कायदे विषयकदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

सोशल मीडिया वर शासनाची सूक्ष्म नजर आवश्यकच


ऍड अविनाश टी काले , अकलूज
तालुका माळशिरस , जिल्हा सोलापूर
9960178213
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी नुकतेच विधान केले की सायबर गुन्हे आणि फेक नरेटीव्ह पसरवणाऱ्या प्रत्येक सोशल मीडिया वरील व्यक्ती वर सायबर शाखेची सूक्ष्म नजर असणार आहे , अगदी व्हॉट्सॲप चे माध्यमातून केले जाणारे तपशील ही वेळ प्रसंगी उपलब्ध होतील ,
लोकशाही वादी राष्ट्रात अनेकांचा समज हा स्वैर स्वातंत्र्य वादी असतो ,
लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला लिखाण करण्याचे , भाषण करण्याचे , अभिनय करण्याचे , ते प्रदर्शित करून जनतेची मते बनवण्याचे स्वातान असते ,
पण हे स्वातंत्र्य अनिर्बंध नसते हे अनेकांना माहीत च नाही ,
त्या मुळे आपणास अभिव्यक्ती स्वातंत्र्या ने सर्व कांहीं खुले अधिकार दिलेले आहेत या भ्रमात लोक राहतात ,
जन जागृती चे नावाखाली भडक लिखाण करताना , दुसऱ्यांचे लिखाण वाचून त्यावर स्वतः चा कांहीं एक अभ्यास नसताना , हाताशी कोणतेही लिखित तथ्या आधारित पुरावे नसताना इतरांच्या भावना , आस्था यांना क्षती पोहचविणारे लिखाण करणे ही अलीकडे अनेकांची फॅशन झालेली आहे ,
आपण फार मोठ्या समाज सुधारकांच्या श्रेणीत मोडतो असा ही अनेकांचा समज किंवा गैर समज असतो ,
अर्थात यातून नवे वादाचे प्रसंग उद्भवतात व समाजात अशांतता निर्माण होते तेंव्हा शासनाला , पोलीस प्रशासनाला याची दखल घ्यावीच लागते ,
अनेकदा असे लिखाण फॉरवर्ड करण्याची ही अनेकांना सवय असते , इथे फक्त एक बाब लक्षात ठेवली पाहिजे ती ही की , लिखाण करणारे , वादग्रस्त पोस्ट लिहिणारे जेवढे दोषी असतात तेवढेच दोषी त्या पोस्ट ला फॉरवर्ड करणारे ही असतात .
ही बाब मुख्यमंत्री ना देवेंद्र जी फडणवीस साहेबांनी स्पष्ट शब्दात महाराष्ट्रातील जनतेला सांगितलेली आहे ,
अगदी विधानसभेत अर्बन नक्सल वादी हे भारतीय लोकशाही व्यवस्था , भारतीय राज्यघटना यांना मानत नाहीत , प्रचलित सत्ता ते सशस्त्र मार्गाने उलथवून टाकू इच्छितात या त्यांच्या वाक्याला ही संदर्भ हिन मोडतोड करून तेच लोकशाही वादी नाहीत , अश्या प्रकारचे व्हिडिओ लोकांनी प्रसारित केले ,
जे अस्तित्वात नाही त्यास मोर्फिंग करून बेमालूमपणे फेक व्हिडिओ बनवले जातात आणि ते ही प्रसारित केले जातात ,
बांगला देशाचे राष्ट्राध्यक्ष यांच्या अर्ध पुतळ्याला पाण्यात बुडवून मारणाऱ्या जमावाला चित्रित केलेल्या व्हिडिओ ला थेट डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शी जोडून त्यांची विटंबना केल्याचे सांगणारे मजकूर प्रसार माध्यमावर प्रसिद्ध झालेले पाहिले आहेत ,
समाजात सामाजिक सौदर्हता, शांती, एकात्मता नांदू नये अशी अनेक समाजकंटकांची ईच्छा असते त्या प्रमाणे ते त्यांचे वर्तन करत राहतात ,
समाजात विविध धर्म , पंथ , प्रांत , भाषा असलेले लोक असतात ,
आम्ही म्हणतो तोच खरा धर्म , आणि बाकीचे तकलादू , खोटे , आमचाच प्रांत हा सर्व श्रेष्ठ आणि इतर पर प्रांतीय म्हणजे देशाचे दुश्मन , आमचीच भाषा बोलली पाहिजे हा दुराग्रह अश्या सर्व प्रकारातून सामाजिक हार्मनी धोक्यात येते ,
परवा हेच सर संघ चालक प पू मोहनराव भागवत यांनी पुणे येथे सांगितले ,
मत परिवर्तन होऊन धर्मांतर होणे ही व्यक्ती गत बाब असली तरी असे धर्मांतर जबरदस्ती ने करणे बेकायदेशीर असेल , आणि ईश निंदा ही खपवून घेतली जाणार नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे , आणि आम्ही त्या मताशी सहमत आहोत ,
एक दुसऱ्याचा आदर राखणे हे आपले कर्तव्य ठरते ,
“विविधतेत एकता नसून एकतेत विविधता असावी “हे विधान अधिक तर्कसंगत आहे .
