दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

खरा महिलादिन केव्हा??

  • अनिता देशमुख
  • नांदुरा ( बुलढाणा)
  • हमू._ कल्याण

जसा पोळ्याचा बैल पोळ्याच्या दिवशी सजवला जातो तसे ८ मार्च आला
का महिलादिनी महिलांचा आदर ,भाषणे. सत्कार बापरे
बाप केवढा दिखावा आणि नंतर ?ै
मला एक प्रश्न आहे भारत
स्वतंत्र झाला, पण इथे महिला खरच स्वतंत्र आहेत का हो?
आज समाजात स्त्री भयमुक्त
जीवन जगत आहे का हो ? मग असे जर नाही तर हा स्वातंत्र्याचा हा खोटा
बोलवाला कशाला? आज स्त्री शिकली तरी ती स्वतंत्र नाही तिला आजही बंदी आहे.
तिला अनेक प्रकारे छळले जात आहे,
धर्माच्या नावावर , जातीच्या नावावर, रूढ़ी,
परपरा, अशी अनेक बंधने स्त्रीला आहेत.
नऊ महिने पोटात गर्भ साठून , वाढवते
त्यासाठी किती त्रास, यातना ती भोगते हे फक्त तिलाच माहिती असते.
खर सांगा एवढी सहनशीलता पुरुषांमध्ये आहे का?
मग विचार करा ती किती
शक्तिशाली आहे.
आज समाजात पुरुष स्त्रियांशी
वयक्तिक संबंध ठेवतात पण हेच जर स्त्री ने
जर ठवले तर तिला नानाप्रकारच्या पदांनी संबोधिले जाते.
,असे का ?
जर स्त्री पुरुष समानता आहे तर मग इथे का दिसत नाही?
म्हणजे पुरुषांना मैत्रिणी असतील असे संबंध असतील तर त्यांना मुभा दिली जात असते.
जर स्त्रीने एखाद्या पुरुषाशी मैत्रीचे संबंध ठेवले तर तिला बदचलन म्हटले जाते !
मग एकदिवसीय महिला सत्कार करण्याचा
हा खोटा दिखावा आहे.
आज
अनेक ठिकाणी नव्हे तर घराधरात मुलीला तू मुलगी आहेस लवकर घरी ये असे
सांगितले जाते, कुणी मुलाला सांगते का ? तू लवकर घरी परत ये.
महिला सक्षमीकरनाचे कायदे आणि तोटे
जर स्त्री पुरुष समानता
आहे तर मग या बाबतीत का नाही ?
आज विज्ञानाने महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाही
मग हा लैंगिक भेदभाव इथे का दिसून येतो ?
वंश वाढवण्यास तुम्हाला दिवा लागतो तो म्हणजे मुलगा मग पणती म्हणून मुलगी का चालत नाही ?
नाहीत ना मग मला सांगा हे तुमच्या वंशाचे दिवे किती दिवे लावतात ? किती उजेड पाडतात? सांगाल का ?
आज समाजात आपल्याला बघायला मिळते
आईवडिलना सांभाळतात का ? आज वृद्धाश्रमात किती आईवडील आपले प्राण सोडतात !
आपण बघतो प्रत्येक क्षेत्रांत महिला मागे आहेत का ? नाही ना आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे जात आहेत . ही सल मला टोचते. मग अशा स्त्रियांना गुलामीच्या बेडया का?
आज हेच वास्तव आहे आणि अशा स्त्रियांच्या बाबतीत हा भेदभाव कुठेतरी बदलायला हवें .
तुम्ही जातीभेद करताय मग जेव्हा बलात्कार होतो तेव्हा त्या मुलीची किंवा स्त्री ची जात बलात्कारी बघतो का ?
पिडीत मुलीला ,महिलेला न्याय मिळतो का?
यसाठी सर्व महिला आणि पुरुष दोधांनीही एकत्र यायला हवे.
