देशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

पंढरपुरातला नवा पांडूरंग कुऴधर्मासाठी की, धंद्यासाठी ???

दै.वज्रधारी आधारीत पोस्ट… समाज माध्यमातून साभार

पांडूरंगाच्या पंढरपुरात आता पांडूरंगाची दोन मंदिरं झाली आहेत. बडवे समाजाचे अध्यक्ष बाबा बडवेंनी त्यांच्या खासगी जागेत विठ्ठलाचे मंदिर उभारले आहे. कुऴधर्म, कुऴाचारासाठी बडव्यांनी मंदिर उभारल्याचे ते सांगत आहेत. महाराष्ट्र सरकारने विठ्ठलाचे मंदिर बडव्यांच्या ताब्यातून काढून घेतले. मंदिराचे सगऴे व्यवहार शासकीय मंदिर समिती नेमूण तिच्या ताब्यात दिले. तेव्हापासून मंदिरात येणारे दान, दक्षिणा व मंदीराचे एकूण उत्पन्न वगैरे वगैरे सर्व गोष्टी सरकारच्या अखत्यारीत आल्या. खरेतर तेव्हाच अनेकांनी सरकारच्या तत्कालीन निर्णयाविरूध्द गलका केला. अनेकांनी धर्म बुडाल्यांची बांग ठोकली. “हिंदूंची मंदिर ताब्यात घेवून मुस्लिमांच्या हज यात्रेला पैसे दिले जातील !” असा जातीय साप सोडण्याचा व सामान्य हिंदू जनांना भडकावण्याचा प्रयत्न केला. यात बर्यापैकी संघावऴ अग्रेसर होती. अनेकांनी छोट्या-छोट्या पुस्तिका काढल्या. सरकार कसे हिंदू धर्मावर आक्रमण करते आहे वगैरे वगैरे बाता त्यात टोकून दिल्या होत्या. कुणीही भोऴा हिंदूजन उठेल अन सरकारच्या किंवा सरकारवाल्यांच्या भोकांडी बसेल अशी भडकावू भाषा सदर पुस्तिकेत होती. सरकारने आणलेल्या मंदिर अधिग्रहण कायद्याला या लोकांनी प्रचंड विरोध केला. सरकारने अनेक मंदिराचे व्यवस्थापन या बडवे, पुरोहीत लोकांच्याकडून काढून घेतले व तिथे सरकारी मंदिर समिती स्थापन केली. सरकारच्या या निर्णयाने खवऴलेली भुतावऴ लोकांना भडकावत होती. धर्मावर हल्ला झाल्याचे बूड आपटून सांगत होती. खरेतर हा हल्ला धर्मावर झाला नव्हता तर त्यांच्या रोजी-रोटीवर हल्ला होता. त्यांच्या पिढीजात धंद्यावर हल्ला होता. म्हणूनच या लोकांचे पित्त खवऴले होते. धर्माची ढाल करत लोकांना उचकवायचे प्रयत्न केले गेले. या लोकांना मंदिरांच्या माध्यमातून विनासायास मिऴणाारी संपत्ती सोडवत नव्हती. कोट्यावधी रूपये कष्ट न करता फुकटात मिऴत होते. मंदिरं सरकारच्या ताब्यात जाण्याने धर्म बुडत नव्हता तर देवाच्या नावाने चालवला जाणारा धंदा बुडत होता. म्हणूनच या लोकांचा सारा आकांडतांडव सुरू होता. धर्म बुडाल्याची व मोडीत निघाल्याची बांग ठोकली जात होती.

पंढरपुरातही तेच घडतय. सरकारने बडवे आणि उत्पातांच्याकडून मंदिर काढून घेतले. मंदिर हातात होते तोपर्यंत या लोकांची चंगऴ सुरू होती. ती बंद झाली. त्यामुऴेच कदाचित पंढरपुरात विठ्ठलाचे नविन मंदिर उभारले असावे. खरेतर त्यांनी एक नव्हे अनेक मंदिरं उभा करावीत. त्यांनी त्यांची साधना, धर्म किंवा कुऴाचार जोपासावा याबद्दल आमचे दुमत नाही. बाबा बडवेंनी खुषाल कुऴधर्म पाऴावा. त्याला विरोध करायचा काहीच संबंध नाही पण इकडचा धंदा बंद झाला म्हणून तिकडे नविन दुकान थाटून बसू नये इतकीच माफक अपेक्षा. देवा-धर्माचा धंदा मांडून सामान्य भक्तांना, श्रध्दाऴू लोकांना चुणा लावू नये.

