लोकशाही सशक्त राहण्यासाठी चौथ्या स्तंभाचा भक्कमपणा अत्यावश्यक .. – गिरीश कुबेर

छत्रपती संभाजीनगर : सकस विचारांच्या परंपरेतूनच सुदृढ लोकशाही अस्तित्वात येते. लोकशाहीपुढील आव्हाने, धोके दाखवणे हे जागृत प्रसार माध्यमांचे आद्य कर्तव्य आहे. लोकशाहीची मूल्ये आपोआप अंगात भिनत नसतात, तर ती भिनवावी लागतात. त्या अर्थाने सजग माध्यमांचे अस्तित्व महत्त्वाचेच असून, चांगले प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांची आवश्यकता आहे. त्याला वाचकांनीही पाठबळ द्यायला हवे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केले. देवगिरी महाविद्यालयात आयोजित फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘लोकशाही, विचारस्वातंत्र्य व प्रसारमाध्यमे’ या विषयावरील व्याख्यानात कुबेर शनिवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी मशिप्र मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य त्रिंबकराव पाथ्रीकर होते. मंचावर प्राचार्य अशोक तेजनकर, ज्येष्ठ विधिज्ञ सुखदेव शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत