निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

…तर महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
शनिवार दि. 7 डिसेंबर 2024.
मो.नं. 8888182324.

नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक पार पडली आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी चारीमुंड्या चित झाली आहे. निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारकरित्या लागल्याचे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आहे. तसेच मतदारांमध्ये सुध्दा निकाला बाबत साशंकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभवाचे खापर evm वर फोडले आहे. तसेच evm विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने बॅलेट पेपरवर निवडणुक घेण्याचा मुद्दा पुढे आला आहे. माळशिरस मधील मडकडवाडीतील गावकऱ्यांनी तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची तयारीही केली होती. पण पोलिस प्रशासनाने गावकऱ्यांचा डाव उधळून लावला.

विधानसभा निवडणूकीनंतर महायुतीतही मुख्यमंत्री पदावरुन रुसवेफुगवे पहायला मिळाले. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळूनही तेरा दिवस मुख्यमंत्री कोण याची वाट पहावी लागली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आजपासून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन लावण्यात आले. मात्र, महाविकास आघाडीच्या आमदारांनी हे evm सरकार आहे अशि खिल्ली उडवून शपथ घेण्यास नकार दिला. मात्र दुसऱ्या दिवशी शपथ घेण्यास ते राजी झाले. खरेतर महाविकास आघाडीला evm वर जर विश्वास नसेल आणि जनतेचा विश्वास संपादक करायचा असेल, तसेच निवडणुक आयोगाचा बॅलेट पेपरवर निवडणुका न घेण्याचा घमंड तोडायचे असेल तर विरोधातील सर्व आमदारांनी अधिवेशनात शपथ न घेता सरळ राजीनामे द्यावेत. तसेच यापुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका निवडणूक आयोग जर बॅलेट पेपरवर घेत नसेल तर सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकून एकही उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर करावा. भलेही निवडणुक आयोगाने विरोधकांच्या बहिष्काराला गंभीरतेने न घेता निवडणुका घेतल्या तरी चालतील. कारण, भारतातील न्यायालये सरकारच्या ताटाखालचे मांजर झाल्यामुळे जनतेच्या न्यायालयात तुम्ही निवडणूक न लढताही जिंकल्यातच जमा आहे. तसेही संशयास्पद evm वर निवडणूक लढून थोड्याशा जागा निवडून येण्यापेक्षा बहिष्काराचे हत्यार काम करुन जाईल.

प्रमुख राजकीय पक्षांच्या बहिष्काराला न जुमानता निवडणूक आयोगाने निवडणूका घेऊन बिनविरोध केल्या तर जनतेमध्ये रोष निर्माण होईल. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी जनताच रस्त्यावर उतरेल. संविधानाने प्रत्येक नागरीकाला दिलेला बहुमूल्य मताच्या अधिकाराची जर अशाप्रकारे चोरी होत असेल तर जनता निवडणूक आयोगाचा उद्देश सफल होऊ देणार नाही. म्हणून महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावर विधानभवनात शपथ न घेता सरळ राजीनामे द्यावेत. तरच लोकशाही वाचेल. नाहीतर यापुढेही लोकशाहीचा असाच गळा घोटला जाईल हे लक्षात ठेवावे! ✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!