कायद्याचे संरक्षण कोणाला ?


विनायकराव जामगडे
भारतीय राज्य घटना ने सर्वांना समान अधिकार व समान न्याय दिला.सर्व जाती पंथ यांना आपल्या उपासना करण्याचा मोकळीक दिली आहे.आपल्या श्रद्धांनुसार आचरण करून आपली श्रद्धा व्यक्त करण्याची मुभा दिली आहे.
हा देश धर्म निरपेक्ष असून सर्व धर्मांचे लोक आप आपल्या धर्माच्या पूजयनियाचे मंदिर उभारू शकतात.पूजा अर्चना करु शकतात.प्रार्थना करून आपल्या श्रद्धा स्थानी असणार्या ना आदर व्यक्त करू शकतात.याला कायद्याची आडकाठी नाही.हा अधिकार घटनेने दिला आहे . हे सर्व भारतीय नागरिकाना समान लागू आहे.
ग्रामीण भागात फक्त हिन्दु देवळे उभी करण्याची मुभा आहे काय असा प्रश्न निर्माण होतो.बौदध धम्माचा स्वीकार केला त्यांना आपली उपासना करण्यासाठी विहार बांधण्यात अडथळे निर्माण केले जाते.त्यानी सरकारी जागेवर अतिक्रमण करुन पचशीलेचा झेंडा उभा केला किंवा विहार बांधण्यासाठी काम सुरू केले तर ग्राम पंचायत चे पदाधिकारी अडथळे आणीत असतात
त्यांना जागेच्या मालकी संबंधी विचारणा करून बांधकाम थांबविले जाते.
दुसरीकडे हिंदुंचे देवस्थान पुतळे उभी करण्यास कोणतीही हरकत नसते . त्यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून मंदिर बांधले तर त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.कोणी विरोध केला तर धार्मिक कार्यात अडथळा आणतो म्हणून लोकांच्या धार्मिक भावना भडकावून त्याला धार्मिकरूप दिले जाते त्यांना
सरकारी यंत्रणा मदत करून विरोध करणार्या व्यक्तीवर पोलीस कारवाई केली जाते. परंतु बौद्ध धर्माच्या लोकावरच त्यांनी झेंडा उभा केला म्हणून धार्मिक तेढ निर्माण केला म्हणून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला जातो.त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंदवून कारवाई केली जाते अशा भेदभाव का करण्यात येते हा प्रश्न आहे.
मोबाईल फोन वर भिमाची कालटोन वाजविली म्हणून जीवंत मारले जाते. हा समान कायद्याचे उल्लंघन नाही काय..
नागपुर शहराला लागून बिडगाव आहे.आरधना नगर येथे जमीन मालकांनी सार्वजनिक वापरासाठी जागा सोडली त्या जागेवर हनुमानाचे देऊळ उभारले.हिनदुचे धार्मिक विधी पार पाडली जाते . त्याला कोणीही विरोध केला नाही.
१४ आकटोबर२०२०ला आराधना नगरवासीयानी धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याचे ठरविले.सार्वजनिक जागेवर कार्यक्रम करण्यासाठी ग्रामपंचायत ची परवानगी घेण्यात आली.पोलीस स्टेशन वाठोडा कार्यक्रमास परवानगी देण्यासाठी निवेदन देण्यात आले.परतु तेथील पोवार समाज कुणबि तेली समाजाच्या लोकांनी विरोध केला.सार्वजनिक जागेवर एका दिवसात तारेचे कंपाऊंड टाकून त्या जागेवर धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास विरोध केला.पदाधिकारी यांच्या दबावाखाली पोलिस निरीक्षक ताकसाडे यांनी बोलून लोकांना धमकावून सार्वजनिक जागेवर कार्यक्रम घेण्यास बंदी केली.हा कुठला धार्मिक स्वातंत्र्य . बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्या लोकांच्या हाती मोक्याच्या जागा मिळाल्या तर आपल्या लोकांना न्याय मिळेल.येथे तर दोन्ही समाजाचे काय म्हणने आहे हे ऐकुन घेतले नाही सवर्ण लोकांच्या मतानुसार बौद्ध लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली.
ग्रामीण भागातील हा मोठा प्रश्न झाला आहे की बौद्धांनी विहार बांधण्यासाठी प्रयत्न केला तर अनेक अडथळे आणले जातात.हा सामाजिक प्रश्न झालेला आहे.
भाजप काँग्रेस पक्षाला बौद्ध धर्माच्या लोकांची मते चालतात परंतु सामाजिक प्रश्नांवर ते बाजू सुवर्णाची घेतात. आज ग्रामीण भागातील बौद्धांचा कोणी कैवारी नाही.समाजाची संघटना नाही.बेकीमुळे कोणी कोणाकडे लक्ष देत नाही.
भारतीय राज्य घटना सर्वांना लागू असताना हा भेदभाव का.
विनायकराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत