आर्थिकमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

मुंबईत प्रेवेशसाठीचा टोल महागणार ४०रु.या ऐवजी ४५रु.

मुंबईत प्रवेश करण्यासाठी चारचाकीसाठी सन २००२मध्ये २० रुपये असलेला पथकर सध्या ४० रुपये आहे. आता १ ऑक्टोबरपासून तो ४५ रुपये होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (एमएसआरडीसी) एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून हा पथकर वसूल केला जातो.

मुंबई महापालिका क्षेत्राच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे, ऐरोली-मुलुंड मार्गावर ऐरोली येथे, पश्चिम द्रुतगती मार्गावर दहिसर येथे व ठाणे शहरातून येताना मुलुंड येथे दोन पथकर नाके सन २००२पासून सुरू करण्यात आले. २००२पासून दर तीन वर्षांनी या पथकराच्या दरांत वाढ केली जात आहे. यामध्ये चारचाकी, मिनी बस, ट्रक व अवजड वाहने, अशी श्रेणी निश्चित करण्यात आली आहे.

एमएसआरडीसीनुसार, सध्या चारचाकी वाहनांसाठी ४० रुपये, मिनी बससाठी ६५ रुपये, ट्रकसाठी १३० रुपये व अवजड वाहनासाठी १६० रुपये पथकर वसूल होत आहे. दर तीन वर्षांनी वाढ होणाऱ्या या पथकरातील अलीकडील दरवाढ १ ऑक्टोबर २०२०पासून लागू झाली होती. ती सहाव्या वसुलीकाळातील दरवाढ होती. आता सातव्या वसुलीकाळासाठी पुढील तीन वर्षांसाठीचा पथकर १ ऑक्टोबरपासून अनुक्रमे ४५ रुपये, ७५ रुपये, १५० रुपये व १९० रुपये होणार आहे. ही दरवाढ ३० सप्टेंबर २०२६पर्यंत लागू असेल. हा पथकर २०२७पर्यंतच वसूल होणार आहे. त्यानुसार आठवा व अखेरचा वसुली कालावधी १ ऑक्टोबर २०२६ ते ३० सप्टेंबर २०२७ असा एक वर्षासाठीच असेल. मात्र त्या काळातही महामंडळाने पथकर दरवाढ प्रस्तावित केली आहे.

सध्याचे दर (रुपयांत)

चारचाकी : ४०

मिनी बस : ६५

ट्रक : १३०

अवजड वाहन : १६०

वाढीव दर (रुपयांत)

चारचाकी : ४५

मिनी बस : ७५

ट्रक : १५०

अवजड वाहन : १९०

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!