समाजात वेगवेगळ्या विचारधारा चे लोक राहत असतात , वेगवेगळ्या पक्षांना मानणारे ही लोक असतात , आपला पक्ष सत्तेत असावा अशी भावना बाळगणे गैर नाही
पण त्यासाठी निवडणुका हा मार्ग आहे ,
एकदा प्रचलित निवडणूक मार्गाने शासन स्थापित झाल्या नंतर त्या शासनास सर्वाधिकार प्राप्त होतात ,
त्या शासनाने बहुमताने घेतलेले निर्णय कायद्यात रूपांतरित होतात तेंव्हा शासनाचे निर्णयाचे पालन करणे हेच नागरिकांचे कर्तव्य ठरते ,
परंतु अस्तित्वात आलेले सरकार हे बेकायदेशीर रित्या स्थापित झालेले आहे असे दर्शवणे म्हणजे राज द्रोह असतो ,
प्रचलित निवडणूक पद्धती वर आक्षेप घेणे , प्रचलित न्यायव्यवस्थेला आव्हान देऊन त्यांच्या निर्णयाला नकार देणे हा ही राज द्रोह च असतो , आणि लोक एखाद्याच्या सांगण्या वरून दुराग्रही बनून प्रचलित निवडणूक यंत्रणेला ही आव्हान देण्याचा नादानपणा करतात तेंव्हा ते ही असाच गुन्हा करतात ,,,,
आपल्या स्थानिक राजकीय नेत्याला कायद्या पेक्षा , शासन सत्ते पेक्षा ही मोठे समजून त्यांच्या समर्थनार्थ उतरून एखाद्या व्यक्तीस , प्रतीपक्ष नेत्यास धमकावणे , त्यांचे विरोधात अश्लील टीका टिप्पणी करणे हा गंभीर गुन्हा ठरू शकतो याची ही जाणीव कित्येकांना नसते,
सोशल मीडियावर असे अनेक लोक निर्माण झालेले असून या उपद्रव खोरांची लिस्ट बनवणे आवश्यक झालेले आहे असे माझे प्रामाणिक मत आहे ,
महाराष्ट्र शासनाने अश्या प्रकारच्या विकृत लोकांच्या मुसक्या कायदेशीर रित्या आवळण्याची मोहीम सुरू केली पाहिजे , तरच
महाराष्ट्रात शांतता व कायद्याची सुव्यवस्था अस्तित्वात राहील ,,,
गुन्हेगारी वृत्तीचे , सरंजाम दार आणि जहागीर दार संस्थानिकांनी निर्माण केलेले सोशल मीडिया वरील विकृत भाट आणि त्यांची फुललेली मांदियाळी तेंव्हाच आटोक्यात येईल ,
प्रवीण जी दरेकर यांनी सांगितले की , अगदी महायुतीतील नेत्यांच्या आई बहीण आणि बाप काढून कमरेच्या खालचे वार करणारे सोशल मीडिया वरील विकृत नराधम ही अस्तित्वात होते ,
ते आज ही अस्तित्वात आहेत , अश्या विकृत लोकांचा बंदोबस्त करणे आवश्यकच झाले आहे आणि त्या साठी शासनाची सुक्ष नजर अजून तीव्र अतिसूक्ष्म केली पाहिजे , ,,
तूर्त इतकेच ,,,,,,,!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!