विज्ञाननिष्ठ आंबेडकरवाद

आंबेडकरवाद म्हणजे नीती आणि नीती म्हणजे आंबेडकरवाद. जीवनाला सत्य मानणारी प्रणाली म्हणजे आंबेडरवाद.
आंबेडकरवादाचा मूळ गाभाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आंबेडकरवादाने पाप-पुण्य, कर्मकांड अंधश्रद्धा आत्मा या गोष्टीला नकार दिलाय. या गोष्टी माणसाच्या मेंदूला बधिर करत आहेत असे स्पष्ट सांगणे आहे.
मानवी देह हे आप तेज वायू आणि पृथ्वी या चार भौतिक तत्वपासून तयार होते
बाबासाहेबांनी आकाश हे तत्व नाकारले आणि पाचवा घटक विज्ञानाला मानले.
माणसाच्या मानसविश्वला त्यांनी ‘नामस्कंध’ म्हटले हे नामस्कंध म्हणजे विज्ञान.
आंबेडकरवादात समता, बंधुता,आणि न्याय या मानवी मूल्यांचा उद्घोष केला आहे. आंबेडकरवाद माणसाला ‘नायकत्व’ देतो. जाती धर्माची चौकट आंबेडकरवादात मंजूर नाही. माणूस हा माणूसच आहे या माणसाने इतरांचे माणूसपण अबाधित ठेवावे स्वतःचे माणूसपण फुलवताना इतरांच्या माणुसपणाला इजा पोचणार नाही याची दक्षता असावी हेच आंबेडकरवादाचे सांगणे आहे.
डॉ. बाबसाहेबांचा समाजवाद आणि secularism हेच येथील समाजाला राजकीय व सामजिक पडझाडीतून बाहेर काढू शकतो. आपण डॉ. बाबासाहेबांनी मांडलेला समाजवाद आणि सेक्युलर विचाराचा पाईक होणे या दोन गोष्टी आपल्या सर्वकल्याणकारी ठरणार आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत