महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

चर्मकार (चाभांर) बौद्ध विचारांचे अनुयायी होते !!

संत रविदास देशभर फिरायचे. त्यामुळे संस्कृत आणी हिंदीबरोबर त्यांनी हिंदीच्या सर्व बोलीभाषा.. पंजाबी, गुजराथी, उर्दु, पारशी आणी मराठी भाषेतही बोलण्याचे कौशल्य विकसित केले होते. महाराष्ट्राच्या प्रवासात राविदासांनी मराठी भाषा शिकली होती. महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील एलोरा येथील जगप्रसिद्ध लेण्यांना राविदासांनी भेट दिली होती. त्या परिसरात त्यांचा सतत तीन दिवस मुक्काम होता. तेथे त्यांनी प्रवचने दिली. असंख्य महाराष्ट्रीय लोकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले होते. याचं लोकांनी राविदासांना नंतर नाशिक, देहू, पुणे, पंढरपूर येथे नेले असावे कारण महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायावर देखील राविदासांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. संत राविदासांना रोहिदास (अपभ्रंश) असे म्हणून महाराष्ट्रीय लोकांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला आहे. महाराष्ट्रीय संतांनीही राविदासाच्या कार्याची दखल घेतली होती.

पंढरपूरची स्थापना राविदासानीच केली असेही सांगण्यात येते. याबाबतीत संशोधन होणे गरजेचे आहे. एलोरा येथे राविदासांचे कुंड आहे असे सांगण्यात येते. तिरुपती येथेही राविदासांनी भेट दिली असुन तेथेही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुंड निर्माण करण्यात आल्याचे काही पुस्तकातून सांगण्यात आले आहे. संत रविदास हे विज्ञानवादी सत्य विचारांचे प्रचारक होते, तर त्यांनी पंढरपूर आणी तिरुपती येथील अंध्रश्रद्धा वाढवणाऱ्या मंदिरांना भेटी कश्या काय दिल्या?? याबाबत चीक्तीसा होणे गरजेचे आहे. तिरुपती आणी पंढरपूर येथे पूर्वी बुद्धविहार होते, त्याचेच मंदिरात रुपांतर केल्याचे बोलले जाते, हे सत्य असेलं तर राविदासांनी मंदिरांना नव्हे बौद्ध विहारांना भेटी दिल्याचे दिसून येते. याबाबतही व्यापक प्रमाणात संशोधन होणे अपेक्षित आहे.

सर्व चर्मकार(चांभांर) हे बौद्ध विचारांचे अनुयायी होते. ते ‘चीवर’धरी होते. चीवर या शब्दापासून चर्मकार हा शब्द रूढ झाल्याचे आचार्य रजनीश यांनी नमूद केले आहे. बुधाच्या समतावादी.. विज्ञानवादी विचारसरणीचा अवलंब करून राविदासानी मानवता, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणी न्यायावर आधारित विचारधारेचा प्रचार-प्रसार केला. बाह्य अवडंबराला महत्व न देता मानवी ‘मन’ हा आपलं केंद्रबिंदू मानून बुधाने मनाच्या शुद्धीचा मार्ग सांगितला. राविदासानी मनावर चांगले संस्कार करण्याचा संदेश दिला आहे.

‘रे मन चल अब अमृत देस, जहां न मिर्तु न सोंग कलेस |
निर्गुण का गुण देखो भाई, देही सहित कबीर सिधाई |
लोकं वेद सब कर खंडोती, अर्योसरन करे दंडोती ||’

अर्थ-

हे मना, तू आता अमृत प्रदेशात चल, जिथे ना मरण आहे, ना शोकः(दु:ख), ना क्लेष(यातना) आहे. या निर्गुण भक्तीतच कबीर निर्वाणांला प्राप्त झाले. सगुण भक्तीचा संदेश देणाऱ्या वेदाचे मी खंडन केले आहे. माझे हे विचार दवंडी देवून सांगत आहे. चोरून-लपून नव्हे तर निर्गुण विचारांचा आणी मनाच्या शुद्धतेचा प्रसार-प्रचार मी जाहीरपणे करत आहे असे राविदासानी उपरोक्त दोह्यातून स्पष्ट केले आहे.

सनातनी व्यवस्था झिडकारणाऱ्या संतश्रेष्ठ गुरु राविदासांना विनम्र अभिवादन… जय रविदास.. जय भीम !!

संदर्भ पुस्तकं- गुरु रविदास भ्रम आणी वास्तव , लेखक- चंद्रप्रकाश देगलूकर

Thank u- Chandraprakash Degloorkar , Dr Balaji Jadhav

छायाचित्रासाठी धन्यवाद- Avinash D Kadam भाऊ.

लेखं संकलन- निलेश रजनी भास्कर कळसकर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!