राष्ट्रधर्म आणि ईश्वरधर्म

धर्म याचा अर्थ धारणा मान्यता.माणूस जसा ईश्वराला मानतो ,तसेच राष्ट्राला पण मानतो.मानले पाहिजे.तरच तो राष्ट्र धार्मि ठरतो.अन्यथा तो राष्ट्रद्रोही होतो.जसे ईश्वराला नाही मानले तर माणूस नास्तिक ठरतो,तसे राष्ट्राला नाही मानले तर राष्ट्रद्रोही होतो.अर्थात ज्या मातेचे दूध अन्न पाणी आसरा संरक्षण भरण पोषण वृध्दी हे सारे घेतले,जिच्या कृपेने आशीर्वादाने प्रेमामुळे माणूस जगला,वाढला त्या मातेस विसरता येत नाही,तिच्या बद्दल कृतज्ञता भाव ठेवणे,तिच्या उपकाराची कर्तव्याची जाणीव ठेऊन तिची परतफेड करणे ,हे जसे मुलाचे कर्तव्य असते,तसेच ज्या देशात जन्मलो वाढलो,ज्या देशाचे अन्न पाणी सेवन करून शिक्षण संरक्षण घेऊन लहानाचे मोठे झालो,त्या देशाबद्दल कृतज्ञ राहणे,त्यावर विश्वास निष्ठा भक्ती प्रेम ठेवणे हे माणसाचे कर्तव्य ठरते.
कर्तव्य म्हणजेच धर्म होय.उत्पत्ती वृध्दी लय हे ईश्वर कार्य आहे,म्हणून माणूस ईश्वर मानतो.त्यावर निष्ठा ठेवतो,म्हणून त्याची सेवा भक्ती करतो.पण खरे तर आई जन्म देते,माणसाला देव किंवा राष्ट्र जन्म देत नाही.ते माणसाचे केवळ संरक्षण पालन पोषण करतात.देव किंवा राष्ट्र जन्म देत नाही की मरण पण देत नाही.जन्म मृत्यू ही एक नैसर्गिक प्रक्रिया नियम नियमन आहे,ती प्रक्रिया सततची आहे.ते एक निसर्गचक्र आहे.सततची प्रक्रिया आहे.उत्पत्ती स्थिती लय,हा निसर्ग नियम किंवा चक्र आहे,त.या चक्राचा देवाशी अन राष्ट्रांशी काहीच संबंध नाही.तरी माणूस बुध्दीचा वापर न केल्याने तसे त्यास वाटत असते.हो.एव्हढे मात्र सत्य हे की,ज्या मातीत आपण जन्मलो वाढलो,लहानाचे मोठे झालो,त्या मातीशी आणि त्या मातेशी बेईमान होता कामा नये.जो बेइमानी करतो,तो माणूस नव्हे तर तो बुध्दी नसलेला प्राणीच समजावा.
तरी पण ज्या राष्ट्राने आपणास एक नागरिक म्हणून अन्न पाणी दिले,नागरी सुविधा दिल्या,आपल्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण केले,( संविधान मुळे ) त्या राष्ट्राला बेईमान होता कामा नये,त्या राष्ट्र विषयी आदर प्रेम निष्ठा भक्तिभाव ठेवणे,आणि इमाने इतबारे देशसेवा करून मातृभूमीची परतफेड करणे ,याचा अर्थ देशां संबंधीचे कर्तव्य पार पाडणे म्हणजेच राष्ट्रधर्म होय.आणि ईश्वराला मानणे म्हणजे त्याचे अस्तित्व मान्य करून त्याची सेवा भक्ती निष्ठा म्हणजे ईश्वरधर्म होय.म्हणजेच ईश्वरा विषयीचा धर्म.म्हणजे इस्वराविषयीचे कर्तव्य होय.
माणसाच्या जीवनास उपयोगी ईश्वर असेल असे ज्यांना वाटते,त्यांनी जरूर ईश्वरधर्म पाळावा.परंतु त्याच्यापुढे राष्ट्रधर्म पण महत्त्वाचा आहे,याची जाणीव असणे आवश्यक आहे.मात्र वास्तव हे आहे की,माणूस ईस्वरधर्म पाळतो,पण राष्ट्रधर्म पाळत नाही.याचा अर्थ आचरणात व्यवहारात आणीत नाही.जसे पारंपरिक सण वार,भजन पूजन,सप्ते,उत्सव,तीर्थाटन,पोथी पुराण,कीर्तन याद्वारे ईस्वरभक्ती करतो, ईस्वरनिष्ठा दाखवीत असतो,त्याप्रमाणे व्यवहारात देशनिष्ठा भक्ती प्रेम सेवा विश्वास दाखविण्याचे मार्ग माणसाकडे दिसत नाहीत.याचा अर्थ माणसाने ईश्वर संस्कृती निर्माण केली,पण देश संस्कृती अजूनही निर्माण केली नाही.देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली,तरी स्वातंत्र्य म्हणजे काय ? देश म्हणजे काय ? राष्ट्र म्हणजे काय ? त्याची जपणूक कशी करावी ,? त्या संबंधीची संस्कृती कशी निर्माण करावी याचे ज्ञान भारतीय माणसाला झाले नाही,असेच म्हणावे लागते.कारण भारतीय माणूस ईश्वर धर्मीय जेव्हढा आहे,तेव्हडा राष्ट्र धर्मीय नाही.अजूनही त्यास 15 ऑगस्ट ,26 जानेवारी हे सण साजरा करीत नाही.सर्व जाती धर्माच्या कर्यात,म्हणजे सार्वजनिक कर्यात भाग घेत नाही.इस्वर्धर्मासाठी रात्र रात्र जागून काढेल,पण राष्ट्र धर्मासाठी त्याकडे दोन तास सुधा वेळ देत नाही.राष्ट्र जागरण ,संविधान जागरण ,सामाजिक उपक्रम असेल ,भाषण,शिबिर,मेळावा,मीटिंग,संमेलन,धरणे,मोर्चा,उपोषण अशा उपक्रमात भाग घेत नाही.मात्र ईश्वर कर्यात गर्दी करतो.याचा अर्थच असा की भारतीय माणसाला ईश्वर धर्म जेव्हढा प्रिय आहे,तेव्हडा राष्ट्रधर्म प्रिय नाही.याचे कारण हजारो लाखो वर्षाची गुलामी.गुलामीचे संस्कार.यामुळेच ईश्वरास मायबाप कमी पण मालक मालीक म्हणण्याची परंपरा आहे.त्यावर गाणी पण रचल्या गेलीत,ती अजूनही गायल्या जातात.उदा.” हे मालीक तेरे बंदे हम ” याचा अर्थ बंधुवा मजदुर म्हणून,नोकर ,सेवक म्हणून राहण्याची सवय म्हणजेच गुलामी भारतीयांच्या रक्तातून अजूनही गेली नाही.स्वातंत्र्य समता बांधता न्याय देणारे संविधान देशाला मिळूनही ते घेण्यास,त्याचे आचरण करण्यास भारतीय माणूस अजूनही तयार नाही.लायक बनला नाही.या गुलामीच्या ,विषमतेच्या बेड्या जो पर्यंत भारतीय माणूस तोडणार नाही,तो पर्यंत त्यास राष्ट्रधर्म समजणार नाही की ईश्वरधर्म पण समजणार नाही.ईश्वराच्या किंवा देशाच्या दावणीला खुट्याला बांधलेले जनावर म्हणजेच गुलामी होय.गुलामी म्हणजेच अधर्म,आणि स्वातंत्र्य म्हणजेच धर्म होय.समता म्हणजेच धर्म आणि विषमता म्हणजेच अधर्म होय.ही जाणीव मेंदूत मनात ठेऊन केलेली ईस्वरभक्ती, राष्ट्रभक्ती ही मानवी जीवन संरक्षित आणि सुरक्षित आणि समृध्द करू शकते,निर्भय बनू शकते.
लेखक : दत्ता तुमवाड.सत्यशोधक समाज नांदेड.दिनांक: 18 फेबृ.2024.फोन: 9420912209.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत