प्रतिक्रांतीचा धोका – आ ह साळुंखे

म.फुले, छ.शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रेरणेने निर्माण झालेली आजची चळवळ ही काही या देशातील परिवर्तनाची पहिली चळवळ नव्हे.
खरे तर अशा प्रकारच्या अनेक चळवळी झाल्या आहेत. पण #क्रांतीनंतरप्रतिक्रांती घडण्याचा क्रमही आपल्या इतिहासात वारंवार आढळतो. क्रांतीच्या प्रभावामुळे शोषकांची पीछेहाट झाली,तरी ते दबा धरून बसतात आणि योग्य संधी येताच प्रतिहल्ला करून परिवर्तनाची चळवळ मोडून काढतात.असे आढळते.येथे #सिंधूसंस्कृतीनंतर समाजाला चार वर्णांत विभागणारी #वैदीक संस्कृती निर्माण झाली. सर्वसामान्य माणसांना शोषणाच्या कचाट्यातून मुक्त करणारी आणि केवळ भारतालाच नव्हे तर जवळजवळ सर्व आशिया खंडाला प्रभावित करणारी #गौतमबुद्धांची महाक्रांती घडून गेल्यानंतर येथे #मनुस्मृती च्या रूपाने एक महा-प्रतिक्रांती निर्माण झाली. परिवर्तनाच्या चळवळी करू इच्चीणार्यांना सावधगिरी चा इशारा देण्यासाठी मी नेहमी या घटनेकडे आवर्जून त्यांचे लक्ष वेधू इच्चीतो. #मनुस्मृतीहीगौतमबुद्धांच्याआधीनव्हे ,तर नंतर निर्माण झाली आणि पुढे जवळजवळ दोन हजार वर्षे आपल्या मानगुटीवर बसली,हे आपण विसरता कामा नये. पुढच्या काळातही नामदेव-ज्ञानदेव, कबीर-तुकाराम यांच्यासारखे अनेक संत होऊन गेल्यानंतर आणि सर्वसामान्य माणसांना जवळ करणारी शिवाजी महाराजांची राजवट होऊन गेल्यानंतर या देशात #पेशवाई निर्माण झाली. आणि आता सर्व माणसांना परस्परांशी जोडणारी आणि सर्वांना फुलण्याची संधी देणारी भारतीय प्रजासत्ताकाची राज्यघटना तयार होऊन पन्नास वर्षे झाली की नाही, तोवरच धर्माच्या नावाखाली सर्वसामान्य लोकांच्या मनात भ्रमनिष्ठा रुजवून प्रस्थापित शोषणव्यवस्था मजबुत करण्याचे आणि परिवर्तणाच्या चळवळी मोडुन काढण्याचे आटोकाट प्रयत्न आपल्या अवती-भोवती सुरू झाले आहेत. 🖋️ आहसाळुंखेसर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत