
सम्राट अशोकाचा नातू ब्रहदत्ताची, शुंगाने धोक्याने हत्या केली यानंतरच संपूर्ण भारताचा इतिहास हा बदलून गेला आहे.हाच कालखंड नेमका लक्षात न घेताच अनेक प्रकारच्या वावड्या याच खर्या मानून अनेक लोक जे जे वाचण्यात येईल तोच खरा इतिहास आहे असे समजून घेण्यासाठी आपलीच मते पसरवत राहतात.
अनेकांनी आपला विचार फक्त सांगितला आहे,भारताचा संपूर्ण सत्य इतिहास हा दोन भागातच विभागला आहे, क्रांती आणि प्रतिक्रांतीचा खरा इतिहास.हा जो पर्यंत लोकांपर्यंत पोहचणार नाही तो पर्यंत भारताचा संपूर्ण इतिहास कधीच समजणार नाही.या इतिहासात असं काय आहे,जे समजल्यावर समाजातील धर्माधर्मातील तेढ संपणार आहे.सत्य इतिहास काय आहे.भारतातील बुध्दांचा धम्ममार्ग
आणि ब्राह्मणांचा ब्राह्मण धर्म हे दोनच असे मार्ग होते ज्या मार्गावरून
भारतीय जनता डोळे मिटून जाऊ लागली होती.
आपण बुद्धांचा सखोल अभ्यास केला तरच त्यांचा धम्म समजेल.
बौद्ध कालीन अनेक प्रकारच्या विचारांचा जीवन विषयक दृष्टीकोण
समाजात विचारवंतांकडून सांगितला जात होता.याच अनेक प्रकारच्या वैचारिक समस्या निर्माण झाल्या होत्या, आयुष्याचे, जगण्याचे,या जगण्यातील फोलपणाचे सत्य काही
केल्यासिध्धार्थाला सापडत नव्हते,
जीवनाचे अंतिम ध्येय साध्य काय असावे समजत नव्हते.हे एकीकडे सिद्धार्थ शोधत होता तर दुसरीकडे अनेक ब्राह्मण याच गोष्टींसाठी यज्ञयाग, पशू बळी अशा प्रकारच्या
अनेक प्रकारच्या कर्मकांडात हे ब्राह्मण अडकले होते.
सिद्धार्थाने प्रचंड कष्टाने जगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजेच धम्म मार्ग
शेवटी शोधून काढलाच.पण याचा
परिणाम असा झाला की संपूर्ण भारत हा बौध्दमय होऊ लागताच
ब्राह्मण हे देखील धम्म मार्ग स्विकारु लागले.हळुहळु ब्राह्मणी धर्माचे उच्चाटन होऊ लागले व भारतभर धम्म मार्ग लोक स्विकारु लागले.
हेच कारण आहे कि ज्यामुळे वर्णव्यवस्था जातिव्यवस्था चातुर्वर्ण्य व्यवस्था असमानता द्वेष लाचारी उच्च निच भेदभाव संपुष्टात येवू लागताच आपल्या श्रेष्ठत्वाचा मोठेपणाचा मानसन्मान नाहीसा होईल या भीतीने ग्रस्त अनेक लोक
धम्माचाही द्वेष करु लागले धम्माचे ज्ञान लोकांपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणार या भितीने ग्रस्त हा धम्म नष्ट करण्यासाठी योजना आखल्या गेल्या,याच योजना जर सांगायच्या तर यासाठी
तुम्हाला पुराणकथा, रामायण ,महाभारत, भारतात नसलेल्या परंपरांचा सखोल अभ्यास करावा लागेल, जातीभेद विषमता यादवी युद्धामुळे हैराण झालेल्या गदारोळात सामान्य माणसाला आजही नेमकं सत्य काय आहे,डुप्लीकेट काय आहे,खरं काय खोटं काय आहे ते समजणारच नाही,इतकं बेमालूम मिश्रण तयार केलं आहे कि माणसाला आज स्वत्वाची बुद्धीचं शिल्लक राहिली नाही.कोण काय सांगतो आहे,कोण फसवतो आहे, आपल्या आयुष्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण माझं भलं हे माझ्या हातात नाही तर ते फक्त हे या परमेश्वराने जर का त्याची मर्जी माझ्या वर झाली रे झाली की माझ्या सर्व प्रकारच्या समस्या अडचणी दुःख ञास एकदम एका झटक्यात सगळं ती अगाध शक्ती दूर करणारच हा विषय विचार आज भारतभर असा पसरलेला आहे की आज असंख्य लोक बुवा बाजींच्या नादी लागून आपल्या आयुष्याची राखरांगोळी करुन घेत आहेत.यावर अनेक संतांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी, अनेक लढवय्या शूर वीरांनी ,राजे महाराजे यांच्या अथक परिश्रमाने लोकांना सत्याचा, बुद्धांचा समतेचा,
मानवतेचा संदेश दिला आहे पण या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून देखील आजचा अतिशय उन्नत, प्रगत माणव सगळं काही पाहत आहे पण हे पाहूनही सत्य परिस्थिती समजून घेत नाही, सत्याचा शोध घेत नाही, फक्त आंधळे अनुकरणाने जीवन जगत आहे.यामुळेच कोणी कितीही खरं बोललेल ,चांगलं जीवन
उपयोगी पडणार न घेता खोट्या प्रचाराला बळी पडून आपले आयुष्य
वाया घालवत आहेत.
भारतावर अनेक परकिय आक्रमक लोकांनी राज्य केले,हे असं का झालं
याचा विचार आपण करत नाही.
यापरकिय लोकांनी भारताची उज्वल परंपरा नष्ट करण्यासाठी अनेक प्रकारच्या कर्मकांडात या भारतीय लोकांना आज पूर्ण पणे गुंतवले आहे.आंम्ही आमच्या मुळच्या उच्च प्रतीच्या मार्गाचे अनुकरण करण्याऐवजी अस्तित्वातच नसलेल्या परंपरांचा सन्मान आपणच करत आहोत.
एकिकडे स्त्रीला देवी, देवता, शक्तीशाली म्हणायचे व दुसरीकडे
सातत्याने पुरुष प्रधान व्यवस्था कशी निर्माण होईल हेच सातत्याने प्रयत्न केला जात आहे.दुसरे असे लोकांना ज्ञानाऐवजी थोतांडात कसे गुंतवता येईल याकडे सतत प्रयत्न केला जात आहे.सामान्य जनता आज जगू कि मरू या विचाराने ञस्त असताना यांचा वाली कोणी च
नाही हे लक्षातच येत नाही.आजची
व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
यामुळे तर त्या अज्ञात,अगाध शक्तीच्या शोधात असंख्य लोक आज सैरभैर झाले आहेत.
शेवटी हा विषय कशासाठी निघाला आहे,तर स्वार्थासाठी अनेक चांगल्या
राजांना, संतांना, ज्ञानी लोकांना, विचारवंतांना, समाज सेवकांना या भूमित मोठा कट करून संपविण्यात आले आहे,हे आपणच सतत विसरत चाललो आहोत.
कोणी कोणाला मारले का मारले हे तर पाहिलेच पाहिजे पण याबरोबरच
यामागे खरे कारस्थान कोणी रचले,का रचले हे सुद्धा आपणच शोधायला पाहिजे.
आज एकमेकांना आपण शञू बनवण्याऐवजी मिञ बनवून आपला विचार सांगितला पाहिजे.
हा विषय फार मोठा आहे.
आपला
सुभाष भाऊसाहेब इनामदार
कळंबी.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत