खान्देशनागपूरमहाराष्ट्रमुख्यपान

नागपूर दीक्षाभूमी वर धम्मदीक्षा वर्धापन दिन समारोह संपन्न.

धम्मचक्र गतिमान करूया सध्याच्या स्मारक समितीला बदलावे लागेल -डॉ भीमराव य आंबेडकर

नागपूर – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्रांत्या केल्या त्यांनी शेवटची धम्मक्रांती केली त्यामूळे सर्व जग बाबासाहेब आंबेडकर यांना बोधिसत्व म्हणतात.
ही क्रांती मी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहे , स्मारक समितीला पत्र देऊन दिक्षा भूमी येथे व्यवस्थेसाठी 3 हजार समता सैनिक दल देण्याचे व विचार मांडण्याचे मी रितसर प्रयत्न केला परंतु त्यांनी तसे न करता व्यवस्था पोलिसांच्या हाती दिली व तेथे येणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती ना रिसिव्ह व करण्यासाठी स्मारक समितीचे ट्रस्टी व त्यांचे प्रतिनिधी कोणीही नव्हते ,डॉ बाबासाहेब यांना मानवंदना देण्यासाठी काही सोय नाही , त्यावर मी आवाज इंडिया व लॉर्ड बुद्धा चॅनेलवर बोललो आहे. स्मारक समितीतील बऱ्याच वर्षांपासूनचे ट्रस्टी हे धम्माचे व समाजाचे शत्रू आहेत त्यांना काधुन टाकले पाहिजे , एकाबाजूला कायदेशीर व दुसऱ्या बाजूला जन मतांचा रेटा लावावा लागेल , समितीने सर्व व्यवस्था पोलीस दलाकडे दिली ,मी दलाचे 3 हजार सैनिक देतो लेटर दिले होते त्यांनी प्रतिसाद दिला नाही ,दरवर्षी दीक्षाभूमी वरून 22 प्रतिज्ञा व त्रिशरण -पंचशील दिले पाहिजे ते देत नाहीत,येथे ट्रस्टी कोणी नाही ते दुसऱ्या दिवशी पैसे मोजायला येतील ,त्यांना तेथून हाकलून देणे ,त्यांची जागा दाखवयाला पाहिजे ,हे ट्रस्टी डॉ बाबासाहेब यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत असे प्रतिपादन करून नागपूर मध्ये विहार मोठे की छोटे याची स्पर्धा ऐवजी त्यातील धम्म कार्याची स्पर्धा करून बुद्ध विहार जोडो अभियान सुरू करावे . संपूर्ण भारतभर धम्मचक्र अधिक गतिमान करूया असे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या नागपूर महानगर ,
नागपूर पश्चिम व नागपूर पूर्व या तिन्ही जिल्हा शाखेच्यावतीने सामाजिक न्यायभवन ,दीक्षाभूमी ,
नागपूर येथे 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन समारोह कार्यक्रमात केले. डॉ भीमराव य आंबेडकर यांनी महिलांना स्वातंत्र देण्यासाठी स्वातंत्र महिला कार्यकारिणी निर्माण केल्यामुळे नागपूर येथील महिलांच्यावतीने सर्वात मोठ्ठा हार देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी या समारोहास कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव ),एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफीसर ,समता सैनिक दल ),भिकाजी कांबळे (अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ),अँड प्रकाश मौर्य ( राष्ट्रीय संघटक ),
पद्माकर गणवीर ( राष्ट्रीय संघटक ), विजय चौरपगार (विभागीय सचिव ), नागपूर विभागातील जिल्हा अध्यक्ष अनुक्रमे नेताजी भरणे (चंद्रपूर पश्चिम ),डॉ राजपाल खोब्रागडे (चंद्रपूर पूर्व ),तुलराम राऊत (गडचिरोली उत्तर ),भीमराव झाडे (गडचिरोली दक्षिण ),देवराव मेश्राम (गोंदिया ),प्राणहंस मेश्राम (भंडारा ) यांनी 67 व्या धम्मचक्र प्रवर्तनानिमित्त शुभेच्छा व आपले मनोगत व्यक्त केले.


कॅप्टन प्रविण निखाडे यांनी,वर्षंभर केलेल्या कामाचा आढावा घेऊन आता दीक्षाभूमी आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
एस के भंडारे यांनी , दीक्षाभूमी ही दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची असून त्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी,समता सैनिक दल आणि जनतेने आंदोलन करावे असे आवाहन करून बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करावी व संविधान बदलणाऱ्याना निवडून न देता संविधान मानणाऱ्यांना निवडून द्यावे असे सांगितले.
अँड प्रकाश मौर्य यांनी , दिक्षाभूमीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातू डॉ भीमराव आंबेडकर यांना केलेल्या अडचणी बद्दल व कुलूप खोलन्यास उशीर केल्याबद्दल जोरदार आक्षेप घेतला व डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वखाली सन 2025 मध्ये दिल्ली , पटणा ,मुंबई , जयपूर ,
गुजरात आणि देशाच्या इतर सर्व मुख्य भागात करोडो ओ बी सी धर्मांतर करून घर वापसी करणार आहोत त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
भिकाजी कांबळे यांनी, दीक्षाभूमी मध्ये झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने एका कवीची कविता तुम्हाला राग येतो की नाही असा प्रश्न विचारून नागपूरकरांनी स्पष्ट भूमिका घेऊन कामाला लागावे असे आवाहन केले.
समाज कल्याण उपायुक्त डॉ सिद्धार्थ गायकवाड यांनीही डॉ भीमराव य आंबेडकर यांना दीक्षाभूमी मध्ये दिलेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.
सकाळी 11 वा सामाजिक न्याय भवन ते दीक्षाभूमी समता सैनिक दलाची रॅली डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वखाली काढण्यात आली वरील सर्व मान्यवर व समता सैनिक दलाचे हेड क्वार्टरचे अशोक कदम (असि.स्टाफ ऑफिसर ),डी एम आचार्य (सचिव व असि.लेफ्टनंट जनरल ),मोहन कदम ( लेफ्टनंट कर्नल ) उपस्थित होते.यावेळी संपन्न झालेल्या श्रामणेर व समता सैनिक दल शिबिरार्थीना डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. दलाचे शिक्षक म्हणून अशोक कदम ,डी एम आचार्य ,मोहन सावंत व श्रामणेर शिक्षक म्हणून ज्ञानोबा कांबळे यांनी काम पहिले.
या समारोहाचे अध्यक्षस्थानी जे आर गोडबोले( अध्यक्ष ,नागपूर शहर जिल्हा ) होते ,
स्वागताध्यक्ष भीमराव फूसे (राज्य संघटक ),
सूत्रसंचालन विलास उंदीरवाडे(अध्यक्ष ,नागपूर पश्चिम जिल्हा ) व आभारप्रदर्शन तुलाराम रामटेके (अध्यक्ष ,नागपूर पूर्व जिल्हा ) यांनी केले,या समारोहासाठी विदर्भातून विविध जिल्ह्यातून कार्यकर्ते व सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!