
लातूरःदि.७/२/२०२५.
वर्णव्यवस्थेच्या शोषण काळात प्यायला पाणी नाही.वर्गात बसु दिले नाही.वर्गाबाहेर बसुन ज्या भीमरावांना शिकावं लागले पुढे घरची गरिबी यातून परदेशात शिक्षण घेत आसताना त्या गरिबीची झळ रमाईने भीमरावांना बसु दिली नाही.गोवर्या थापुन -त्या विकुन संसाराचा भार सांभाळला. गरिबीमुळे चार मुलांचा औषधा विना झालेला म्रूत्यु आदी संकटाची झळ रामजी सुभेदाराच्या भीमरावांना रमाईने बसु दिली नाही. डाॕ. बाबासाहेब होण्यास प्रचंड कष्ट सहन केले म्हणुनच भीमराव डॕ. बाबासाहेब झाले आसे प्रतिपादन बौद्धाचार्य केशव कांबळे यांनी वैशाली बुद्धविहारात केले.
१२७व्या रमाई जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भ.बुध्द व डाॕ. बाबासाहेब आंबेडकर व रमाईच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पमाला अर्पण करण्यात येउन बुद्धवंदना घेण्यात आली. या प्रसंगी डाॕ. जनार्दन जाधव ,भरत कांबळे,सुर्यभान लातूरकर,दामु कोरडे ,जगन्नाथ सुरवसे,उत्तम गायकवाड ,रवि सोनवते ,अशोक सातपुते,गौतम चिकाटे,लता चिकटे आनुराधा कांबळे, मिना सुरवसे,रुक्मिनबाई गायकवाड ,शारदा सातपुते कालींदा आंगरखे, शोभा सातपुते,जयश्री गायकवाड , छबुबाई गायकवाड ,आशा गायकवाड ,लता गायकवाड ,आशा बानाटेआदी उपासक उपासिका उपस्थित होत्या.या प्रसंगी बुद्धविहाराचे विश्वस्त रघुनाथभागुराम कांबळे यांना श्रध्दांजली आर्पण करण्यात आली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत