देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतरची आंबेडकरी चळवळ


ज्या व्यवस्थेने पशुपेक्षाही हीन वागणूक दिली.माणूसपण हरविलेल्या समाजात जनजागृतीची मशाल प्रज्वलित करून माणसाला खळबळून जाग केले.माणूस असल्याची जाणिव झाली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ला महाड चवदार तळ्याच्या पाणि पिण्याचा सत्याग्रह करून ज्या तळ्यावर कुत्रे मांजर पशु बिनधास्त पाणी पित होते.परतु माणसाला पाणी पिण्यास मनाई होती.हया विरूद्ध मानवी अधिकारांसाठी संघर्ष केला.
मंदिर प्रवेशाची दीर्घ चळवळ राबविली.जर आम्ही हिन्दु धर्माचे असू तर मंदिरात जाण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मंदिर प्रवेशाची चळवळ केली.
२९३० ३१ला राऊंड टेबल कान्स फ्रन्स मध्ये सहभाग घेऊन अस्पृश्य समाजाची दैना अवस्था जगाला माहिती करून दिली.
अस्पृश्य समाजातील लोकांना स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मंजूर करवून घेतली.
महात्मा गांधी ने स्वतंत्र मतदारसंघाची मागणीला विरोध करून येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले.देशात वातावरण स्फोटक बनले . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न होऊ लागला.
बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला खांबावर फाशी दिली तरी मी माझ्या समाजाच्या न्याय मागणी सोडणार नाही.
देशात एका जाती विरूद्ध वातावरण तयार केल्या जात होते. त्यांचे परिणाम फारच वाईट होण्याची शक्यता होती.
महात्मा गांधी यांची पत्नी कस्तुरबा गांधी व मुलगा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला येऊन गांधीला जीवदान देण्याची विनंती केली.
२४/९/१९३२ला करारनामा करून महात्मा गांधी यांनी उपोषण सोडले. त्यांच कराराला पुणे करार म्हणतात
१९३५ येवला येथे सभा घेऊन जाहिर केले की मी हिन्दु म्हणून जन्म घेतला ते माझ्या हातात नव्हते परंतु मी हिन्दु म्हणून मरणार नाही.
१५/८/१९३६ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.व १९३७ला झालेल्या निवडणुकीत मुंबई प्रांतात व मध्य प्रदेश मध्ये भरघोस यश संपादन केले.
१९४२ मध्ये देशाला स्वतंत्र देण्यासंबंधी आढावा घेण्याच्या दृष्टीने क्रिस्प आयोग देशात आले. महात्मा गांधी जिना व हिन्दु पुढारी यांना भेटण्याची वेळ दिली. परंतू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना परवानगी नाकारली म्हणाले की तुम्ही मजूराचे पुढारी आहात तुम्हाला अस्पृश्य समाजाची कैफत मांडत येणार नाही. म्हणून २०/७/१९४२ला शेडयूल कास्ट फेडरेशनची निर्मिती करावी लागली.
देशाला स्वतंत्र मिळाले राज्य घटना लिहण्याची संधी मिळाली अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांच्या अधिकारांचे संरक्षण मिळवून दिले.
३०/९/१९५६ ला दिल्ली येथे शेडयूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविली व सर्वानुमते रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचे घोषित केले.
१४/१०/१९५६ला नागपूर येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व लाखो लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली..
६/१२/१९५६ला महापरिनिर्वाण झाले.समाज पोरका झाला.समाजाचे नेतृत्व हरपले.
३० ३१डिसेबर१९५६ व १जानेवारी१९५७ला अहमदनगर येथे शेड्युल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची सभा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. पहिल्या दिवसी आदरांजली वाहण्यात आली व सभा संपली . दुसर्यादिवसी सभेत असे ठरले की परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोडीचे नेतृत्व नसल्यामुळे प्रेसिडियम बनवून कार्यभार चालविण्याचे ठरले. अध्यक्ष म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. व सचिव निवडण्याचे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले.व त्यांनी अँड हरिदास आवळे यांची नियुक्ती केली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेचे अँडिट करणे आवळे बाबूने सुरु केले . त्यामुळे बरेच नेतेमंडळी दुखावल्या गेली.
१९५७ला निवडणुका झाल्या शेड्युल कास्ट फेडरेशन विरोधीपक्ष सोबत युती करुन पक्षाला चांगले यश संपादन करता आले.
३/१०/१९५७ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर शेडयूल कास्ट फेडरेशनचे अधिवेशन बोलाविण्यात आले.व त्यात रिपब्लीकन पक्षाची घोषणा करण्यात आली. त्यात ठराव पारित करण्यात आले.एक वर्षात पक्षांची सभासद नोंदणी करून निवडणूक घेऊन कार्यकारणी निवडण्यात यावी.आता तयार झालेली कार्यकारणी अस्थायी स्वरूपात आहे . त्यानंतर कोणीही पदाधिकारी राहणार नाही.
पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नावाची चर्चा होती परंतु दादासाहेब गायकवाड यांनी एन शिवराज यांच्या नावांची शिफारस केली व ते अध्यक्ष झाले.
एक वर्ष लोटून गेले तरी सभासद नोंदणी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न सुरू नव्हते म्हणून अँड बी सी कांबळे अँड हरिदास आवळे दादासाहेब रुपवते एन एम कांबळे आदि लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला परंतु त्याला दाद दिली नाही. म्हणून २९/५/१९५९ला दुरुस्त रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन पवित्र दीक्षाभूमीवर घेण्यात आले.व पक्षात विभाजन झाले.आवळे दुरुस्त रिपब्लिकन पक्षात तर राजाभाऊ खोब्रागडे नादुरूस्त रिपब्लिकन पक्षात ही विदर्भाची मजबूत जोडी विभागल्या गेली.
१९६३लारिपबलिकन पक्षात ऐकता झाली.
१९६३ ६४ला देश व्यापी भुमीहिनाचा सत्याग्रह करण्यात आला सत्याग्रहीना ठेवण्यासाठी तुरुंग कमी पडू लागले त्याची सोय शाळा व सरकारी जागेत करावी लागली. त्याचा परिणाम संपूर्ण देशात झाला.
१९६७ च्या निवडणूकीत पंजाब उत्तर प्रदेश व बिहार मध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमदार तीन राज्यात सरकारमध्ये सामील होते . रिपब्लिकन पक्ष विरोधीपक्ष म्हणून गणला जात होता.१९६७ च्या शेवटी दादासाहेब गायकवाड यांनी दिल्ली येथे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकारिणीची सभा बोलाविली व काँग्रेस पक्षाच्या सोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडला त्याला आवळे बाबू एल आर बाली यांनी विरोध केला. परंतु दादासाहेब गायकवाड यांच्या प्रभाव असल्यामुळे काँग्रेस रिपब्लिकन युती चार प्रस्ताव पारित झाला. ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांची हिम्मत आंबेडकरी मोहल्ला मध्ये जाण्याची होत नव्हती त्यांचे येणे जाणे सुरू झाले रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांना सत्तेचे प्रलोभन दाखवून पक्ष तोडण्याचे कार्य सुरू झाले.रिपबलिकन पक्ष विरोधीपक्षाची भुमीका सोडून सत्तेच्या कलाने वागू लागला.पक्षाची अनेक नेते मंडळी काँग्रेस पक्षात सामील झाले.पक्ष कमजोर होऊ लागला.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी काँग्रेस रिपब्लिकन युतीला विरोध केला म्हणून त्यांना रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणिस पदावरून काढण्यात आले. त्यांनी खोब्रागडे रिपब्लिकन पक्ष चालविला अँड बीसी कांबळे यांचा वेगळा पक्ष रिपब्लिकन पक्षाचे शकले पडू लागले.जनते मध्ये नाराजी होती.
तरुणांनी दलित पँथर निर्माण केली. अन्याय अत्याचार विरूद्ध संघर्ष करुन जनतेची मने जिंकली.नवी आशा जागी झाली.परतु अल्प अवधी मध्ये दलित पँथरचे विभाजन झाले.
१९७० मध्ये काशिराम यांनी बामशेफची सुरूवात केली.सरकारी कर्मचारी यांना संघटित करून बामशेफचा विस्तार केला.
१९८४ मध्ये डी एस फोर ची स्थापना केली व नंतर बहुजन पक्षांची स्थापना केली. उत्तर प्रदेशात प्रथम समाजवादी पक्षा सोबत बहुजन पक्षांनी सरकार बनविले व मायावती मुख्यमंत्री झाल्या
भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने दोनदा मुख्यमंत्री मायावती झाल्या व एकदा स्वबळावर सरकार बनविले एकून चार वेळा मायावती मुख्यमंत्री झाल्या. काशीराम यांच्या मृत्यूनंतर पक्षाला गळती लागली व पक्ष कमजोर होत गेला.
रामदास आठवले भारतीय जनतापक्ष सोबत राहून सत्तेत सहभागी आहेत.तर प्रकाश आंबेडकर यांचा वेगळा पक्ष आहे.
आंबेडकरी चळवळ विखुरली गेली. त्यामुळे जो धाक होता तो कमी झाला.
आंबेडकरी चळवळीचा धाक व्यवस्थेला निर्माण झाला होता.तो विभाजनामुळे कमी झाला.
व्यवस्था मुजोर झाली.
आज गरज आहे आंबेडकरी शक्ती मजबूत होऊन प्रस्थापित व्यवस्था विरोधी चळवळ तीव्र करण्याची

विनायकराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!