देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

बौद्धच रस्त्यावर का उतरतात?

SC,ST,OBC आणि यातून धर्म परिवर्तीत लोकांवर जेव्हा मनुवादी अन्याय अत्याचार करतात तेव्हा बौद्धच रस्त्यावर का उतरतात?इतर लोक ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो ते लोक काहीच का हालचाली करत नाहीत?मित्रांनो असा विचार करून जे लोक जन आंदोलनाचा विरोध करतात त्यांच्यासाठी ही आजची पोस्ट लिहित आहे.
भारतात दोन विरूध्द विचारधारा काम करत आहेत. एक आहे बहुजन महापुरुषांची विचार धारा जी बहुजनांना जागृत करत असते.आपल्या हक्क अधिकारासाठी सतर्क करत असते. समता, स्वातंत्र्य,बंधुता आणि न्यायासाठी हि विचारधारा काम करत असते.या विचारधारेचे सत्य कुणालाही पडताळून पाहता येईल.तर मनुवादी विचार धारा माणसाला संभ्रमित करत असते. भरकटवत असते.हि विचारधारा काल्पनिक अर्थात असत्यावर आधारित असते.इथे कोणतेही विचार सिद्ध करता येत नाहीत पण तरीही ते विचार सात्यत्याने लोकांवर बिंबवले जातात.एकप्रकारे माणसाला अंध बनवण्यासाठी ही मनुवादी विचारधारा काम करत आहे. जो जो या विचारधारेच्या संसर्गात येतो तो तो अंध अर्थात गुलाम होतो.मनुवादी विचार धारेने गुलाम झालेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. कारण त्या विचारधारेच्या प्रचार प्रसारासाठी प्रसारमाध्यमे कार्यरत आहेत.
पहिली विचारधारा मानवी उत्कर्षासाठी हितकारक आहे. पण तिचा प्रचार, प्रसार फार कमी प्रमाणात होत आहे. हि विचारधारा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे बौद्ध धर्मिय लोकांत आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीचा वारसा चालवणाऱ्या लोकांत आहे.त्यामध्ये बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, सत्यशोधक समाज या सारख्या अनेक संघटना आहेत. पण त्याही अल्प ठरतात.तरीही या सर्व संघटना विश्वरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन गुलामांना गुलामीची जाणीव करून देत आहेत.समता,स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारित समाज रचनेसाठी कार्य करत आहेत.
जे लोक पहिल्या प्रकारच्या विचार धारेचे आहेत ते जागृत असतात. मनुवादी विचारधारेने गुलाम झालेल्या लोकांना ते सत्य पाहता येत नाही जे आंबेडकरवादी विचार धारेचे लोक पहात असतात. ज्यांना सत्य पाहता येते तेच लोक जागृत असतात त्यामुळे अर्थातच जागृत लोक प्रत्येक वेळी मैदानात दिसतात. दिसतील.गुलाम असलेले लोक मनुवादी लोकांची शिकार आहेत. ते सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध होते. या अर्थाने ते आपलेच बांधव आहेत. म्हणून त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी आपण जागृत लोकांनी प्रयत्न करायला हवेत.तोवर त्यांच्या हक्क अधिकारासाठी लढणे हे आपले कर्तव्य समाजायला हवे.शाळेत घेतलेली प्रतिज्ञेचे वेळोवेळी स्मरण करायला हवे.म्हणजे अपना काम बनता भाड में जाय जनता ही आपल्यातील वृत्ती संपून जाईल. शेवटी समाजाच्या हितामध्ये आपलं हित आहे. हे विसरून कसे चालेल? हे सच्चा बौद्धांना समजते म्हणून ते आपल्या बांधवांच्या हिस्स्याची लढाई लढत आहेत. त्यांना माझा सॅल्यूट.
✍️संतोष मधुकर पाटणकर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!