
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीचा लढा उभारला . त्यात अनेक तरुणांनी झोकून दिले.घर संसाराची पर्वा न करता बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे हे व्रत घेऊन जन जागृतीची मशाल तेवत ठेवली त्या पैकी एक कर्मवीर हरिदास आवळे बांबू होत.
आवळे बाबू चा जन्म १/७/१९१६ ला छावनी कामठी येथे झाला. त्यांचे वडील दामाजी आवळे हे रेल्वे मध्ये मजूर पुरवण्याचे ठेकेदार होते. त्यांना रायपूर येथे मजूर पुरवण्याचे काम मिळाले. म्हणून सर्व कुटुंब घेऊन रायपूर येथे स्थायिक झाले.
हरिदास आवळे यांचे प्राथमिक शिक्षण रायपूर येथे झाले. हायस्कूलचे शिक्षण पटवर्धन हायस्कूल नागपूर येथे झाले. सायन्स कॉलेज नागपूर नागपूर विज्ञापिठ येथून बीएससीचे शिक्षण झाले कायद्याचे शिक्षण नागपूर विद्यापीठ अंतर्गत ला कालेजमधून झाले.
सामाजिक कार्याची आवड लहानपणापासूनच होती. त्यांनी समता सैनिक दलात प्रवेश घेऊन समाजकार्याची सुरुवात केली.सघटन कौशल्य वकृत्व कार्याविषयी निष्ठा नेतृत्व गुण ह्यामुळे ते सर्वांचे प्रिय झाले.
वर्ण व्यवस्थेने शोषित समाजावर होणारे अन्याय अत्याचार विरूद्ध संघर्ष करून पिडीतांना न्याय मिळवून दिला.
संघटनेच्या मजबूतीसाठी सर्वस्व झोकून दिले. रात्र दिवस ते व्यस्त असत. त्यांचे नाव सर्वत्र झाले.
लग्न
पूर्ण वेळ आंबेडकर चळवळीत कार्य करीत असल्यामुळे चळवळींचे नेते सिताराम हाडके यांनी मोहगाव हिंगणा तालुका नागपूर येथील हरिभाऊ बागडे यांची कन्या शकुंतला बाई सोबत लावून दिले.हरिभाऊ बागडे हे सधन शेतकरी होते.
लग्न झाल्या नंतर वरात त्यांच्या घरी आली व कार्यकर्ता तक्रार घेऊन आले गावात अत्याचार झाला असून गाव भिंती ग्रस्त आहे. लग्नाचे सोपस्कार न करता कार्यकर्त्या सोबत अन्यायग्रस्त गावाला गेले.तेथील लोकांना न्याय मिळवून देऊनच परत आले. ह्या वागण्यामुळे त्यांचे सासरे चिंताग्रस्त झाले.
आंबेडकर चळवळीचे काम प्रथम नंतर कुटुंबाचे काम ही काम करण्याची पद्धत होती.
सतनामी समाजालाआंबेडकरी चळवळीत उतरविले
छत्तीसगड येथील सतनामी समाजात जनजागृती करुन आंबेडकरी चळवळ समजावून सांगितली व समाजाला चळवळी सोबत जोडले.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना शेड्युल कास्ट फेडरेशन चे अध्यक्ष केले.
सी पी अँन्ड बेरारचे शेड्युल कास्ट फेडरेशनचेअध्यक्ष दशरथ लक्ष्मण पाटील होते.ते म्हातारे झाले होते.
राजाभाऊ खोब्रागडे १९५० मध्ये प्रदेशातून शिक्षण घेऊन भारतात परतले होते.ग म ठवरे १९४९ ला शेड्युल कास्ट फेडरेशन मधून विलंबित केले होते . त्यांचा प्रभाव चंद्रपूर भंडारा जिल्ह्यात होता. खोब्रागडे यांचा समाजकार्याचा व राजकारणाचा प्रभाव या भागात होता. म्हणून राजाभाऊ खोब्रागडे यांना अध्यक्ष करावे हे आवळे बाबू नी हेरले.
