सरकार जनतेवर EVM लादण्यात धन्यता का मानीत आहे ?…

बहुजन बांधवांनो ,
मनुवादी मीडिया कडून जाणीवपूर्वक EVM चा मुद्दा संपला आहे असा खोटारडा प्रचार प्रसार करण्यात येत आहे पण वस्तुस्थिती तशी नाही . प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला मागील वेळेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत याचे भांडवल करून स्वतः मोदी शेठ आता EVM चा मुद्दा समाप्त झाला आहे असे सुचवीत आहे . जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ,संभ्रम निर्माण करण्यासाठी RSS / BJP च्या विविध नेत्यांकडून अशी विधाने करण्यात येत आहेत .
दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते राहुल गांधी EVM वर डायरेक्ट हल्लाबोल न करता फक्त विरोध करण्याचे नाटक करीत आहे . बहुजनांनी ही दोन्ही राजकीय पक्ष असे का वागत आहेत याचा खोलात जाऊन अभ्यास करने गरजेचे आहे . त्यासाठी या दोन्ही राजकीय पक्षांचा जन्माचा इतिहास अभ्यास करणे गरजेचे आहे . थोडक्यात याठिकाणी इतकेच सांगता येईल की काँग्रेस आणि आजची BJP या दोन्ही राजकीय पक्षांची स्थापना स्वतःला उच्च वर्णीय समजणाऱ्या ब्राम्हणांनी केली आहे . भारताला स्वातंत्र्य मिळतेवेळी बहुजनांच्या शिक्षणाचे प्रमाण अगदी नगण्य होते हे सर्वांना माहित आहे . बोटावर मोजण्याइतके लोक शिकत होते . तुम्ही स्वतः तुमच्या घराण्यात कीती पूर्वज शिकले होते याची माहिती घेऊन खात्री करू शकता . अश्या अशिक्षित असलेल्या बहुजनांना मूर्ख बनवणे खूप सोपे होते म्हणून या धूर्त ब्राम्हणांनी बहुजन समाजासमोर दोन प्रमुख राजकीय पक्षांचा पर्याय ठेवला . तुम्ही यापैकी एकाला निवडून देऊन सत्ता द्यावी हा पर्याय ठेवला गेला . आता कोणालाही निवडून दिले तरी त्यांचा आतून एकच छुपा असलेल्या अजेंडाची अंमलबजावणी होत होती . बहुजन समाज (sc, st, obc, मुस्लिम, जैन, बौद्ध… वै वै ) यांनी फक्त मतदान करून सत्ता कोणाला सोपवायची हे ठरवायचे असते . अंतिम निर्णय हा हेच उच्च वर्णीय ब्राम्हण घेत असत . आजही त्या परिस्थितीत किंचितही फरक पडलेला नाही .आजचे बहुजन नेते हे राजकीय पक्षांचे दलाल असल्याप्रमाणे काम करीत आहे . आपण त्यांना आपल्या जातीचे किंवा धर्माचे म्हणून निवडून देत असतो पण हे निवडून दिलेले नेते त्यांच्या राजकीय पक्षांशी बांधील असतात . आणि या दोन्ही राजकीय पक्षांचे सुप्रीमो हे उच्च वर्णीय ब्राम्हण असल्याने शेवटी ते त्यांच्या हिताचेच निर्णय घेतात हे वास्तव आहे . आणि हे बहुजन नेते दलाल प्रमाणे काम करतात त्यासाठी ‘पुणे करार’ सुद्धा कारणीभूत आहे . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राणपणाने या पुणे करारास विरोध केला होता परंतु मोहनदास करमचंद गांधी यांनी केलेल्या आमरण उपोषणामुळे शेवटी नाईलाजाने डॉ. आंबेडकर यांना या बहुजन समाजविरोधी पुणे करारास नाईलाजाने मान्यता द्यावी लागली होती हा इतिहास बहुजनांनी समजून घ्यावा . या पुणे करारामुळेच आज दलाल भडवे नेते समाजात निर्माण झाले आहे . असे नेते समाजाच्या भल्यासाठी विधानसभेत किंवा संसदेत तोंड उघडू शकत नाही, समाजाचे प्रश्न मांडू शकत नाही कारण त्यांच्यावर पक्षाचा बडगा असतो . (ज्यांनी पक्षाचा आदेश न जुमानता बहुजन समाजाच्या हितासाठी संसदेत आवाज उठवला त्यांचा गोपीनाथ मुंडे केला जातो .)