मंदिराच्या माध्यमातून जो धंदा केला जातोय तो कऴीचा मुद्दा आहे. आज देशभरात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांचा वार्षिक ताऴेबंद देशाच्या अर्थसंकल्पाच्या दहापट आहे. ही देवऴातली संपत्ती कोठे जाते ? तिचे काय होते ? याचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही. दुष्काऴासाठी, गरिबीसाठी, गोर-गरिबांच्या निवार्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी उपयोगात आणल्याचे ऐकीवात नाही. एका एका मंदिरात येणारी संपत्ती प्रचंड आहे. ही मंदिरातली संपत्ती देशाच्या विकासाला लावली तर देश प्रगत होईल. देशात अनेक सोई-सुविधा उभारल्या जातील. अनेक हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, आयटीपार्क, अद्ययावत प्रयोगशाऴा उभारता येतील पण असे होत नाही. अजून अनेक मंदिरं या पुरोहीतशाहीच्याच कब्जात आहेत. त्यांनी भुजंगाप्रमाणे या संपत्तीवर ठाण मांडले आहे. या धंद्याला धक्का लागला की ही तमाम पिलावऴ चवताऴून उठते. गझनीच्या महमंदाने सोरटी सोमनाथाचे मंदिर २१ वेऴा लुटले. इतकी अमाप संपत्ती सदर मंदिरात ठेवली गेली होती. पण पुरोहितवर्गाने संपत्ती लुटल्याचे कधीच सांगितले नाही. मंदिर फोडल्याचे सांगितले. हेच नेहमी होते.

सामान्य लोकांना मंदीर व इश्वरभक्ती हा श्रध्देचा विषय असतो, आंतरिक तऴमऴीचा विषय असतो. पण याचाच फायदा उठवून बडवे आणि पुरोहीतांनी देवाला धंद्याचे भांडवल तर मंदिराला दुकान केले. ही दुकानदारी आणि देवाच्या नावाने सुरू झालेला धंदाच महत्वाचा आहे. या धंद्यावर ज्या ज्या वेऴी हल्ला झाला तेव्हा तेव्हा सर्व पुरोहीत खवऴून उठले, पेटून उठले. श्रध्दाऴू भक्तजन मंदिरात दान देतात. सढऴ हस्ते मदत करतात. पंढरपुरात दान टाकले नाही तर बडवे भक्तांना शिव्या घालायचे. वाटेत तुमचा अपघात होईल म्हणायचे. दक्षिणा नाही दिली तर खवऴून अंगावर यायचे, शिव्या द्यायचे. याचा अनुभव हजारो लोकांना आलाय. हाच बडवे आणि पुरोहीतांचा धंदेवाईकपणा सामाजिक अडचण आहे. या धंद्यापोटी या लोकांनी कोल्हापुरात जे थैमान घातले ते तर भयंकर आहे. धंद्यासाठी या भडव्यांनी शंभू महादेवाच्या बायकोला विष्णूची बायको केले. कोल्हापुरच्या अंबाबाईला महालक्ष्मी केले. नाव बदलून याची बायको त्याची केली. चक्क इतिहास, संस्कृतीच मुऴातून संपवण्याचा घाट घातला. दरवर्षी अंबाबाईला तिरूपतीच्या बालाजी देवस्थानाकडून नवर्याची साडी म्हणून पाठवू लागले. पितऴ उघडे पडल्यावर आईची साडी म्हणून पाठवू लागले. देवांच्या बायका बदलल्याच पण तिरूपतीला गेले की कोल्हापुरला गेलेच पाहिजे अशी अफवा पेरून ठेवली. देवा-धर्माच्या नावाने जगणार्या भडव्यांनी इतका अध:पात, इतका धार्मिक व्यभिचार खुलेआम करावा ? लोकांना देवाच्या व धर्माच्या नावाने कशाही टोप्या घालाव्यात ? हे सगऴं धंद्यासाठी चालू आहे. देवाच्या व धर्माच्या नावाने माांडलेली दुकानदारी टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी चाललेलं आहे. पंढरपुरातला नवा पांडूरंग धंद्यासाठी की कुऴधर्मासाठी उभारला जातोय ? असा प्रश्न मनात आल्याशिवाय रहात नाही.

दै.वज्रधारी आधारीत पोस्ट…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!