दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

संदेश यात्रा

समाज माध्यमातून साभार

सन्माननीय बौद्ध बंधु आणि भगिनींनो सप्रेम
जय भीम
नमो बुद्धाय
दि.३१ जुलै १९३७ रोजी व १७,१८,१९ जुन १९३८ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे वाघाडी तालुका शिरपूर येथील बैल पोळ्याच्या केस संदर्भात तात्कालिक जिल्हा न्यायदंडाधिकारी पच्छिम खान्देश अर्थात आजचा धुळे जिल्हा येथे अपिलावर कामकाज करण्यासाठी आले होते. त्यावेळी धुळेकर जनतेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्टेशन पासून ते ट्राव्हलर्स बंगला म्हणजे आत्ताची संदेश भूमी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. हा सर्व उल्लेख महाराष्ट्र शासन द्वारा प्रकाशित डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण खंड १८ भाग २ छापून आला आहे .
ज्या भुमीला
भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमी चा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था धुळे च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्य भूमी दादर मुंबई ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी धुळे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा दि.७ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने चैत्य भूमी दादर मुंबई येथून सुरवात होणार आहे तसेच दि.२३/२/२०५ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमी धुळे बसस्थानक जवळ येथे समारोप होणार आहे तरी सदर संदेश यात्रा ही चैत्य भूमी दादर, घाटकोपर,ठाणे, भिवंडी, शहापूर,कसारा, इगतपुरी,घोटी, नासिक,ओझर, चांदवड, मालेगाव, चाळीसगाव, भडगांव,पाचोरा, जळगाव, पाळधी,एरंडोल,पारोळा, अमळनेर, धरणगाव,चोपडा, शिरपूर, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा,शहादा,प्रकाशा, तडोदा, नंदुरबार,खांडबारा, नवापूर, साक्री, अशा मार्गाने संदेश भूमी धुळे येथे बौध्द परिषद घेऊन समारोप कार्यक्रम होऊन समाप्त करण्यात येणार आहे तरी या मार्गावरील बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थीकलश संदेश यात्रा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी बहुउद्देशीय संस्था धुळे च्या वतीने करण्यात येत आहे.
संदेश यात्रेचा उद्देश
१)बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा.
२) संदेश भूमी चा प्रचार प्रसार होण्यासाठी.
३) संदेश भूमी धुळे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी ह्या १९५६ पासून असून सुद्धा पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रचार प्रसार झालेला नाही म्हणून हि डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थी कलश संदेश यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
४) महाराष्ट्र शासनाने दि. १२/१०/२०१७ रोजीचा शासन निर्णयानुसार महाराष्ट्राती ३९ स्थळे घोषित केले गेले आहेत तसेच ४० वे स्थळ संदेश भूमी ला स्मारक घोषित करून विकास करण्यात यावा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा चा मार्ग
उद्घाटन – चैत्य भुमी,दादर
दि.७/२/२०२५
दि.७/२/२०२५-ठाणे( मुक्काम)
दि.८/२/२०२५- शहापूर (मुक्काम )
दि.९/२/२०२५-नासिक (मुक्काम)
दि.१०/२/२०२५-चांदवड( मुक्काम)
दि.११/२/२०२५-मालेगाव( मुक्काम)
दि
१२/२/२०२५-चाळीसगाव(मुक्काम)
दि.१३/२/२०२५-भडगाव,
पाचोरा(मुक्काम)
दि.१४/२/२०२५-जळगांव(मुक्काम)
दि.१५/२/२०२५-एरंडोल,
पारोळा, अमळनेर(मुक्काम )
दि.१६/२/२०२५-धरणगाव,
चोपडा(मुक्काम)
दि.१७/२/२०२५-शिरपूर(मुक्काम)
दि.१८/२/२०२५-शिंदखेडा, दोंडाईचा (मुक्काम)
दि.१९/२/२०२५- शहादा(मुक्काम)
दि.२०/२/२०२५- प्रकाशा,तडोदा, नंदुरबार (मुक्काम)
दि.२१/२/२०२५-खांडबारा, नवापूर (मुक्काम)
दि.२२/२/२०२५-साक्री(मुक्काम)
दि.२३/२/२०२५-
संदेश भूमी धुळे बौद्ध परिषद होउन समारोप

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!