दिन विशेषदेश-विदेशधमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

यदाकदाचित बुद्ध धम्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच, तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खुंनाच जबाबदार धरावे लागेल.

“यदाकदाचित बुद्ध धम्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच, तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खुंनाच जबाबदार धरावे लागेल.कारण मला तरी व्यक्तिशा असे वाटते की, ज्या भिक्खुंनी तनमनधनाने आपली कर्तव्ये बजावयास पाहिजे, ती त्यांनी पाळली नाहीत असाच त्याचा अर्थ असेल.”
— डाॅ बाबासाहेब आंबेडकर.

भारतातील भिक्खु संघाकडून अपेक्षा:

सध्याच्या सर्वच परिस्थितीमुळे भारतातील भिक्खुसंघावर प्रचंड जबाबदारी येऊन पडलेली आहे.त्यातच स्वता डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जगातील भिक्खुसंघाला एक अधिकचा इषारा देऊन ठेवलेला आहे. काठमांडूच्या भाषणात त्यांनी सांगितले की, “यदाकदाचित बुद्ध धम्मावर संकट उद्भवण्याचा प्रसंग आलाच, तर बौद्ध राष्ट्रातील भिक्खुनांच जबाबदार धरावे लागेल. कारण मला तरी व्यक्तिशा असे वाटते की, ज्या भिक्खुंनी तनमनधनाने आपली कर्तव्ये बजावयास पाहिजे, ती त्यांनी पाळली नाहीत असाच त्याचा अर्थ असेल.”
( खंड 18.3 पृष्ठ 551) हा इषारा भारतातील भिक्खुसंघालाही लागू होतो. म्हणून डाॅ बाबासाहेबांच्या संकल्पनेनुसार सक्षम होण्यासाठी संघाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. आधुनिक काळात जे कोणी सज्जन भिक्खु झाले आहेत, त्यांची तर फारच मोठी जबाबदारी आहे. डाॅ बाबासाहेबांनी अंगिकारलेल्या महान कार्यात आपण स्वेच्छेन उतरलो आहोत याची जाणीव बाळगून त्यांनी मोट्या श्रद्धेने बाबासाहेबांच्या अपेक्षानुसार स्वताला घडविण्याची आणि समाजाची सेवा करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. बाबासाहेबांचे उपकार कायम लक्षात ठेऊन त्यांच्या धम्मकार्याला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. लोकांच्या धम्मश्रद्धा बलवान होतील असाच प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी स्वता विनयाचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

भिक्खुसंघाकडून लोकांच्या अपेक्षा साधारणपणे खालीलप्रमाणे आहेत.

  1. भिक्खुसंघाने पातिमोक्खाप्रमानेच सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात निर्देशल्या महाअरियवंससुत्त (अं.नि.4.3.8), अनागतभयानिसुत्त (अं.नि. 5.8.8), मुनिगाथा
    ( सु.नि.1.12) आणि सारिपुत्तसुत्त (सु.नि.4.16) या सुत्ताच्या पालनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षानुसार लोकांना ख-या अर्थाने करण्यास
    समर्थ होतील.
  2. भिक्खुंनी पुरोहितगिरी करु नये. बुद्धविहारातून बुद्धमंत्र पाणी वाटू नये आणि ते मंत्र पाणी उपासिका उपासकांच्या अंगावर शिंपडू नये.
  3. विनयपिटकातील शिकवणीनुसार भिक्खुंनी आपापसात एकतेने आणि सांमजस्याने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भिक्खुसंघाचे ऐक्य सर्व समाजाला ऐक्याच्या सुत्रात बांधण्यास
    कारणीभूत होत असते. हे लक्षात घेऊन भिक्खुसंघाने जबाबदारीने वागले पाहिजे.
  4. भिक्खुंनी कोणतीही खाजगी मालमत्ता बाळगू नये. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बुद्धविहार बांधण्याचा प्रयत्न करू नये. ज्याने असे अतिक्रमण केलेले आहे त्याचा विनयपिटकातील दुस-या पाराजिकेचा अपराध घडतो आणि त्यानुसार त्याचे भिक्खुपद कायमचे रद्द होते.
    त्याला पुन्हा भिक्खु बनून संघात येता येत नाही. उपासक, उपासिकांनी अशा भिक्खुंवर बहिष्कार टाकावा आणि त्यांना मुळीच भिक्खु मानू नये.
  5. भिक्खुसंघातील कोणत्याही भिक्खुने कोणताही राजाश्रय घेऊ नये. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य बनू नये. कोणत्याही पक्षाच्या नावाने निवडणूक लढवू नये किंवा कोणतीही राजकीय पदे स्वीकारू नये. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा आपल्या ” बुद्ध आणि त्यांचा धम्म ” या ग्रंथात राजकृपेवर अवलंबून न राहण्याचा इषारा दिलेला आहे (4.4.1)
  6. या लेखात वर उल्लेखलेल्यानुसार भटक्या श्रामणेरांना आळा घातला पाहिजे. श्रामणेरांना दीक्षा देणा-या उपाध्यायाने त्याला श्रामणेर दीक्षा दिलेली असेल, त्याला कायम आपल्या बरोबर धम्म- विनयाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. अन्यथा कोणालाही श्रामणेर दीक्षा देऊ नये.
  7. शीलवान, अभ्यासू , त्यागी आणि आंबेडकरी चळवळी- बद्दल निष्ठा असणा-या भिक्खुंनी वारंवार एकत्र येऊन एकोप्याने आणि सांमजस्याने धम्मप्रचार कार्याचे नियोजन आणि मुल्यमापन केले पाहिजे.
  8. याच बरोबर भिक्खुसंघाने स्वताच्या संघ-परिषदा (संगितीप्रमाणे) घेण्याचा उपक्रम सुरू केला पाहिजे. उपासकांनी काही तरी धम्म-परिषदा आयोजित करावयाच्या
    आणि मतानुसार भिक्खुंनी त्यात वावरायचे हा प्रकार योग्य नाही. अशा प्रकारे भारतातील बुद्धधम्माच्या उत्थानासाठी भारतीय भिक्खुसंघ अधिकाधिक सक्षम होणे आवश्यक आहे.

(संदर्भ: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि भिक्खुसंघ- भदन्त विमलकित्ती गुणसिरी यांच्या पुस्तिकेमधून संपादित)

ही पोस्ट उपासिका आणि उपासकांनी वाचल्यावरच लाईक किंवा कामेंटस् द्याव्या ही नम्र विनंती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!