ज्या सावित्रीबाई नी जीवाचे रान करून ,लोकांचा त्रास सहन केला आणि स्त्रियांना शिकवण्यास प्रवृत्त केले .त्याच स्त्रिया कितीतरी त्रास सहन करत असतात.
त्याच स्त्रिया आज व्रत ,वैकल्ये ,उपासतपास ,नवरात्री , सण,मार्गशीर्ष यांच्या मागे लागल्या आहेत.वैचारिकता त्यांच्यात नाही.
असे म्हणावे लागेल की तिच्या पदरी हे लादले गेले आहे. पिढीजात जाचक बंधने तिच्यावर हा पुरुष प्रधान संस्कृती तिच्यावर लादल्या गेल्या आणि ती सुद्धा यात स्वतः बांधून घेतले आहे .
गुरफटली गेली आहे
ती सुद्धा यातून बाहेर निघायला स्वतः तयार नाही.
महिलेला एक दिवसांचा आदर नको असतो तिला मुक्त जगण्याचे स्वातंत्र हवे असते.
समाज तिला मुक्तपणे जीवन जगू देत नाही
पदोपदी महिलेला उंबरठा आहे कधी मुलांना जन्म देण्याचा ,सासरी कर्तव्य नीभवण्याचा, पतीच्या सन्मानाचा,तिच्या सासरच्या लोकांना खुश ठेवण्याचा असे अनेक उंबरठे तिच्या भाळी अश्वस्थाम्याच्या जखमेप्रमाने आहेत.
लग्न लग्न झाल्यानंतर तिचे आडनाव बदली केली जाते. ज्या आई-वडिलांनी तिचे नामकरण तिलाजन्मतः एक जे नाव दिले जाते ,ज्या नावाने तिची ओळख असते .तेच नाव तिचे लग्नानंतर बदली केले जाते का बरे ? पुरुष असे करतात का ? पुरुष लग्नानंतर स्त्रीचे माहेरचे आडनाव लावतो का ?मग स्त्रीच्याच माथी हे का ?
तिने दागिने घालावे, हिरव्याच बांगड्या घालाव्या. याप्रमाणे तिच्यावर बंधने का दागिना हा स्त्रीचा श्रृंगार आहे .आणि तो तिने केव्हा घालावा आणि केव्हा घालू नये हे तिचे तिने स्वतंत्रपणे ठरवावे.
तुम्ही तिला यामध्ये दागिने घालण्याची सक्ती करू नये. आणि मुळात यामध्ये जास्तीत जास्त सहभाग हा स्त्रियांचाच असतो. स्त्रीच स्त्रीला ह्या बंधनांमध्ये लादत असते. दागिन्यांनी स्त्री सुंदर दिसते पण तिने ते घालावे किंवा घालू नये हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर समाजाने तिच्यावर सक्ती करायला नकोय ,कारण हे स्त्रीला तू स्त्री आहे याची सतत जाणीव देण्यासाठी आहे .
तू कमजोर आहेस तू लाचार आहेस अशी एक भावना सतत तिच्या भाळी खुणगाट म्हणून बांधून ठेवण्यासाठी या अलंकाराचा हा साज चढवला जातो.
येता जाता ,उठता बसता ,सर्वत्र आई ,बहिणी वरून शिव्यांचा भडिमार असतो.भाजीत कमतरता तिच्या आईचा उल्लेख !
मुलांची भांडणे आजची पुरुष मंडळी आणि तरुण मंडळी रस्त्याने आई बहिणी वरून घाण शिव्या देतात काय हाच आहे स्त्रीचा सन्मान.
आज तुम्ही तिच्याच गर्भातून जन्म घेतला ना ! मग तुमची आई बहीण आणि दुसऱ्याची आई बहीण वेगळी झाली का ?? यावर काही सुधारणा नाही.
मैत्रिणींनो आता तरी खऱ्या अर्थाने तुम्ही सक्षम झाल्या आहात. परंतु या बंधनांना या जाचला एकदा तरी शांतचित्ताने विचारपूर्वक जाणून घ्या .