वाया एम सी हाल मध्ये १९५३ला कार्यकारिणीची बैठक बोलाविली. त्यावेळी आवळे बाबू सुपरवाजर सेक्रेटरी होते.
सभेला दशरथ लक्ष्मण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. सभेच्या शेवटी आवळेबाबूजीने प्रस्ताव ठेवला. दशरथ लक्ष्मण पाटील यांच्या कार्याची सुस्ती केली त्यांनी पक्षांसाठी झीज सोसली व पक्ष मजबूत केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.परतु पाटील म्हातारे झाले असून पक्षाला नवीन रक्ताची गरज आहे म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना अध्यक्ष करावे असा सभेसमोर प्रस्ताव ठेवला.व सर्वांनी एकमतानी मंजूर केला.
दशरथ पाटील हे अडुन होते. त्यांनी तांत्रीक मुद्दा उपस्थीत केला की अध्यक्षांची जागा रिकामी नाही तर अध्यक्ष निवडता कसे.सभागृह राजाभाऊ खोब्रागडे यांच्या बाजूने होता. खोब्रागडे साहेबांना सन्मान पूर्वक अध्यक्ष पदावर विराजमान केले
. भंडारा लोकसभा पोट निवडणुकीत १९५४ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचार केला परंतु अपयश आले
१९५५ला भंडारा लोकसभाझालेल्या निवडणूकी मध्ये हरिदास आवळे शेड्युकास फेडरेशनचे उमेदवार होते त्यांच्या प्रचारासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रक काढून त्यांना मतदान करण्याचे आवाहन दिले होते.परतु त्यांचा पराभव झाला.
आंबेडकर यांच्या प्रेत यात्रेला गैर हजर
आवळे बाबूजी पक्षाच्या कामासाठी छत्तीसगड येथील जंगल भागात व्यस्त असल्याने तेथे वर्तमानपत्र येथे नसल्यामुळे त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण बातमी कळली नाही.परतु काही दिवसांनी शहरालगत आल्यावर त्यांना बातमी कळली.
३०/१२/१९५६ला दहा नंबर पुलाजवळ झालेल्या अशोक सभा जागो बाजी रामटेके त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली नागपूर येथे झालेल्या शोक सभेत शोक संवेदना व्यक्त करताना म आवळे बाबू म्हणाले की येथील व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकर यांना स्वस्थ बसू दिले नाही.तर त्यांच्या विरोधात वातावरण तयार करित राहीले
बाप मरण पावले तर मुलगा रडतो परंतु आम्ही रडणार नाही बाबासाहेब आंबेडकर यांचा खून झाला असून खूनाचा बदला खूनाने घेतल्या शिवाय राहणार नाही. त्यांच्यावर पोलिस केस झाली.
प्रेसिडियमचे सचिव
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानतर अहमदनगर येथे दिनांक 30 डिसेंबर व 31 डिसेंबर 1956 व एक जानेवारी 1957 ला शेडयूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकारिणीची सभा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली व प्रेसिडियमची निर्मिती करण्यात आली व अध्यक्ष भाऊराव राजाभाऊ खोब्रागडे यांना निवडले.व सचिव निवडण्याचा अधिकार अध्यक्षांना देण्यात आला.हरिदास आवळे बाबू यांना सचिव निवडण्यात आले.
आवळे बाबूजींनी बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संस्थेचे आडिट करणे सुरू केले त्यामुळे अनेक पुढारी नाराज झाले आवळे खोब्रागडे जोडीत दुरावा कसा निर्माण होईल याचे डाव पेच आखत होते.
रिपब्लिकन पक्षाची स्थापना पवित्र दीक्षाभूमीवर 3 ऑक्टोंबर१९५७ ला झाली अधिवेशन व त्यात झालेला ठराव एक वर्षाच्या आत सभासद नोंदणी करुन वार्डापासून केंद्रिय कमेटी निवडणूकीने घ्यावी
परंतु एक वर्ष झाल्यावर सुद्धा सभासद नोंदणी झाली नाही.हा मुद्दा बीसी कांबळे व आवळे बाबूंनी धरुन लावला व पक्षात दुरूस्त ना दुरूस्त अशी विभाजन झाले.आवळेबाबू दुरुस्त च्याबाजूने तर राजाभाऊ खोब्रागडे नादुरूस्त बाजूने झाले म्हणून असंतुष्ट नेत्यांचे फावले. विदर्भाची जबरदस्त जोडी वेगळी झाली.
१९६३ ६४ च्या भूमीहीनाच्या आंदोलनांनी संपूर्ण देश हादरला व रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले. 1967 ला उतर प्रदेश पंजाब व बिहार यामध्ये राज्यात रिपब्लिकन पक्षाचे आमदार तीन राज्यात सरकार मध्ये मंत्री होते.१९६७ मध्ये विरोधी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे गणना होत होती परंतु दादासाहेब गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत युती केली व सत्ता धारीच्या कलाने पक्ष चालू लागला याला राजाभाऊ खोब्रागडे यांनी विरोध केला म्हणून त्यांना नाशिकच्या सभेमध्ये १९७० ला सभेत रिपब्लीकन पक्षाच्या सरचिटणिस पदावरून काढण्यात आले.व ऑक्टोंबर १९७० मध्ये नागपूरला दोन अधिवेशन झाले. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात दीक्षाभुमीवर व राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पटवर्धन मैदानावर
आवळे बाबू नी नागपूर टाईम्स कार्यालया समोर रामदास पेठ नागपूर येथे मंडप टाकून पांढरा ध्वज लावून एकतेचा प्रयत्न सुरू केला. प्रतिनिधी मंडळ दादासाहेब गायकवाड यांच्याकडे पाठवले परंतु गायकवाड साहेबांना बोलता सुद्धा येत नव्हते त्यांचा फायदा सहकार्यानी घेतला व एकतेची बोलली फेल ठरली.
राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कडे शिष्टमंडळ गेले असता त्यांनी त्यांचे स्वागत केले.व सविस्तर चर्चा केली.
आवळे बाबू आखिल भारतिय आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षांचे अध्यक्ष होते. खोब्रागडे यांचा कोणताही पक्ष नव्हता तर समर्थकांचा मेळावा होता.समाजाच्या व पक्षाच्या हितासाठी खोब्रागडे साहेबांना अध्यक्ष स्विकृत केले व पक्षांची एकता घडविली.आबेडकरी जनतेत आनंदाची लाट आली.
१९७१ला लोकसभेची निवडणूक जाहिर झाली व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अँड हरिदास आवळे नागपूर उमरेड जाहिर झाले. प्रचार करिता असतानी आवळे बाबू म्हणाले की लोकसभेत जाऊन काय करणार असे लोक विचारतात मी लोकसभेत जाऊन काय करणार नाही हे सांगतो मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाला व पक्षाला बेईमान होणार नाही हे वाक्य पूर्ण करताच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले२/३/१९७१
दुसर्यादिवसी प्रेत यात्रा निघाली पाऊस जोरात येत होता परंतु कोणीही प्रेतयात्रा सोडून गेले नाही.मोक्षधाम नागपूर येथे शव चितेवर ठेवल्यावर कोणीतरी म्हणाले त्यांच्या मुलाला बोलवा त्यावेळी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे पुढे आले व म्हणाले की मी मुलगा आहे व त्यांनी प्रेताला अग्नी दिला.मुलगा व पुतने हजर होते.एक ध्येय निष्ठ आंदोलन कारी अनंतात विलीन झाले.
विनायकराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६
दिनांक :- २८/२/२०२५
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत