दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बाबांचे बाबा ते आजचे बाबा

ज्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आणि आपल्या हक्क आणि अधिकारासाठी कायमच लढले आणि आपल्याला हक्क आणि अधिकार मिळवून दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यामध्ये जो मोठा वाटा होता ते त्यांचे बाबा सुभेदार रामजी आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन आहे यानिमित्ताने ..

बाबासाहेबांची आई बाबासाहेब लहान असतानाच त्यांचे निधन झाले. आणि मग त्यानंतर बाबासाहेबांना घडवण्यामध्ये जशी त्यांच्या आत्या मीरा आत्या व बाबासाहेबांचे वडील रामजी यांचा खूप मोठा वाटा आहे लहानपणातच बाबासाहेबांना वाचनाची आवड निर्माण करणे व त्याची चिकित्सा करणे बाबासाहेबांवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडवण्यासाठी शिस्त लावणे. बाबासाहेबांनी त्यावेळच्या आपल्या समाजाला समतेची वागणूक मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांना तयार करणे. एका छोट्याशा गल्लीतल्या एका छोट्याशा घरात राहून सुद्धा एक मुलगा देश घडवू शकतो देशाचे संविधान लिहू शकतो देशातील कोट्यावधी लोकांना सामाजिक समता व स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांना त्यांच्या अधिकार देतो एका छोट्याशा गल्लीतील घरातील मुलगा त्याकाळी जगामधील मोठमोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ शकतो. आणि जगात त्यांना नॉलेज ऑफ सिम्बॉल याने ओळखले जाते हे वाटते एवढी साधी सोपी गोष्ट कधीच नाही.

बाबासाहेबांचे काम हे कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते एका धर्मापुरते मर्यादित नव्हते. बाबासाहेबांनी समस्त स्त्रियांकरता हिंदू कोड बिलच्या माध्यमातून खूप सुधारणा घडवून आणणारे कायदे हो तयार केले होते. पण त्या वेळच्या पुढाऱ्यांनी ते मान्य केले नव्हते.

सर्व समाजाकरता काम तयार करणे कोणत्या समाजाविषयी आकस करू नये हे संस्कार बाबासाहेबांना लहानपणीच रामजी यांनी दिले होते.
त्यामुळेच भीमराव ते बाबासाहेब आणि नॉलेज ऑफ सिम्बॉल व हा प्रवास बाबासाहेब करू शकले.
लहानपणापासून बाबासाहेबांना घडवणाऱ्या रामजी यांचे संस्कार मात्र आजचे पालक आजचे लहान मुलांचे बाबा स्वतः मात्र अंगीकारत आहेत का याचा विचारही झाला पाहिजे?

प्रत्येकाला वाटतं माझा मुलाने मोठा होऊन असं झाले पाहिजे ते केले पाहिजे पण त्याकरता रामजी बाबा सारखे संस्कार देण्याची आणि आपल्या लहान मुलाला घडवण्याची हिंमत दाखवली पाहिजे. आजही आपल्यामध्ये मुलांच्या शिक्षणाकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. नुकत्याच एका जागतिक सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की चार कोटी मुले आजही शिक्षणा बाहेर आहे. तर ओरिजनल आकडा हा यापेक्षा नक्की जास्त असेल. पण याबरोबरच जे पालक म्हणून आपले कर्तव्य आपली जबाबदारी आपल्या मुलांबद्दल कशा पद्धतीने करत आहे याची आपण चिंतन केले पाहिजे.

व्यसनाचे प्रमाण आजही ग्रामीण भागातील वाडी वस्ती व शहरातील जो स्लम भाग आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. व्यसनामध्ये इतका पैसा खर्च केला जातो पण मुलांना शैक्षणिक वस्तू त्यांना संस्कार घडवणारी पुस्तके व त्यांच्या आरोग्यासाठी मात्र काही तरतूद करून ठेवू शकत नाही अशी परिस्थिती आहे.

सुभेदार रामजी बाबा यांच्या स्मृतिदिनाविषयी अभिवादन करताना फक्त त्यांना अभिवादन करणे एवढेच अपेक्षित नाही. त्याचबरोबर बाबासाहेब वाचले पाहिजे बाबासाहेब वाचून समतेच्या दृष्टिकोनातून समजून घेतले पाहिजे. तसेच त्यांनी बाबासाहेबांना कशा पद्धतीने घडवले ते आजच्या पालकांनी आजच्या बाबांनी लक्षात घेतले पाहिजे आणि एक ध्येय ठेवले पाहिजे माझा मुलगा माझे मुलगी हे बाबासाहेबांसारखी घडली पाहिजे जर असा विचार केला तर कुठेतरी बाबासाहेबांच्या पावलावर बाबासाहेबांच्या विचारांवर आपण मार्गक्रमण करू शकतो.

नाहीतर घरातील कोपऱ्यातील देव्हाऱ्यात काल्पनिक देव आणि इतर काल्पनिक देवादेवतींचे उत्साहात नाचून आणि पाहून जगणारे. आणि पुढची पिढी व्यसनाधीन नक्कीच होऊ शकेल.
आजची 1 ते 8 वर्षाच्या आतील मुले घरातील टीव्हीवरील कार्टून व गेम्स वरती वेळ घालवत आहे तर घरातील मोठी माणसे पारंपारिक सिरीयल यातून काहीही अर्थबोध होऊ शकत नाही यातील आपण काही सामाजिक संदेश नाही असे टीव्ही मालिका पाहत आहे.

कार्टून मधील छोटा भीम हा फक्त वेगवेगळे काल्पनिक पद्धतीने आहे.

या आधुनिक पद्धतीचा उपयोग करून आपण वैचारिक पद्धतीने लहान मुलांच्या पद्धतीने कार्टूनच्या माध्यमातून बाबासाहेबा असो किंवा समतेच्या विचाराचे इतर महापुरुष असो यांना दाखवलं पाहिजे त्यांचे विचार सांगितले पाहिजे त्यांचे विचार व्हिडिओ मधून लहान मुलांच्या पद्धतीने दाखवले पाहिजे.

रामजी बाबांना अभिवादन करताना त्यांनी बाबासाहेबांना कशा पद्धतीने घडवले याचा विचार करून आपण ही प्रत्यक्षात आपल्या मुलांवरती लक्ष दिले पाहिजे. मुलांना घडवले पाहिजे. ही अपेक्षा.

ज्यांनी आपल्याला हक्क आणि अधिकार दिले हक्क आणि अधिकार दिले. सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील आदरणीय रामजी बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना आपण आदर करतो. पण त्याबरोबरच बाबासाहेबांनी जे लिहिले आहे ते किमान आपण वाचले पाहिजे आणि वाचून समजून घेतले पाहिजे व त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे.

आपण भारतीय संविधान वाचले आहे का. समजून घेतले आहे का आणि इतरांना समजून सांगितले आहे का.
बाबासाहेबांच्या विचारांमधील नागरिक तयार करण्यासाठी संविधान वाचणे आवश्यक आहे जर आपणास संविधान वाचायचे असेल समजून घ्यायचे असेल तर माझ्या वरील नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा आपल्याला संविधानाच्या पहिल्यापासून पोस्ट मिळतील
आपलाच
यश भालेराव
9067047333

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!