या गेलेल्या नाटकांची नावं व त्यांच्या लेखकांची यादी बघा.
गुणोत्कर्ष – वा. वा. खरे १८८५
संगीत छ संभाजी- आ. मो. पाठारे १८९१
सं छ संभाजी- सोनाबाई केरकर १८९६
प्रणयी युवराज- वा. न. शहा
मराठ्यांचा आत्मयज्ञ- नाथ माधव १९१७
राजसंन्यास- रा. ग. गडकरी १९२२
राजसंसार – वि. वा. हडप १९२३
बेबंदशाही- वि. ह. औंधकर १९२४
दुर्दैवी छत्रपती- शं. घो. घैसास १९२५
प्रतिमा कंकन – मा. आ. कामत १९२७
गोमंतक विजय- त्र्यं. वि. वैद्य १९२७
रक्तरण – १९३०
रायगडची राणी – वि. वा. हडप १९३१
शिवाजीला शह – य. ना. टिपणीस १९३३
मराठ्यांचा राजा- मालती तेंडुलकर १९३७
सं छेडलेला छावा- वि. ना. कोठीवाले १९३४
धर्मवीर संभाजी- गं. कृ. बोडस १९४१
सुडाची प्रतिज्ञा – भि. ना. देसाई १९४३
चिडलेला छावा – श्री. कृ. ओक १९४५
थोरातांची कमळा- ना. के. सोनसुखार १९५१
शककर्त्याचा न्याय- मा. आ. कामत १९५२
रणसम्राट – ही. गो. प्रभू १९५२
मानी मराठा – ना. ध. कोचरेकर १९५२
मराठ्यांची स्वामी भक्ती – १९५४
अमर जाहले छ संभाजी- आबासाहेब आचरेकर १९५७
स्वप्न भंगले रायगडाचे – विनोदकुमार शेंडगे १९६२
राजनिष्ठा – बी. एन. सामंत १९६१
रायगडाला जेव्हा जाग येते- वसंत कानेटकर १९६२
छ संभाजी – ल. वि. सांडव १९६४
राजयाचा पुत्र अपराधी देखा – द. ग. गोडसे १९६४
महाराष्ट्राची दौलत – वि. शं. जोशी १९६४
मोहरा इरेला पडला – आ. वि. दळवी १९६५
महाराष्ट्राचा मोहरा- सीमा साखरे १९६६
अश्रू ढळले रायगडाचे- अर्जुन झेंडे १९६७
सती गोदावरी – शं. ब. चव्हाण १९६७
मृत्यू वाकला शंभूपुढे- राजाराम परब १९६७
मराठ्यांचे शंभूमहादेव- वि. शं. जोशी १९६७
इथे ओशाळला मृत्यू- वसंत कानेटकर १९६८
सह्याद्री सांगे कथा शंभूची – आबासाहेब आचरेकर १९६८
स्वराज्याचा नंदादीप – सी. गो. प्रभू १९६९
ही केवळ नाटकांची यादी आहे. कादंबरी, कथा, कविता वेगळ्या. या सर्व साहित्यातून संभाजी महाराज हे व्यसनी, दुराचारी, लंपट, हेकट अशा प्रवृत्तीचे होते असंच रंगवलं गेलं. यातील काहींनी तर आपलं नाटक ऐतिहासिक सत्यावर आधारित आहे असाही कांगावा केला. गंमत म्हणजे, यातील सोनाबाई केरकर ही लेखिका तर केवळ पंधरा वर्षांची अल्लड पोर होती..! या पन्नास नाटकांचे महाराष्ट्रात किती हजार प्रयोग झाले असतील? किती वेळा शंभू चरित्राचा मुडदा पडताना आमचा मराठी माणूस पान विडा चघळत बघत राहिला असेल?

  • #संजय कामनगावकर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!