आता काँग्रेस प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने या EVM ला विरोध का करीत नाही ते पाहू . मुळात हे EVM मशीनच काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी भारतात आणलेले आहे . या काँग्रेसने या EVM चा गैरवापर करून 2004 आणि 2009 साली दोन वेळा सत्ता मिळवली होती . ही फसवणूक नंतर BJP च्या लक्षात आली आणि डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांनी हातात असलेल्या पुराव्याच्या आधारे काँग्रेस विरोधात सुप्रीम कोर्टात केस दाखल केली . पण आपले बिंग फुटू नये व जनतेच्या रोषास सामोरे जायला लागू नये म्हणून त्यावेळी धूर्त काँग्रेस पक्षाने समजूतदारपणा दाखवला आणि अंधारात BJP बरोबर एक अलिखित गुप्त समझोता (त्यास मांडवली म्हणतात ) केला . त्याप्रमाणे BJP ने ही पुढे याच EVM चा गैरवापर करून दोन वेळा सत्ता प्राप्त करण्याचे ठरले . आणि पुढे सर्व काही आधीच ठरल्याप्रमाणे घडून आले . 2014 व 2019 ला दोन्ही वेळा BJP बहुमताने निवडून आली आणि काँग्रेस पक्षाने या विरोधात चकार शब्दही उच्चारला नाही . एक चोर दुसऱ्या चोरा विरोधात बोलू शकेल का ? ‘ तेरीभी चूप और मेरीभी चूप ‘ असे आहे .आणि या दोन्ही चोरांना निवडणूक आयुक्त सर्वकाही मदत करून त्यांना नेमून दिलेले काम ‘इमानदारीने’ करीत आहे . म्हणूनच बहुजनांचे राष्ट्रीय नेते मा. वामन मेश्राम साहेब निवडणूक आयोगाला ‘चोरांचा सरदार’ म्हणतात .
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच ब्राम्हणांनी अतिशय धूर्तपणे सर्वच उच्च पदांवर ब्राम्हणांची वर्णी लावून त्यांचे भविष्य सुरक्षित केलेले आहे . आजही सर्वोच्च न्यायालयापासून , विद्यापीठाच्या कुलगुरूपासून ते विविध IAS ऑफिसर्स हे सर्वच्या सर्व ब्राम्हण समाजाने कब्जा करून ठेवले आहे . मग असा सर्वच क्षेत्रात असलेला ब्राम्हण समाज अर्थातच ब्राम्हण समाजाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्यासाठी त्यांचे योगदान देणार नाही तर काय ? इंटरव्हिव्ह मध्ये बहुजनांना डावलून या उच्च वर्णीयांना संधी मिळवून दिली गेल्याचे आपण अनेकदा अनुभवले असेलच . नौकरी मध्ये उमेदवारांची निवड करण्याच्या प्रक्रियेत धूर्त ब्राम्हणांकडून इंटरव्हिव्ह नावाचे ‘घोडे’ हे जाणीवपूर्वक घुसडण्यात आलेले आहे . न्यायालयातील ‘कोलेजीयम सिस्टिम’ मुळे नेमणूक झालेल्या ब्राम्हण न्यायाधीशांकडून बहुजनांना न्याय कसा मिळेल ? म्हणूनच न्यायालयात न्यायाच्या प्रतीक्षेत लाखो करोडो केसेस आजही पेंडिंग आहेत . बहुजनांना न्याय द्यायचाच नाही आणि दिलाच तर खूप उशिरा द्यायचा अशी ही पॉलिसी आहे .(म्हणूनच ब्रिटिशांनी या ब्राम्हणांकडे ‘न्यायिक चरित्र’ चा अभाव असल्याचा ठपका ठेवत त्याकाळी ब्राम्हणांना न्यायाधीश बनता येऊ नये म्हणून खास कायदा केला होता .) म्हणजेच बहुजनांनी न्याय मागण्यासाठी न्यायालयात येऊच नये अशी मानसिकता तयार करण्याचा हा खास प्रयत्न आहे . 2014 नंतर तर RSS /BJP ने ‘जॉईंट डायरेक्टर’ सारख्या अतिमहत्वाच्या पदांवर ‘लॅटरल एन्ट्री’ मार्फत कोणतीही परीक्षा न घेता डायरेक्ट उच्च वर्णीय उमेदवारांची भरती करून उरली सुरली कसर ही भरून काढली आहे . बहुजनांना हातावर तुरी दिल्या तरी अजूनही बहुजनांचे डोळे उघडलेले नाहीत हे दुर्दैव आहे . दोन्ही राजकीय पक्ष बहुजनांची जातनिहाय जनगणना करीत नाही तरीपण त्या पक्षाला जाब विचारण्या ऐवजी बहुजन समाज नाईलाजाने या दोन्ही राजकीय पक्षाला साथ देत आहे . ‘दगडा पेक्षा वीट मऊ’ या नात्याने बहुजन समाजाने या वेळी काँग्रेस पक्षास सत्तेत जावे म्हणून मतदान केले होते पण यावेळी सुद्धा BJP ने बटीक असलेल्या निवडणूक आयोगाच्या मदतीने हेराफेरी करीत सत्ता प्राप्त केली आहे .पण आधीच भ्रष्टाचारात-गैरकारभारात हात बरबटलेले असल्याने काँग्रेस पक्ष मूग गिळून गप्प बसलेला आहे .
