शाहू महाराज छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीनंतर काय म्हणाले?

शाहू महाराज छत्रपती यांचाही पाठिंबा मिळाला आहे. काही वेळापूर्वीच शाहू महाराज छत्रपती यांनी आंतरवली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा कुणबी एकच आहेत सगळ्यांचा व्यवसाय शेती आहे आणि सरकारला आरक्षण द्यावंच लागेल असं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे.
एक पुरावा मिळाला तरी पुरतो, १५ हजार पुरावे पुष्कळ झाले आहेत. जाळपोळ वगैरे जास्त झाली. आपली ताकद वाढली पाहिजे यासाठी जे करायचं आहे ते केलं पाहिजे. सरकसट आरक्षण आपल्याला मिळणारच आहे. सरकारला ते द्यावं लागेल. सरकारला ही मागणी मान्य करावीच लागेल. कुणबी, मराठा हे सगळे एकच आहेत. सगळ्यांचाच व्यवसाय शेती आहे असं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आणि कुणबी एकच ही आमचीही भावना आहे असंही शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे. आज सरकार या प्रश्नी बैठकही घेतं आहे. आता अपेक्षा करु की सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करेल. मी मराठा समाजातल्या बांधवांना विनंती करतो की कुणीही आत्महत्या करु नये.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत