
केंद्रीय बजेट निव्वळ धूळफेक, महिला, बेरोजगार आणि शेतकरी ह्यांचे साठी काहीच नाही – राजेंद्र पातोडे.
आजचा केंद्रीय बजेट पूर्णपणे धूळ फेक असून त्यामध्ये महिला, बेरोजगार आणि शेतकरी ह्यांचे साठी काहीच नाही.मागील बजेट मध्ये केलेल्या तरतुदी पूर्णपणे बाद ठरल्या असून रुपयाने नीचांकी पातळी गाठली असून फसवणुकीचा बजेट असून सामान्य माणूस पूर्णतः बेदखल करणारा बजेट असल्याची टीका वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढवणे, सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करताना खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे, देशांतर्गत भावना उंचावणे आणि वाढत्या मध्यमवर्गाची खर्च क्षमता वाढवणे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे निर्मला सीतारामन ह्यांनी जाहीर केले आहे.मात्र त्याला कुठलाही ठोस आधार नाही.केवळ आकड्यांचा खेळ करण्यात आला आहे.असेच दावे मागील बजेट मध्ये देखील असेच ‘बडबोले’ दावे करताना शेतीमध्ये उत्पादकता आणि लवचिकता
रोजगार आणि कौशल्य
सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय
उत्पादन आणि सेवा
नागरी विकास
ऊर्जा सुरक्षा
पायाभूत सुविधा
नवोपक्रम, संशोधन आणि विकास आणि
पुढच्या पिढीतील सुधारणा
सामान्य माणसाची खर्च करण्याची क्षमता वाढविली जाणार असल्याचे सांगितले होते.मात्र त्यातील काहीही साध्य करता आलेले नाही.देशात शिक्षण आणि नौकरी देशातील तरुणाईच्या आवाक्या बाहेर आहे.सार्वजनिक उद्योग बंद करून खाजगी कंपन्या आणि उद्योगपती ह्यांना फायदा करणारी धोरणे लागु केली जात आहेत.शेतकऱ्याचे शेतमाल हमी भावाचा कायदा नाही, शेती व्यवसाय ह्याला कुठलीही ठोस उपाय योजना नाही.महिला,सुशिक्षित बेरोजगार ह्यांना केवळ कर्जाचे स्वप्न दाखविण्यात आले आहेत.त्यामुळे सर्व पातळीवर अपयशी केंद्रीय बजेट असल्याची टीका देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत