दिन विशेषदेशमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

परभणी येथून निघालेला लॉन्ग मार्च स्थगित का झाला

15 जानेवारी ला परभणी येथून लॉंग मार्च निघाला, त्यावेळी आम्हाला सोडायला 10 हजार शहरवासी आले होते. पुढे आमच्यासोबत 500 पेक्षा अधिक लोक चालत होते, तू मात्र बोरीला आलास आणि फोटोशेषन केलंस आणि निघून गेलास. 400 किमीच्या लॉंग मार्चमध्ये तू किती चाललास याचा जरा हिशोब सांग. लॉंग मार्चमध्ये आमच्या माता भगिनी, वयोवृद्ध व्यक्ती 400 किमी चालले, त्यांच्या पायाला फोड आले, अनेकजण चक्कर येऊन पडले, दरम्यानच्या रस्त्यात लॉंग मार्चचे नेतृत्व करणारे आशिष भैय्या वाकोडे यांना गाडीने उडविण्याचा प्रयन्त केला. या सर्व अनंत अडचणींवर मात करून लॉंग मार्चने नाशिक पर्यंतचा 400 किमीचा टप्पा पूर्ण केला.

लाँग मार्चमधील सहभागी बौध्द बांधव भगीनींना 400 किमी टप्प्यामध्ये येणाऱ्या गाव-शहारातील माता, भगीनी बौध्द बांधवांनी भरपूर सहकार्य केलं. पण सहकार्य करतांना त्यांना पण काही मर्यादा होत्या. अनेक ठिकाणी माता-भगिनी उघड्यावर झोपल्या. विशेषत: ग्रामीण भागामध्ये लाँगमार्चमधील माता-भगिनींना वॉशरुम, स्वच्छतागृहाची सोय नव्हती तरी पण माता-भगिनींनी हे सर्व सहन केल. या 400‍ किमीच्या प्रवासादरम्यान ‍किमान 100 महिला पुरुष वेगवेगळ्या कारणांनी आजारी पडले. या सर्वांची काळजी लाँगमार्चचे नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांना होती.

परभणी येथे जिल्हा पोलीस अधिक्षक राहिलेले व आता राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) असलेले मा. उपासक सुनिल रामानंद (भा.पो.से.) यांनी निफाडला येऊन लाँग मार्चच्या नेत्यासोबत चर्चा केल्या आणि शासनासोबत चर्चा घडवून आणण्याचे काम केले आणि 50 टक्के मागण्या पूर्ण केल्या. तसेच राहिलेल्या 50 टक्के मागण्या शासनाकडून पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्न करेल, मी स्वत: मंत्रालयामध्ये येईल अशा पध्दतीचे आश्वासन दिले. रामानंद साहेब कट्टर भीमसैनिक असल्यामुळे आशिष भैय्या यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सौ. मेघनाई बोर्डीकर-साकोरे अगदी परभणीमध्ये आंदोलन सुरु असताना ते लाँगमार्चच्या पहिल्या दिवसापासून लाँगमार्चचे नेते आणि सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होत्या त्यांचे कार्यकर्ते संपर्कात होते. त्यांचे वडील आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर संपर्कात होते. तसेच मा. आमदार सुरेश धस साहेब, मा. मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी मा. राजेंद्र साबळे पाटील संपर्कात होते. आणि मा. मेघनाताईंनी हे माझ्या जिल्ह्यातील प्रकरण आहे, आशिष वाकोडे आणि त्यांचा परिवार, सोमनाथ सुर्यवंशी यांचा परिवार हे मी परभणीची पालकमंत्री असल्यामुळे माझ्या परिवाराचे घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या अन्यायाला वाचा फोडून शासनाकडून सर्वोतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन सातत्याने त्या देत होत्या. त्यापैकी काही आश्वासनांची त्यांना पूर्तता केली आहे. आणि एक महिन्याच्या आत 100 टक्के आश्वासने पूर्ण करण्याची हमी घेतली आहे. या सर्व गोष्टींचा आशिष भैय्या यांनी विचार केला. तसेच नाशिक पासून मुंबई कडे जाताना आता घाटाचा रस्ता होता. दररोज मोर्चकऱ्यांसोबत 100 ते 200 लोक राहत होते आणि कमी संख्या असल्यामुळे पोलीसांनी लाँगमार्च रस्त्यामध्ये आडवला असता तर राज्यभरात त्याचे परिणाम होऊन वाईट वळण लागले असते याचाही विचार आशिष भैय्या यांनी केला. नाशिकमध्ये सुटलेले प्रश्न हेच आझाद मैदानावर सुटणार असतील तर त्यामुळे एवढा खडतर प्रवास टाळलेला बरा. शेवटी आपण शासन-प्रशासन प्रणालीवर विश्वास ठेऊ शकतो. काही गोष्टी त्यांनी त्वरीत केल्या व राहिलेल्या गोष्टी करण्यासाठी शासन कामाला लागल्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी विश्वास आलेला आहे. आणि लाँगमार्च हा एक महिन्यासाठी आम्ही स्थगीत केलेला आहे, संपवलेला नाही. आदरणीय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर-साकोरे. आ. सुरेश धस आणि सर्व पत्रकारांच्या समोर आशिष भैय्या यांनी इशार दिलेला आहे की एक महिन्यामध्ये राहिलेल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर लाँग मार्चची सुरुवात पुन्हा नाशिक पासून करण्यात येईल. अनेकदा आंदोलन यशस्वीपणे हाताळण्यासाठी काही गोष्टी सामंजस्याने घ्यायच्या असतात, ती सामंजस्याची भूमिका आशिष भैय्या वाकोडे, समाजभूषण भीमराव हत्तीअंबीरे, रवि सोनकांबळे, सिध्दार्थ भराडे, प्रदिप वाव्हळे, विश्वजीत वाघमारे, संजिवनीताई भराडे, निसर्गंध, सचिन पाचपूंजे, अनिकेत धबाले, ललित कांबळे, सोनू भराडे, सागर मुंडे, निलेश डूमणे, सोनकांबळे ताई, अमर सोनकांबळे यांनी सर्वांनी एकत्रितरित्या सर्वसहमतीने हा निर्णय घेतला आहे. आम्हाला आनंद आहे की परभणी ते नाशिक पर्यंतच्या 400 ‍किमीच्या टप्प्यात जागोजागच्या आंबेडकरी समाजाने जे प्रेम दिलं आणि लाँगमार्चचे नेते, मार्गदर्शक, संयोजक यांच्यामध्ये कुठलिही फुट पडली नाही, हे सर्वजण एकसंघाने-एकविचाराने सोबत राहिले आणि म्हणून लाँगमार्चला जे यश मिळाले हे गावकुसाच्या आंबेडकरी नेत्या-कार्यकर्त्यांच्या मदतीचे यश आहे. त्याच्यामुळे विनाकारण गैरसमज नको.

जयभीम

प्रदिप वाहुळे
सचिन पाचपूंजे
निलेश डूमणे
विश्वजीत वाघमारे
अनिकेत धबाले
ललित कांबळे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!