एखादी स्त्री तिचा नवरा जर वारला तर तिला समाजामध्ये शुभारंभामद्ये ,लग्न कार्यांमध्ये ,हळदीकुंकू मध्ये बंधने असतात का?
तिचा नवरा वारला त्यात तिचा काय दोष ? तिच्या इच्छा आकांक्षा नसतात का ?तिला भावना नसतात का उलट तुम्ही त्या स्त्रीला स्वतःहून त्या सगळ्या समारंभामध्ये सामील करायला हवे .
एखाद्या स्त्रीचा नवरा डॉक्टर असतो, पोलीस असतो, रक्षक असतो तो देशसेवक असतो .तर तिचा नवरा वारला त्यात तिचे तिचा दोष आहे का? उलट देश कार्यासाठी तिचा नवरा शहीद झाला म्हणून तुम्ही सर्वात आधी त्या महिलेचा सन्मान करून तिला सर्वात आधी तुम्ही तिला बोलावले पाहिजे.
हा बदल केव्हा घडेल बरे त्या विधवेला सुद्धा मुक्त राहण्याचा, सजण्याचा ,जगण्याचा समारंभात राहण्याचा अधिकार आहे.
हे कुठेतरी बदलायला हवं आणि हे कोण बदलणार हे आपणच बदलायला हवे.
यासाठी समाजातील सर्व स्त्री भगिनी आणि पुरुषवर्ग सर्वांनी एकत्र यायला हवे. आज आपण बघतो हुंडाबळी किती असतात एक बाप मुलीला वागवण्यासाठी आज जगामध्ये किती तडजोडी करतो. स्वत कष्टाने त्या मुलीची आयुष्य बनवतो .
तिला शिकवतो, लहानाची मोठी करतो आणि लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांना तिचा हुंडा का मागावे बरे !!
आधीच तो त्याची मुलगी देऊन तो त्याच्या आयुष्याची पुंजी तुम्हाला देतो आणि वरून तुम्ही त्याला हुंडा मागावे हा हुंडाबळी सुद्धा बंद व्हायला हवाय.
या हुंडाबळी मुळे आज देशामध्ये ,समाजामध्ये करोडो मुली आपल्या जीवाचा बळी जातात त्या बापाच्या जागी तुम्ही स्वतःला ठेवून बघा बरं आयुष्याची जमापुंजी तो आपली मुलगी तुम्हाला देऊ करतो आणि वरून तुमच्या ह्या मागण्या त्याला महिलांनीच ठरवायला पाहिजे .की जो मुलगा हुंडा मागेल त्याच्याशी मी लग्न करणार नाही आणि ‘हुंडा मागणे हुंडा देणे आणि घेणे हे दोन्हीही कायद्याने गुन्हा आहे’.
आणि तो तो जो कायदा आहे तो आपण स्वतः अमलात आणायला हवाय तेव्हाच हे चित्र कुठेतरी बदललेली दिसतील.
ही जी मानसिकता या मानसिकतेमध्ये स्वतः स्त्री गुरफटली ,बांधली गेली आहे. ती स्वतःच या बंधनातून मुक्त व्हायला बघत नाही तिची हिंमतच होत नाही बहिणींनो तुम्हीही हिम्मत स्वतःमध्ये जागृत करा आणि ही मानसिकता बदली करा. समाजामध्ये ह्या ज्या प्रथा परंपरा , रूढी आपल्यावर ज्या लादल्या जातात त्या स्वतःच आपण बंद करायला हवाय.
ज्या दिवशी पुरुष शौचालयामध्ये स्त्री मुक्तपणे जाऊ शकेल तोच दिवस महिला सत्काराचा असेल अन्यथा बाकी हा सर्व एक धोका आहे एक ढोंग आहे असेच मी म्हणेल.

  • अनिता देशमुख
  • नांदुरा ( बुलढाणा)
  • हमू._ कल्याण

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!