काल प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती व तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे मालक इलॉन मस्क यांनी ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) काढून टाकली पाहिजेत, हॅक होण्याचा धोका आहे .’ असे ट्विट केले तेव्हा कुठे राहुल गांधींना उपरती झाली व त्यांनी जनलाजेखातर ‘भारतात EVM हे ‘ब्लॅक बॉक्स’ असून ते तपासण्याची परवानगी कोणालाच नाही ‘ असे मत व्यक्त केले . इलॉन मस्क हे तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘बादशहा’ आहे त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला विशेष महत्व आहे . तरी निर्लज्जपणे निवडणूक अधिकारी राजीव चंद्रशेखर याचा इंकार करीत आहे व भारतातील EVM सुरक्षित असल्याचा दावा करीत आहे . भारतात या EVM विरोधात इतका असंतोष असतानाही सरकार या EVM ला जबरदस्तीने जनतेवर लादन्यात धन्यता का मानीत आहे ?
मध्यंतरी अशोका युनिव्हर्सिटी मधील अर्थशास्त्र विषयाचे प्रोफेसर सब्यसाची दास यांनी EVM वर सखोल संशोधन करून एक प्रबंध (thesis) तयार केला होता पण त्यासाठी त्यांचे कौतुक करण्याऐवजी सरकारच्या दबावामुळे प्रशासनाने त्यांना नौकरीवरून काढून टाकले . या प्रबंधात त्यांनी EVM मुळे मतदानाच्या टक्केवारीत कश्या प्रकारे हेराफेरी केली जाते हे सप्रमाण सिद्ध केले आहे . खरे पाहता विरोधकांनी या प्रोफेसरांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक होते , त्यांना संरक्षण देऊन माध्यमासमोर आणणे गरजेचे होते पण ज्यांची नियतच खोटी आहे ते असा चांगला निर्णय कसा घेतील ? त्याच प्रमाणे गेली अनेक वर्षे याच EVM च्या विरोधात जनजागृती करण्याचे महत्वाची कामगिरी देशव्यापी सामाजिक संघटना ‘बामसेफ’ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब करीत आहेत . त्यांनी स्वतः याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती .मा. वामन मेश्राम साहेबांच्या प्रयत्नामुळेच सरकारला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने EVM मशिन्स सोबत VVPAT मशिन्स लावावे लागले होते .आता याच जागृतीमुळे सुप्रीम कोर्टातील जेष्ठ कायदेतज्ञ महमूद प्राचा यांनी अथक प्रयत्न करून या EVM च्या विरोधात अनेक पुरावे जमा करून सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल केली आहे . पण कोर्ट त्यांना न्याय देईल का नाही याबाबत शंकाच आहे . EVM विरोधात देशातील अनेक तज्ञांनी स्वतः डेमो देऊन EVM च्या सहाय्याने मतांची कशी हेराफेरी करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक दिलेले आहे . बिहार मधील सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. गोपाल कृष्ण यांनी स्वतः EVM मशीन ने मतांची हेराफेरी करता येऊ शकते हे सप्रमाण सिद्ध केले आहे .
Link :
https://youtu.be/u2AckT3cNh0?feature=shared
तसेच गुजरातचे सॉफ्टवेअर इंजिनिअर श्री. राहुलभाई चिमणलाल मेहता यांनी स्वतः मेहनत घेऊन संपूर्ण EVM व VVPAT ची डेमो मशिन्स तयार करून त्याद्वारे मतदान प्रक्रियेत कशी हेराफेरी करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक सादर करून सप्रमाण सिद्ध केले आहे .
Link :
https://www.youtube.com/watch?v=fmLzPdNpxg0
तसेच EVM चे अभ्यासक असलेले जेष्ठ पत्रकार श्री. राजू परुळेकर यांनी सुद्धा या EVM बद्दल अनेक संदर्भ देऊन EVM मशिन्स वापरणे देशातील लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कसे धोक्याचे आहे हे पटवून दिले आहे .
Link :
https://youtu.be/tnL2rCCyRh8?feature=shared&sfnsn=wiwspwa
लोकशाहीचे संरक्षण होणे , जनतेच्या मतदानाच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण होणे महत्वाचे की मतदान प्रक्रिया लवकर होणे महत्वाचे आहे हे जनतेने ओळखून आतातरी जागे व्हावे व या मनुवादी व्यवस्थे कडून न्याय मिळणार नाही हे ओळखून रस्त्यावरील आंदोलनासाठी तयार रहावे अन्यथा देशातील नागरिकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार फक्त जगाला दिखाव्यासाठी असणार आहे .
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
बहुजन हिताय, बहुजन सुखाय… ✊
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत