देशभारतमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

तथागत भगवान गौतम बुद्ध यांना जसा विष्णुचा अवतार आहेत म्हणून ओबीसी समाज बांधव यांच्या डोक्यात घुसवले आहे,

RSS BJP मनुवादी विचाराचे झालेले ब्राम्हण वादी ओबीसी समाज बांधव यांच्या देवी देवता पुजा पाठ 33 कोटी देव, त्यांच्या डोक्यात असल्याने हिंदुत्व हि भावना मनात कायम असल्याने व त्यांचा प्रचार आणि प्रसार यंत्रणा मजबुत असल्याने 40 विविध संस्थांचे वेगवेगळे जाळे विणले गेले आहेत. आणि त्यांना सपोर्ट BJP सरकार स्थापन झाल्यापासून कोणताही अडथळा येत नसल्याने त्यांची बाजू बळकट मजबुत होत आहे. म्हणुन त्यांनी fake Post करून तथागत भगवान गौतम बुद्ध यांना जसा विष्णुचा अवतार आहेत म्हणून ओबीसी समाज बांधव यांच्या डोक्यात घुसवले आहे, त्याच आधारावर आत्ता आरएसएस BJP सरकार मोदी पंतप्रधान यांनी जनतेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भ्रम निर्माण ओबीसी समाज बांधव यांच्या डोक्यात घुसवले जात आहे. आपण त्यांचा वैचारीक दृष्टीकोनाने विचार करून जनतेच्या मनात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला महत्त्व लक्षात येऊन ओबीसी समाज बांधव यांच्या डोक्यात घुसवले पाहिजेत होते त्यासाठी सामाजिक बांधिलकी जपून निःस्वार्थ कार्याने प्रभावित होऊन समाजाच्या जनहितार्थ कार्य करण्यासाठी प्रयत्न करीत नाही आहोत, त्यामुळे त्यांनी ओबीसी समाज बांधव यांच्या लोकांना भंते बनवून बौद्ध धम्म खात्मा करण्याचे मिशन राबवित आहेत.
ह्याची जाणीव आपल्याला झालेली असेल तरीही ज्या पद्धतीने समर्थन करायला पाहिजे, त्यानुसार नियोजन मिशन भारतात राबवित नाही आहोत, आपण आपल्या परीने आपल्याच तंद्रीत स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवून स्वतःच्या प्रसिध्दी मिळाली पाहिजेत यासाठी प्रत्यक्षात काम करीत असल्याचे जगजाहीर पने दिसुन येत आहे.
त्यासाठी आपण स्वतात बदल घडविला पाहिजेत की,
मी प्रथम बौध्द धम्म दीक्षा घेवुन बौध्द धर्माचा स्वीकार केला पाहिजे. व त्यानुसार नियोजन मिशन भारतात राबविणे अत्यंत सोपे जाईल, तसेच भिक्खू संघाचे विविध संघ तयार झालेल्या आहेत, त्यांनी एकत्रीत येवुन खरे भिक्खू कोन कोन आहेत ह्याची खात्री करून घेतली पाहिजे, आपण नेते पदाधिकारी कार्यकर्ते मुर्खासारखे विविध गटाचे पक्षाचे विखुरलेले असल्याने आपली भुमिका कशी बज्वायची याची काळजी घ्यावी लागेल,
कारण कुठेही सामाजिक चळवळ सुरू करताना सामाजिक परिवर्तन महत्त्वाचे आहे. त्यामधूनच आपण एकत्रीत येवुन केलेल्या कामाचा काहीतरी उद्देश सफल होऊ शकतो.
जसे महाबोधी महाविहार बोधगया बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली असेल तर ते खरंच बौदधधर्मीय बनून काम करीत आहेत काय??
ह्याची खात्री करून घेतली पाहिजे.
तुमचा उद्देश परिपूर्ण करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू केली आहे, त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन करतो आहे.
पण आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे एकमेकाच्या विचाराची देवाण घेवाण करतांना बोलतांना लिहितांना विवेक बुध्दीचा वापर केला पाहिजे, पण असे होताना दिसत नाही आहेत.
आजपर्यंत आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मातृत्व संघटना बांधणी मजबुत करण्यासाठी यशस्वी वाटचाल सुरू केली पाहिजे होती, त्याप्रमाणे बौध्द अनुयायी बनून काम करनार नाहीत, आणि त्याप्रमाणे चालणार नाहीत, तोपर्यंत आपण आपल्या बचाव आंदोलन करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, ते success होवु शकत नाही.
त्यासाठी नेतृत्व करणारा
भंते संघ असो की आणखी कोणीही नेता असो.*
यांनी एकत्रीत येवुन निःस्वार्थ कार्याने प्रभावित होऊन समाजाच्या जनहितार्थ कार्य करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.

महाबोधी महाविहार बोधगया बचाव कृती समिती
स्थापना करण्यात आलेली दिसुन येते आहे. तेव्हां प्रत्येक राज्यातून त्यांचें प्रतिनिधी कृती समिती मध्ये सामील करुन घेतले पाहिजेत.

कारण बुध्द विहार चे माध्यमातून कुठेही गावात तालुक्यात जिल्हयात शहरात राज्यात आपण आपल्या स्वतःच्या पोटासाठी स्वार्थ साधण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवून स्वतःच्या प्रसिध्दी मिळाली पाहिजेत यासाठी प्रत्यक्षात काम करीत असताना दिसुन येत आहेत.
ह्याला प्रथम मुठमाती दिली गेली पाहिजे,
कारण आपले नेते पदाधिकारी कार्यकर्ते एखाद्या पक्षाचे गुलाम बनुन काम करीत आहेत.
त्यामुळे जनतेच्या हितासाठी काम करतो म्हणतात, पण करीत नाही आहेत. तो आपल्या आंदोलनात सहभागी झालेला दिसतो आहे, पण तो समाजाच्या हितासाठी काम करीत नसतो.
हा माझा प्रत्यक्षात दीक्षा भूमी नागपुर बचाव मोहीम राबविताना आलेला अनुभव आहे.
कारण ९०% नागपुरातील लोकांचा सपोर्ट केलेला होता की, दीक्षा भूमी नागपुर येथे सौंदर्यीकरण होणाऱ्या बांधकामाबाबत अंडरग्राऊंड दोन हॉल, संडास बाथरुम,car parking मलनिस्सारण केन्द्र तिस फूट खोदकाम करुन स्मारक समितीचे संचालक मंडळ यांनी बांधकाम पूर्ण करणार होते. ते झालेच पाहिजे…
तर 10% लोकांचा विरोध केला होता की, दीक्षा भूमी नागपुर येथे होणाऱ्या बांधकामाबाबत बंद करण्यात आले पाहिजे, यासाठी स्मारक समितीचे संचालक मंडळ यांना भेटून निवेदन देण्यात आले, त्यांना विरोध करून दीक्षा भूमी नागपुर चे स्तूपाला कसा धोखा निर्माण झालेला दिसतो आहे, त्याची सविस्तर माहिती ऊपलब्ध करून जनतेला देण्यात आली आहे. स्तूपाच्या आत भेगा पडलेल्या होत्या, तेव्हां रातोरात चार लोखंडी पिलर खांब लावण्यात आले होते. पावसाळ्यात पाणी स्तूपात तीन फूट पर्यंत होते, यावर सविस्तर माहिती भारतातील बौध्द अनुयायी यांना देन्यात आली होती.
पण डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संचालक मंडळ बांधकाम पूर्ण करण्यासाठी यशस्वी झालेच होते, पण दीक्षा भूमी नागपुर बचाव करण्यासाठी 1/7/2024. लाखों बौध्द अनुयायी यांना विनंती करण्यात आलेली होती, त्याप्रमाणे बौध्द अनुयायी येवुन बांधकाम बंद करण्यासाठी दीक्षा भूमी नागपुर येथे आलेत, त्यामुळे स्तूपाला होणारा धोखा शांत झाला.
आत्ता जमीन समतोल करण्यासाठी nit ला बाध्य कऱण्यात आले त्यानुसार त्यांनी सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून जनतेला दिलासा देण्यासाठी समतोल जमीन करून दिलेली आहे.
हे सर्व दोनशे कोटी रुपये खर्च करून स्मारक समितीचे संचालक मंडळ यांना यांचा हिस्सा मिळाला असता.
दीक्षा भूमी नागपुर हि घराणेशाही selected लोकांची संस्था झालेली आहे. तेव्हां लक्षात आले आहे.
दीक्षा भूमी नागपुर चे नावाने जमीन झालेली नाही आहे.
ह्यासाठी 90% लोक काहीही करतांना दिसत नाही आहेत.

पण आंदोलनात सामील न होता,
कृति समिती स्थापन करण्यात आली पाहिजे यासाठी प्रयत्न केले आहेत.
अशी ही बनवाबनवी आपलेच स्वतःला प्रामाणिक आंबेडकरवादी स्वाभिमानी बौध्द समाजाचे नेतृत्व करणारे करतांना बोलतांना लिहितांना दिसत आहेत.
ह्यावर विश्वास कसा ठेवायचा हा मोठा ग्रहण प्रश्न निर्माण झालेला दिसतो आहे.
खरे भिक्खू संघाचे भिक्खू यांनी बौध्द धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी गावात तालुक्यात जिल्हयात शहरात राज्यात जावून काम सुरू केले पाहिजेत,
त्यामधून एक नवनिर्मिती बौध्द धम्म दीक्षा देण्याची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे कामाला वेग आला पाहिजे सामाजिक संघटन मजबुत करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करावे.
आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपून निःस्वार्थ कार्याने प्रभावित होऊन समाजाच्या जनहितार्थ फायद्याचे ठरेल असे काम करण्याची गरज आहे.
RSS BJP मनुवादी विचाराचे झालेले दिसत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आपण आपल्या समाज बांधव यांच्या हितार्थ नियोजन मिशन भारतात राबविणे सुरू करू शकतो.
विविध गट तटात विभाजन असलेले अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांनीच एकत्रीत येवुन काम सुरू करीत असतील तर बरे होईल…
अन्यथा कितीही संघर्ष केला तरी काहीही उपयोग होणार नाहीत.
तेव्हां सर्वांनी मिळुन एकत्रीत येवुन काम करण्याचा विळा उचलला पाहिजेत.
असे मला वाटते आहे.

जनहितार्थ जारी

डॉ. जयप्रकाश बोधी,
दीक्षा भूमी नागपुर
9421725648.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!