समाज आजारी झाला

कुटुंबात एखादी व्यक्ती खुप आजारी होते तेव्हा सर्व नातेवाईक एकत्र येतात. प्रत्येक जण मदतीचा हात पुढे करतो. आणि बघता बघता आजारी व्यक्ति बरी होते. समाज असाच आजारी झाला आहे. त्याला फुटीने ग्रासलेले आहे. समाजाला बर करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा समाजाने पक्ष, प्रांत, हेकेखोरपणा आणि इतर भेद सोडून एकत्र येण्याची गरज आहे. समाजाला एकतेच्या औषधाची गरज आहे. समाज विखुरलेला असल्याने समाजाची साधनसंपत्ती ही विखुरलेली आहे. खुशाल घ्या गाड्या,बंगले पण त्यात अडकुन पडु नका. देशाची
80-90% संपत्ती सधन सवर्णांकडे आहे. त्यांच्याही गाड्या आहेत, माड्या आहेत. पण सत्तेत ते आहेत की आपण? ते संघटीत आणि आम्ही असंघटीत. फरक एवढाच. आपले नेते विकलेले, एका पदासठी लाचार झालेले आहेत. हे आपण पाहात आहोत. संघ बुद्धाने निर्माण केला. आरएसएस वाल्यांनी उचलला. कमळ बुद्धांची निषाणी, आरएसएस ने घेतली.शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा हे बाबासाहेबांनी पिडीत समाजाला सांगितलं. शिकले/शिकत आहेत सवर्ण संघटीत तेच आहेत, आणि सत्तेसाठी संघर्ष ही तेच करतात. आम्ही आपापसात लढतो. ते आपापसात लढत नाहीत. दुसर्यांना लढवतात. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे, शरद पवार विरुद्ध अजीत पवार, प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात त्यांचेच अबकड पक्ष. ब्राम्हण विरुद्ध ब्राम्हण लढत नाहीत. ब्राम्हण लोक ओबीसी मराठा एससी, एसटी. एनटी यांना धर्माच्या नावाखाली एकत्र आणुन त्यांच्या डोक्यावर पाय ठेऊन वर जातात. मुख्यमंत्री, PM, नगरसेवक, आमदार, खासदार, बनतात. आपले लोक नारा देतात, …….साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है .. ., अरे येऊन येऊन येणार कोण.. साहेबांशिवाय आहेच कोण.. ह्या घोषणा देतांना त्यांच्या खिशातील 1000-1500 रुपये, रात्री खाल्लेल मटण, दारु बोंबलत असतात. आपली माणसं खाल्लेल्या अन्नाला जागत असतात. ज्यांनी देश पोखरुन खाल्ला तो देशाशी बेईमानी करतो आणि समाज त्याच्याशी प्रामाणिक राहातो म्हणुन ते मोठे होतात आणि समाज खुजा होतो. आजारी होतो. अशा समाजाला सर्व 85% लोक एकत्र येण्याच टाॕनिक देण्याची गरज आहे.
अॕड. डाॕ. दिलीप मेढे. हायकोर्ट मुंबई
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत