
भारत सरकारनं कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सूचनावली प्रसिद्ध केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली.
भारत सरकारनं आपल्या सूचनावलीत म्हटलं आहे की, “कॅनडामध्ये भारतविरोधी कारवाया, राजकीयदृष्ट्या प्रेरित हेट क्राइम आणि हिंसाचारात वाढ लक्षात घेता, तिथं राहणाऱ्या किंवा तिथं प्रवास करण्याची योजना आखणाऱ्या सर्व भारतीयांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.”
भारतीय नागरिकांना सल्ला देण्यात आला आहे की, “कॅनडामध्ये ज्यांनी भारतविरोधी अजेंड्या विरोधात आवाज उठवला आहे अशा भारतीय मुत्सद्दी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांना अलीकडे लक्ष्य करण्यात आलं आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांना कॅनडातील अशा क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येतोय.”
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत